शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

शेतकर्‍यांनी स्वत:च तयार केले बियाणे

By admin | Updated: June 3, 2014 23:58 IST

खरीप व रबी हंगामात बियाणे खरेदी करताना टंचाई, बोगस बियाणे, वाढते दर आदि बाबींचा सामना नेहमी शेतकर्‍यांना करावा लागतो. यामध्ये शेतकरी मोठय़ा प्रमाणात भरडले जात असतात.

वरोरा : खरीप व रबी हंगामात बियाणे खरेदी करताना टंचाई, बोगस बियाणे, वाढते दर आदि बाबींचा सामना नेहमी शेतकर्‍यांना करावा लागतो. यामध्ये शेतकरी मोठय़ा प्रमाणात भरडले जात असतात. त्यामुळे पेरणी हंगामाच्या पूर्वीच शेतकर्‍यांनी आपल्या शेतातून निघालेल्या धान्यातून बियाणे तयार करून ठेवले आहे.   खरीप व रबी हंगामातील बियाणे पेरण्यासाठी मागील काही वर्षांपासून शेतकरी शहरातील कृषी केंद्राकडे धाव घेत असतात. ज्या बियाणांना शेतकर्‍यांची मागणी अधिक असते. अशा बियाणांची बाजारात टंचाई निर्माण झालेली दिसते. अनेकदा निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने बियाणे शेतकर्‍यांना विकत घ्यावे लागते. बियाणे मिळण्यास विलंब झाला किंवा बियाणांची उगवण क्षमता शून्य असल्यास शेतकर्‍यांची शेती पडून राहते. याबाबत बिलासह कृषी विभागाकडे तक्रारी केल्यास बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई दिली जाते. नुकसान भरपाई अल्प असते. तोपर्यंत हंगाम निघून गेलेला असतो. यावर मात करण्यासाठी मागील काही वर्षांपासून शेतकरी सरसावले आहेत. शेतातील पीक निघाल्याबरोबर ते चांगल्या उन्हामध्ये चार ते पाच दिवस ठेवतात. त्यातील माती कचरा व काही टोचलेले दाणे वेगळे काढून चांगल्या प्रकारचे दाने लोखंडी डब्ब्यामध्ये घरात भरून ठेवतात. लोखंडी डब्ब्याच्या तोंडावर शेण लावले जाते. बियाणे ठेवलेल्या डब्याला पाण्यापासून अलिप्त ठेवले जाते. शेती तयार झाल्यानंतर घरीच तयार केलेले बियाणे पेरणीसाठी वापरत असतात.  (तालुका प्रतिनिधी)