शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

शेतकर्‍यांनी स्वत:च तयार केले बियाणे

By admin | Updated: June 3, 2014 23:58 IST

खरीप व रबी हंगामात बियाणे खरेदी करताना टंचाई, बोगस बियाणे, वाढते दर आदि बाबींचा सामना नेहमी शेतकर्‍यांना करावा लागतो. यामध्ये शेतकरी मोठय़ा प्रमाणात भरडले जात असतात.

वरोरा : खरीप व रबी हंगामात बियाणे खरेदी करताना टंचाई, बोगस बियाणे, वाढते दर आदि बाबींचा सामना नेहमी शेतकर्‍यांना करावा लागतो. यामध्ये शेतकरी मोठय़ा प्रमाणात भरडले जात असतात. त्यामुळे पेरणी हंगामाच्या पूर्वीच शेतकर्‍यांनी आपल्या शेतातून निघालेल्या धान्यातून बियाणे तयार करून ठेवले आहे.   खरीप व रबी हंगामातील बियाणे पेरण्यासाठी मागील काही वर्षांपासून शेतकरी शहरातील कृषी केंद्राकडे धाव घेत असतात. ज्या बियाणांना शेतकर्‍यांची मागणी अधिक असते. अशा बियाणांची बाजारात टंचाई निर्माण झालेली दिसते. अनेकदा निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने बियाणे शेतकर्‍यांना विकत घ्यावे लागते. बियाणे मिळण्यास विलंब झाला किंवा बियाणांची उगवण क्षमता शून्य असल्यास शेतकर्‍यांची शेती पडून राहते. याबाबत बिलासह कृषी विभागाकडे तक्रारी केल्यास बियाणे कंपन्यांकडून नुकसान भरपाई दिली जाते. नुकसान भरपाई अल्प असते. तोपर्यंत हंगाम निघून गेलेला असतो. यावर मात करण्यासाठी मागील काही वर्षांपासून शेतकरी सरसावले आहेत. शेतातील पीक निघाल्याबरोबर ते चांगल्या उन्हामध्ये चार ते पाच दिवस ठेवतात. त्यातील माती कचरा व काही टोचलेले दाणे वेगळे काढून चांगल्या प्रकारचे दाने लोखंडी डब्ब्यामध्ये घरात भरून ठेवतात. लोखंडी डब्ब्याच्या तोंडावर शेण लावले जाते. बियाणे ठेवलेल्या डब्याला पाण्यापासून अलिप्त ठेवले जाते. शेती तयार झाल्यानंतर घरीच तयार केलेले बियाणे पेरणीसाठी वापरत असतात.  (तालुका प्रतिनिधी)