शहरं
Join us  
Trending Stories
1
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
2
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
3
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
4
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
5
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
6
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
7
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
8
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
9
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
10
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
11
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
12
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
14
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
15
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
16
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
17
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
18
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
19
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
20
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video

सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगातून निघाले अंकुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:32 IST

आशिष खाडे पळसगाव : बल्लारपूर तालुक्यात पळसगाव, आमडी, कळमना, कोठारी, कवडजी, किन्ही, मानोरा, लावारी, दहेली या गावांमध्ये मागील वर्षी ...

आशिष खाडे

पळसगाव : बल्लारपूर तालुक्यात पळसगाव, आमडी, कळमना, कोठारी, कवडजी, किन्ही, मानोरा, लावारी, दहेली या गावांमध्ये मागील वर्षी कापसामुळे उत्पन्नात घट आल्याने सोयाबीन या पिकाला प्राधान्य देण्यात आले आहे. पेरणीनंतर दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी झाल्यावर निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकावर सतत पावसाचा शिरकाव होत आहे. सध्या पीक कापणीला आले असून, सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीनच्या शेंगातील सोयाबीनच्या दाण्याला अंकुर आले आहे.

शेतामध्ये गेल्यावर सोयाबीनच्या शेंगातील दाण्याला नवीन अंकुर बघून शेतकरी पूर्णतः कोसळून गेला आहे. दाण्यामध्ये अंकुर दिसल्याने सोयाबीन कसे निघेल आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेत बळीराजा आहे.

जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने बळीराजाने एका एकरासाठी सोयाबीन तीन हजार सहाशे रुपये बॅग, खत एक हजार ३०० रुपये, मशागत दोन हजार रुपये, पेरणीसाठी मजुरी खर्च तीन हजार रुपये इतका केला आहे. पेरणीनंतर रोपटे वर आल्यावर १५ दिवसांनी त्याला डवरणी, खुरपनी, २२ दिवसांच्या आत खोडकीडा, चक्रीभुंगासाठी कीटकनाशक फवारणी, फुलोरावस्थेत उत्तपणात वाढ व्हावी म्हणून दुसरी फवारणी, आणि दाना भरताच कीड नियंत्रणाची तिसरी फवारणी अशी एकूण पाच-सहा हजार रुपयांची महागडी औषधाचा शिरकाव केला आहे.

मात्र आता सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगांना बिजांकुर पूर्ण शेतात दिसत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. सोयाबीनचा एकही दाणा आजच्या घडीला पदरात पडणार की नाही या चिंतेत शेतकरी आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन पंचनामा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

]

230921\img20210922073813.jpg~230921\img20210922073840.jpg

caption~caption