शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाईट हाऊसचे सल्लागार बनले २ जिहादी; एक लश्कर ए तोयबा तर दुसरा अल कायदाशी लिंक
2
केवळ ठाकरे गटाला नाही, मनसेलाही धक्का; दादरा नगर हवेलीसह ७ ठिकाणचे पदाधिकारी शिंदेसेनेत
3
“मोदी २०० देश फिरले, पण एकही पाठिशी नाही; शिष्टमंडळाच्या वऱ्हाडावर बहिष्कार टाकला पाहिजे”
4
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
5
ज्या गर्लफ्रेंडशी गुलूगुलू बोलायचा ती निघाली त्याचीच पत्नी, रंगेल पतीची झाली अशी फजिती, त्यानंतर...
6
पीएमपीएमएलच्या ईलेक्ट्रीक बसची रेंज किती; कालच पाहिली, १,२४,००० किमी एवढे प्रचंड रनिंग झालेली बस...
7
अमेरिकेने ४ कोटी रुपये किमतीचे भारतीय आंबे का नष्ट केले? एक चूक सर्वांना महागात पडली
8
मिथुन चक्रवर्ती अडचणीत, BMC कडून सात दिवसांची 'डेडलाइन', काय आहे संपूर्ण प्रकरण?
9
बारावी शिकलेली रिसेप्शनिस्ट ज्योती पाकिस्तानपर्यंत पोहोचली कशी? 'या' देशांचीही केलीय वारी
10
मेकर्ससोबतच्या क्रिएटिव्ह मतभेदांमुळे सोडला 'हेरा फेरी ३'? परेश रावल ट्वीट करत म्हणाले...
11
पोखरणच्या जमिनीवर 'असा' झाला स्फोट, अमेरिकाही हादरली; आजच्या दिवशी भारताची दखल जगानं घेतली
12
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
13
गिलख्रिस्टच्या IPL संघात विराटला स्थान नाही, Mumbai Indiansचे ५ जण, कर्णधार कोण?
14
पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि अफगाणिस्तानमधील व्यापार पुन्हा सुरू
15
सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा
16
आयडियाची कल्पना झाली फेल! बेपत्ता झालेला गुरुग्रामचा आयटी मॅनेजर पकडला गेला अन् समोर आलं खरं कारण
17
अटकेत पाकिस्तानी स्पाय? ज्योती मल्होत्राची कमाई किती? कोरोनात नोकरी गेली अन्... पाकिस्तानही फिरून आली...
18
Hyundai ने आखली मोठी योजना! भारतात लॉन्च करणार 20 पेट्रोल-डिझेल अन् 6 EV कार
19
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
20
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते

सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगातून निघाले अंकुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:32 IST

आशिष खाडे पळसगाव : बल्लारपूर तालुक्यात पळसगाव, आमडी, कळमना, कोठारी, कवडजी, किन्ही, मानोरा, लावारी, दहेली या गावांमध्ये मागील वर्षी ...

आशिष खाडे

पळसगाव : बल्लारपूर तालुक्यात पळसगाव, आमडी, कळमना, कोठारी, कवडजी, किन्ही, मानोरा, लावारी, दहेली या गावांमध्ये मागील वर्षी कापसामुळे उत्पन्नात घट आल्याने सोयाबीन या पिकाला प्राधान्य देण्यात आले आहे. पेरणीनंतर दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी झाल्यावर निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकावर सतत पावसाचा शिरकाव होत आहे. सध्या पीक कापणीला आले असून, सतत पाऊस पडत असल्यामुळे सोयाबीनच्या शेंगातील सोयाबीनच्या दाण्याला अंकुर आले आहे.

शेतामध्ये गेल्यावर सोयाबीनच्या शेंगातील दाण्याला नवीन अंकुर बघून शेतकरी पूर्णतः कोसळून गेला आहे. दाण्यामध्ये अंकुर दिसल्याने सोयाबीन कसे निघेल आणि घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची, या चिंतेत बळीराजा आहे.

जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस पडल्याने बळीराजाने एका एकरासाठी सोयाबीन तीन हजार सहाशे रुपये बॅग, खत एक हजार ३०० रुपये, मशागत दोन हजार रुपये, पेरणीसाठी मजुरी खर्च तीन हजार रुपये इतका केला आहे. पेरणीनंतर रोपटे वर आल्यावर १५ दिवसांनी त्याला डवरणी, खुरपनी, २२ दिवसांच्या आत खोडकीडा, चक्रीभुंगासाठी कीटकनाशक फवारणी, फुलोरावस्थेत उत्तपणात वाढ व्हावी म्हणून दुसरी फवारणी, आणि दाना भरताच कीड नियंत्रणाची तिसरी फवारणी अशी एकूण पाच-सहा हजार रुपयांची महागडी औषधाचा शिरकाव केला आहे.

मात्र आता सततच्या पावसाने सोयाबीनच्या शेंगांना बिजांकुर पूर्ण शेतात दिसत असल्याने शेतकरी धास्तावले आहे. सोयाबीनचा एकही दाणा आजच्या घडीला पदरात पडणार की नाही या चिंतेत शेतकरी आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन पंचनामा करून योग्य तो मोबदला देण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.

]

230921\img20210922073813.jpg~230921\img20210922073840.jpg

caption~caption