शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

खरीप हंगामासाठी बियाणे साठवणुकीचा सल्ला

By admin | Updated: March 30, 2015 00:49 IST

शेतकऱ्यांनी २0१५ मधील खरीप हंगामासाठी स्वत:कडील सोयाबीन बियाणे साठवणू ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

चंद्रपूर : शेतकऱ्यांनी २0१५ मधील खरीप हंगामासाठी स्वत:कडील सोयाबीन बियाणे साठवणू ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.२0१४ मध्ये पावसाचे आगमन उशीराने झाल्यामुळे शेंगा भरताना पिकास ताण पडला. त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असून या पिकांचे सर्व वाण सरळ असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या खरीप हंगामात बियाणे म्हणूनच त्याचा वापर करावा. स्वत:कडील बियाणे वापरल्यास खर्चात बचत होण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात उशिरा झालेल्या पावसामुळे यावर्षी बियाणांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे.(नगर प्रतिनिधी) अशी घ्या दक्षताबियाणे साठवताना बियाण्याच्या आर्द्रतेचे प्रमाण १0 ते १२टक्क््यापेक्षा जास्त नसावे. तसेच सोयाबीन बियाणे हे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते.बियाणातील बिजांकुर बाह्य आवरणाच्या लगत असते. त्यामुळे बियाण्यास इजा पोहोचू नये व त्याची उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी बियाणे काळजीपूर्वक हाताळावी. बियाणे साठवताना पोत्याची थप्पी सहा ते आठ थरांची किंवा सहाफुटापेक्षा जास्त नसावी.शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सोयाबीन बियाणे वापरल्यास आर्थिक बचत होऊ शकते. यासाठी प्रथम सोयाबीनची उगवनशक्ती तपासून बघावी. - प्रवीण देशमुखकृषी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर