शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
2
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
3
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
4
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
5
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
6
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
7
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
8
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
9
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
10
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
11
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
12
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
14
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
15
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे
16
६ महिन्यांत ६ वेळा बंद पडली अभिनेत्रीची नवीन कार! मनवा नाईकने शेअर केला भयानक अनुभव, म्हणाली...
17
आमची कसदार जमीन ‘शक्तीपीठला’ देणार नाही; भाटेगाव परिसरातील शेतकऱ्यांचा विरोध
18
बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी 'ती' ६०० किमी दूर आली अन्...; फेसबुकवरच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
19
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
20
बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडी झाली; प्रियकराच्या मदतीने पतीला दारू पाजली अन् गळा दाबला!

खरीप हंगामासाठी बियाणे साठवणुकीचा सल्ला

By admin | Updated: March 30, 2015 00:49 IST

शेतकऱ्यांनी २0१५ मधील खरीप हंगामासाठी स्वत:कडील सोयाबीन बियाणे साठवणू ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

चंद्रपूर : शेतकऱ्यांनी २0१५ मधील खरीप हंगामासाठी स्वत:कडील सोयाबीन बियाणे साठवणू ठेवावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.२0१४ मध्ये पावसाचे आगमन उशीराने झाल्यामुळे शेंगा भरताना पिकास ताण पडला. त्यामुळे सोयाबीनच्या बियाण्याची कमतरता भासण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोयाबीन हे स्वपरागसिंचित पीक असून या पिकांचे सर्व वाण सरळ असल्याने दरवर्षी बियाणे बदलण्याची आवश्यकता नाही. शेतकऱ्यांनी स्वत:कडील बियाणे वापरण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार मागील दोन वर्षात खरेदी केलेल्या प्रमाणित बियाण्यापासून मिळालेल्या उत्पादनातील सोयाबीन येत्या खरीप हंगामात बियाणे म्हणूनच त्याचा वापर करावा. स्वत:कडील बियाणे वापरल्यास खर्चात बचत होण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, मंडल अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. खरीप हंगामात उशिरा झालेल्या पावसामुळे यावर्षी बियाणांचा तुटवडा होण्याची शक्यता आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत, या उद्देशाने शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे.(नगर प्रतिनिधी) अशी घ्या दक्षताबियाणे साठवताना बियाण्याच्या आर्द्रतेचे प्रमाण १0 ते १२टक्क््यापेक्षा जास्त नसावे. तसेच सोयाबीन बियाणे हे अत्यंत नाजूक असून त्याचे बाह्य आवरण पातळ असते.बियाणातील बिजांकुर बाह्य आवरणाच्या लगत असते. त्यामुळे बियाण्यास इजा पोहोचू नये व त्याची उगवण क्षमता चांगली राहण्यासाठी बियाणे काळजीपूर्वक हाताळावी. बियाणे साठवताना पोत्याची थप्पी सहा ते आठ थरांची किंवा सहाफुटापेक्षा जास्त नसावी.शेतकऱ्यांनी आपल्या जवळील सोयाबीन बियाणे वापरल्यास आर्थिक बचत होऊ शकते. यासाठी प्रथम सोयाबीनची उगवनशक्ती तपासून बघावी. - प्रवीण देशमुखकृषी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर