शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

एकटे राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे; कोरोना काळात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:29 IST

एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडे त्यांची नोंद असणे गरजेचे असते. संबंधित ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अधे-मध्ये त्या वृद्धांची ...

एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासनाकडे त्यांची नोंद असणे गरजेचे असते. संबंधित ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अधे-मध्ये त्या वृद्धांची विचारपूस करून त्यांना सहकार्य करावे, असे वरिष्ठांचे निर्देश आहेत. या योजनेतून वृद्ध संबंधित नोंद असलेल्या ठाण्यातून मदत मागू शकतो. परंतु, पोलीस विभाग शहरातील ज्येष्ठ नागरिक संघाकडून सरसकट यादी घेऊन नोंद करीत असतात. त्यामुळे संघाचे जे सदस्य असतात, केवळ त्याचीच नोंद होते. इतर ज्येष्ठांची नोंद होत नाही. विशेष म्हणजे अनेक ज्येष्ठांना तर अशाप्रकारची नोंद केली जात असल्याची माहितीच नसते. कोरोना काळात अशा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे.

बॉक्स

औषधी आणण्याचीही सोय नाही

शहरात एकाकी जीवन जगणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वय झाल्याने तसेच कोरोनाची दहशत असल्याने ते बाहेर पडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांना औषधी आणण्यासाठी मोठी पंचायत पडते. कोरोना काळात तर या वृद्धांचे मोठे हाल झाले. परंतु, कोणताही पोलीस कर्मचारी त्यांची साधी विचारपूस करण्यासाठी गेला नाही.

--------

बॉक्स

दोन-तीन महिन्यांतून एकदा मीटिंग

पोलीस विभाग ज्येष्ठ नागरिक संघांकडून यादी मागवितात. त्यानंतर ज्येष्ठांची संपूर्ण माहिती, फोन नंबरसह घेऊन त्याची नोंद करीत असतात. दोन-तीन महिन्यांतून एकदा मीटिंग घेतली जाते. यावेळी ज्येष्ठांच्या समस्येविषयी चर्चा केली जाते.

- विजय चंदावार, विभागीय अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक संघ, चंद्रपूर

-------

ज्येष्ठांकडून पोलिसांना प्रतिसाद नाही

वयोमानानुसार ज्येष्ठांची स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता असते. त्यामुळे असे ज्येष्ठ कुठे भटकल्यास किंवा विसरल्यास त्यांना सुरक्षित घरी सोडता यावे, यासाठी पोलीस विभागाने विशेष मोहीम राबवून ज्येष्ठांची माहिती घेत त्यांना आयकार्ड वितरित केले. मात्र, कोरोनाच्या दहशतीने अनेकांनी माहिती देण्याची टाळाटाळ केली असल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली.

-----

कोट

जिल्हा स्तरावर ज्येष्ठ नागरिक समितीची स्थापना केली आहे. याअंतर्गत ज्येष्ठांची नोंद घेतली जाते. त्यांची मीटिंग घेऊन त्यांच्या समस्या ऐकल्या जातात. तसेच त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. ज्येष्ठांनी कधी वेळी-अवेळी पोलिसांना मदत मागितल्यास त्यांना मदत केली जाते. अनेक ज्येष्ठांना आयकार्डचेसुद्धा वितरण करण्यात आले आहे.

अरविंद साळवे, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर

--------