शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
3
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
4
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
5
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
6
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
7
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
8
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
9
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
10
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
11
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
12
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
13
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
14
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
15
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
16
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
17
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
18
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?
19
Solapur Crime: 'तुला आणि तुझ्या आईला खल्लास करीन'; बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अनेकवेळा अत्याचार
20
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका

दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या वैवाहिक जीवनात विष कालवले असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ...

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या वैवाहिक जीवनात विष कालवले असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. मार्च २०२० पासून जिल्हाभरातून कौटुंबिक हिंसाचाराच्या दोन हजार २१० तक्रारी भरोसा सेलकडे आल्या आहेत. त्यापैकी १०८४ प्रकरणात तडजोड करण्यात आली असून २२४ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली आहेत. बऱ्याच महिला आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तक्रार करण्यास धजावत नसल्याने ही संख्या बरीच मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनामुळे सर्व कुटुंब एकत्र आले. घरामध्ये ज्येष्ठांचा हस्तक्षेप वाढला. दाम्पत्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील स्पेसला निर्बंध निर्माण झाले. अनेकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले. मोबाईल चॅटिंगमुळे परस्परातील संशयात वाढ, अशा विविध कारणाने पती- पत्नीमध्ये घरगुती कलह निर्माण होऊन कौटुंबिक हिंसाचार वाढू लागला. मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत भरोसा सेलकडे १४५७ तर जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ७५३ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी २२४ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली. तर १०८४ प्रकरणात तडजोड करण्यात चंद्रपूर भरोसा सेलच्या पथकाला यश आले आहे.

बॉक्स

१०४८ पती-पत्नीचे भांडण सोडविले

लॉकडाऊनचा परिणाम सर्व विभागावर पडला आहे. यातून वैवाहिक जीवनसुद्धा सुटले नाही. विविध कारणातून भांडण-तंटे निर्माण झाले. वाद न सुटल्याने हे सर्व प्रकरणे भरोसा सेलकडे गेले. दोन्हीकडील बाजू समजून घेत भरोसा सेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०४८ प्रकरणात तडजोड केली. त्यामुळे एकमेकांविरुद्ध वितुष्ट निर्माण झालेले कुटुंब पुन्हा गुण्यागोंविदाने नांदू लागले.

-------

पैसा हाच कारण

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे आर्थिक तणाव वाढत आहे. त्यातून वाद निर्माण झाल्याने अनेकांनी माहेरून पैसे आण असा तगादा लावल्याच्या तक्रारी आहेत. तर काहीजणात आर्थिक विवंचनेतून वाद निर्माण झाल्याची तक्रारी आहेत.

----

मोबाईलचा सतत वापर

लॉकडाऊनमुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. मोबाईलसुद्धा वादाचे मोठे कारण ठरत आहे. मोबाईल चॅटिंग, जास्त वेळ मोबाईल वापरणे, सतत फोनवर बोलणे, आदी कारणामुळे वाद निर्माण होत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर जपून करणे गरजेचे आहे.

-------

चारित्र्यावर संशय

अनेक पती-पत्नी चारित्र्यावर संशय घेत असल्याने वाद वाढत आहे. यासोबतच दारू पिऊन मारझोड करणे, सासु-सासऱ्याचा वैवाहिक जीवनात हस्तक्षेप आदी कारणांनी वैवाहिक जीवनात वाद निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

-----

कोट

प्रतिष्ठेला घाबरून अनेक महिला अन्याय सहन करतात. मात्र असे न करता भरोसा सेलकडे तक्रार करावी.

कुटुंब अत्याचार अधिनियम २००५ नुसार आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी समुपदेशनातून निपटारा करण्याचा प्रयत्न करीत असतो. बऱ्यापैकी प्रकरणात यश येते. उर्वरित प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात येतात.

-अश्विनी वाकडे, पोलीस उपनिरीक्षक भरोसा सेल, चंद्रपूर

२०२० मध्ये आलेल्या तक्रारी -

१४५७

२०२१ मध्ये आलेल्या तक्रारी - ७५३