शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण प्रकरणाचा होणार एसआयटीमार्फत तपास; मुख्यमंत्री फडणवीस यांचे पोलिस महासंचालकांना आदेश
2
विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
3
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
4
जिल्हा परिषदांऐवजी आधी नगरपालिकांची निवडणूक; आयोगाकडून घोषणा पुढील आठवड्यात
5
हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम
6
'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...
7
तिसरे अपत्य लपविणाऱ्यास निवडणुकीत बसणार चाप! सप्टेंबर २००१ नंतर जन्मलेले तिसरे अपत्य ठरवेल उमेदवाराला अपात्र
8
अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची
9
रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद
10
लोकल प्रवाशांचा उद्या तिन्ही मार्गावर होणार खोळंबा; देखभालीसाठी मध्य, पश्चिम व हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
11
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
12
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
13
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
14
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
15
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
16
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
17
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
18
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
19
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
20
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन

दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या वैवाहिक जीवनात विष कालवले असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ...

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या वैवाहिक जीवनात विष कालवले असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. मार्च २०२० पासून जिल्हाभरातून कौटुंबिक हिंसाचाराच्या दोन हजार २१० तक्रारी भरोसा सेलकडे आल्या आहेत. त्यापैकी १०८४ प्रकरणात तडजोड करण्यात आली असून २२४ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली आहेत. बऱ्याच महिला आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तक्रार करण्यास धजावत नसल्याने ही संख्या बरीच मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनामुळे सर्व कुटुंब एकत्र आले. घरामध्ये ज्येष्ठांचा हस्तक्षेप वाढला. दाम्पत्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील स्पेसला निर्बंध निर्माण झाले. अनेकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले. मोबाईल चॅटिंगमुळे परस्परातील संशयात वाढ, अशा विविध कारणाने पती- पत्नीमध्ये घरगुती कलह निर्माण होऊन कौटुंबिक हिंसाचार वाढू लागला. मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत भरोसा सेलकडे १४५७ तर जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ७५३ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी २२४ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली. तर १०८४ प्रकरणात तडजोड करण्यात चंद्रपूर भरोसा सेलच्या पथकाला यश आले आहे.

बॉक्स

१०४८ पती-पत्नीचे भांडण सोडविले

लॉकडाऊनचा परिणाम सर्व विभागावर पडला आहे. यातून वैवाहिक जीवनसुद्धा सुटले नाही. विविध कारणातून भांडण-तंटे निर्माण झाले. वाद न सुटल्याने हे सर्व प्रकरणे भरोसा सेलकडे गेले. दोन्हीकडील बाजू समजून घेत भरोसा सेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०४८ प्रकरणात तडजोड केली. त्यामुळे एकमेकांविरुद्ध वितुष्ट निर्माण झालेले कुटुंब पुन्हा गुण्यागोंविदाने नांदू लागले.

-------

पैसा हाच कारण

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे आर्थिक तणाव वाढत आहे. त्यातून वाद निर्माण झाल्याने अनेकांनी माहेरून पैसे आण असा तगादा लावल्याच्या तक्रारी आहेत. तर काहीजणात आर्थिक विवंचनेतून वाद निर्माण झाल्याची तक्रारी आहेत.

----

मोबाईलचा सतत वापर

लॉकडाऊनमुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. मोबाईलसुद्धा वादाचे मोठे कारण ठरत आहे. मोबाईल चॅटिंग, जास्त वेळ मोबाईल वापरणे, सतत फोनवर बोलणे, आदी कारणामुळे वाद निर्माण होत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर जपून करणे गरजेचे आहे.

-------

चारित्र्यावर संशय

अनेक पती-पत्नी चारित्र्यावर संशय घेत असल्याने वाद वाढत आहे. यासोबतच दारू पिऊन मारझोड करणे, सासु-सासऱ्याचा वैवाहिक जीवनात हस्तक्षेप आदी कारणांनी वैवाहिक जीवनात वाद निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

-----

कोट

प्रतिष्ठेला घाबरून अनेक महिला अन्याय सहन करतात. मात्र असे न करता भरोसा सेलकडे तक्रार करावी.

कुटुंब अत्याचार अधिनियम २००५ नुसार आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी समुपदेशनातून निपटारा करण्याचा प्रयत्न करीत असतो. बऱ्यापैकी प्रकरणात यश येते. उर्वरित प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात येतात.

-अश्विनी वाकडे, पोलीस उपनिरीक्षक भरोसा सेल, चंद्रपूर

२०२० मध्ये आलेल्या तक्रारी -

१४५७

२०२१ मध्ये आलेल्या तक्रारी - ७५३