शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

दुसऱ्या लॉकडाऊनने कालवले वैवाहिक जीवनात विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या वैवाहिक जीवनात विष कालवले असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. ...

चंद्रपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरू केलेल्या लॉकडाऊनने अनेकांच्या वैवाहिक जीवनात विष कालवले असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. मार्च २०२० पासून जिल्हाभरातून कौटुंबिक हिंसाचाराच्या दोन हजार २१० तक्रारी भरोसा सेलकडे आल्या आहेत. त्यापैकी १०८४ प्रकरणात तडजोड करण्यात आली असून २२४ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली आहेत. बऱ्याच महिला आपल्या कुटुंबाची प्रतिष्ठा जपण्यासाठी तक्रार करण्यास धजावत नसल्याने ही संख्या बरीच मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कोरोनामुळे सर्व कुटुंब एकत्र आले. घरामध्ये ज्येष्ठांचा हस्तक्षेप वाढला. दाम्पत्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील स्पेसला निर्बंध निर्माण झाले. अनेकांचा रोजगार हिरावला. त्यामुळे आर्थिक संकट निर्माण झाले. मोबाईल चॅटिंगमुळे परस्परातील संशयात वाढ, अशा विविध कारणाने पती- पत्नीमध्ये घरगुती कलह निर्माण होऊन कौटुंबिक हिंसाचार वाढू लागला. मार्च २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत भरोसा सेलकडे १४५७ तर जानेवारी ते मे २०२१ या कालावधीत ७५३ तक्रारी दाखल झाल्या. त्यापैकी २२४ प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात आली. तर १०८४ प्रकरणात तडजोड करण्यात चंद्रपूर भरोसा सेलच्या पथकाला यश आले आहे.

बॉक्स

१०४८ पती-पत्नीचे भांडण सोडविले

लॉकडाऊनचा परिणाम सर्व विभागावर पडला आहे. यातून वैवाहिक जीवनसुद्धा सुटले नाही. विविध कारणातून भांडण-तंटे निर्माण झाले. वाद न सुटल्याने हे सर्व प्रकरणे भरोसा सेलकडे गेले. दोन्हीकडील बाजू समजून घेत भरोसा सेलच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी १०४८ प्रकरणात तडजोड केली. त्यामुळे एकमेकांविरुद्ध वितुष्ट निर्माण झालेले कुटुंब पुन्हा गुण्यागोंविदाने नांदू लागले.

-------

पैसा हाच कारण

कोरोनामुळे अनेकांचा रोजगार गेला. अनेकजण बेरोजगार झाले. त्यामुळे आर्थिक तणाव वाढत आहे. त्यातून वाद निर्माण झाल्याने अनेकांनी माहेरून पैसे आण असा तगादा लावल्याच्या तक्रारी आहेत. तर काहीजणात आर्थिक विवंचनेतून वाद निर्माण झाल्याची तक्रारी आहेत.

----

मोबाईलचा सतत वापर

लॉकडाऊनमुळे मोबाईलचा वापर वाढला आहे. मोबाईलसुद्धा वादाचे मोठे कारण ठरत आहे. मोबाईल चॅटिंग, जास्त वेळ मोबाईल वापरणे, सतत फोनवर बोलणे, आदी कारणामुळे वाद निर्माण होत आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर जपून करणे गरजेचे आहे.

-------

चारित्र्यावर संशय

अनेक पती-पत्नी चारित्र्यावर संशय घेत असल्याने वाद वाढत आहे. यासोबतच दारू पिऊन मारझोड करणे, सासु-सासऱ्याचा वैवाहिक जीवनात हस्तक्षेप आदी कारणांनी वैवाहिक जीवनात वाद निर्माण झाल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

-----

कोट

प्रतिष्ठेला घाबरून अनेक महिला अन्याय सहन करतात. मात्र असे न करता भरोसा सेलकडे तक्रार करावी.

कुटुंब अत्याचार अधिनियम २००५ नुसार आमच्याकडे येणाऱ्या तक्रारी समुपदेशनातून निपटारा करण्याचा प्रयत्न करीत असतो. बऱ्यापैकी प्रकरणात यश येते. उर्वरित प्रकरणे न्यायालयाकडे पाठविण्यात येतात.

-अश्विनी वाकडे, पोलीस उपनिरीक्षक भरोसा सेल, चंद्रपूर

२०२० मध्ये आलेल्या तक्रारी -

१४५७

२०२१ मध्ये आलेल्या तक्रारी - ७५३