शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

28 दिवस पूर्ण झाल्याने कोरोना लसीचा दुसरा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 05:00 IST

केंद्रीय आरोग्य व राज्य आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाली. लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी १७ हजार ४२५, प्रंटलाईन वर्कर ४ हजार ४०४, गृह विभागातील २ हजार २३६, महसूल एक हजार ३३६ आणि पीआरआय ११९ आदी कर्मचाºयांचा समावेश होता.

ठळक मुद्देआजपासून लसीकरण : पहिल्या टप्प्यात ६७. ५० टक्के पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनावर मात करण्यासाठी जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात झाली होती. पहिल्या टप्प्यातील कोविडशिल्ड लसीकरणाला सोमवारी २८ दिवस पूर्ण झाले. त्यामुळे सर्व आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करर्सला सोमवारपासून दुसऱ्या टप्प्यातील लस टोचण्यात येणार आहे. यासाठी १८ लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आले. जिल्ह्याला अतिरिक्त लसींचे डोसही मिळाले आहेत. शनिवार (दि.१३) पर्यंत जिल्ह्यात ६७. ५० टक्के लसीकरण झाले आहे.केंद्रीय आरोग्य व राज्य आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम सुरू झाली. लस घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये आरोग्य कर्मचारी १७ हजार ४२५, प्रंटलाईन वर्कर ४ हजार ४०४, गृह विभागातील २ हजार २३६, महसूल एक हजार ३३६ आणि पीआरआय ११९ आदी कर्मचाºयांचा समावेश होता. जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाकडून जागृतीचे कार्य सुरू असल्याने लसीकरणासाठी कर्मचाऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ् कोविड योद्धांना २८ दिवस पूर्ण झाले. जिल्ह्यातील १८ केंद्रांमध्ये सर्वांना सोमवारपासून कोविडशिल्ड लस टोचण्यात येणार आहे. यासाठी  जिल्हा आरोग्य तसेच मनपाचे आरोग्य प्रशासन सज्ज झाले आहे. 

तुकूम केंद्रात पोलिसांचे लसीकरणचंद्रपूर मनपा आरोग्य विभागाचे तीन केंद्र सुरू आहेत. सोमवारपासून तुकूम परिसरातील मातोश्री सभागृहात एक केंद्र सुरू होणार आहे. या केंद्रात प्रामुख्याने पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल. लस घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसºया टप्प्यात यापूर्वीच्याच दोन केंद्रात लस देण्याची व्यवस्था मनपा आरोग्य प्रशासनाने केली आहे.

पहिल्या टप्प्यातील सर्वांची प्रकृती ठणठणीतजिल्ह्यातील १८ केंद्रांमध्ये २३ हजार ४०० जणांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. शनिवारपर्यंत १५ हजार ७९६ जणांनी लस घेतली. कोरोना लसीबाबतचे गैरसमज दूर झाल्याने लसीकरणाचा वेग वाढला. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता उद्दिष्टपूर्तीकडे सुरू झाली. पहिल्या टप्प्यात लस घेणाऱ्या सर्वांची प्रकृतीही ठणठणीत आहे, असा दावा आरोग्य विभागाने केला.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या