शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यांमधील वाढणार सिंचनाची व्याप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2018 22:12 IST

१०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या गेटेड साठवण बंधारे बांधण्यासाठी बल्लारपूर, पोंभुर्णा व मूल तालुक्याची निवड करण्यात आली. याकरिता साडेचार कोटींची तरतुद केल्याने तिनही तालु्क्यातील हेक्टरी सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय किन्ही, काटवली, केळझर येथे लघुसिंचन जलसंधारण प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.

ठळक मुद्देगेटेड साठवण बंधाऱ्यांना मंजुरी : साडेचार कोटींची तरतूद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १०० हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या गेटेड साठवण बंधारे बांधण्यासाठी बल्लारपूर, पोंभुर्णा व मूल तालुक्याची निवड करण्यात आली. याकरिता साडेचार कोटींची तरतुद केल्याने तिनही तालु्क्यातील हेक्टरी सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय किन्ही, काटवली, केळझर येथे लघुसिंचन जलसंधारण प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.बल्लारपूर, पोंभुर्णा व मूल हे तालुके धान उत्पादक म्हणून ओळखले जातात. मागील काही वर्षांपासून धान शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर धानाची शेती करणे कदापि परवडत नाही. परंतु, नाईलाजास्तव शेतकºयांना भातशेती करावी लागत आहे. सिंचनाच्या पायाभूत सुविधा नसल्याने या तालुक्यातील शेतकºयांना भाजीपाल्याची पिकेही समाधानकारक घेत नाही. काही वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले बंधारे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे बुजले. त्याचा अनिष्ठ परिणाम भात शेतीच्या उत्पादनावर झाला आहे. या पार्श्वभूमीवर बल्लारपूर, पोंभुर्णा व मूल तालुक्यातील किन्ही, पोंभुर्णा, काटवली, केळझर-१ आणि २ येथे लघु सिंचन (जलसंधारण) प्रकल्पाअंतर्गत गेटेड साठवण बंधारे बांधण्यात येणार आहेत. यातील प्रत्येकी बंधाºयाची साठवण क्षमता सुमारे १०० हेक्टर असल्याचा दावा मृद व जलसंधारण विभागातील अधिकाºयांनी केला. याकरिता साडेचार कोटींच्या तरतुदीला राज्य शासनाने ३ नोव्हेंबरला मान्यता दिली. प्रकल्पनिहाय व उपशिर्षनिहाय मंजूर किमतीच्या मर्यादेत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे निर्देश शासनाने दिले. बांधकाम सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदकडून नाहरकत प्रमाणपत्र घेऊन येत्या काही दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. बांधकाम पूर्ण झाल्यास सिंचनाची व्याप्ती वाढविण्याची आशा निर्माण झाली आहे.बुडीत क्षेत्रात लवकरच सर्वेक्षणबंधारा व बुडीत क्षेत्रातील पाणी साठवण क्षमतेला अनुकूल तसेच प्रतिकूल परिस्थितीचा वरिष्ठ भूवैज्ञानिकाकडून लवकरच सर्वेक्षण केल्या जाणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाणीवापर संस्था स्थापन करून देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. याशिवाय देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी स्वीकारल्या या बंधाऱ्यांचा ताबा ग्रामपंचायतींना देण्याची तरतुदही करण्यात आली आहे.