शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानाची कास धरा, विज्ञाननिष्ठ बना

By admin | Updated: August 9, 2014 23:38 IST

सद्याचे युग हे विज्ञानाचे, माहिती तंत्रज्ञानाचे युग आहेत. नवनवीन संशोधनामुळे मानवाचे जीवन कल्याणककारी बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी, विज्ञाननिष्ठ व्हावे तसेच

चंद्रपूर : सद्याचे युग हे विज्ञानाचे, माहिती तंत्रज्ञानाचे युग आहेत. नवनवीन संशोधनामुळे मानवाचे जीवन कल्याणककारी बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी, विज्ञाननिष्ठ व्हावे तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला प्रोत्साहीन करावे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी केले. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेअंतर्गत आयोजित विज्ञान शिक्षकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.देशातील १० ते १७ वयोगटातील मुलांमधील सहज नैसर्गिक कुतूहल शक्तीला व चौकसपणाला वाव देणे, पुस्तकातील विज्ञान व अवतीभवतीच्या परिसरातील विविध घटना यांचा संबंध जोडणे, मुलांच्या शास्त्रीय संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देणे तसेच मुलांमध्ये राष्ट्राच्या भविष्यकाळातील गरजांबाबत जागरूकता निर्माण करणे व वैज्ञानिक दृष्टीकोन आणि शास्त्रीय वृत्ती असलेले देशाचे भावी नागरिक घडविणे ही उद्दिष्टये समोर ठेवून भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन केले जाते. सदर परिषदेचे आयोजन हे जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीयस्तरावर करण्यात येते.चंद्रपूर जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथे आयोजित करणयत आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवानजीभाई चव्हाण हायस्कूलचे प्राचार्य बी.के. रामटेके होते, तर कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविकांत देशपांडे हे होते. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. योगेश्वर दुधपचारे, प्रा. महेंद्र ठाकरे, प्रमोद कोंडलकर, कुंदन मडामे, धनंजय जिराफे यांची उपस्थिती होती.सन २०१३ मध्ये भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर व नेवजाभाई हितकारिणी ब्रह्मपुरी या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली होती. हा प्रकल्प सादर करण्याच्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा याप्रसंगी शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरणाचे वेळापत्रक याविषयी सविस्तर माहिती व्हावी याकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आले होते. याकरिता जिल्ह्यातील एकूण ६२ शाळांची व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.या संशोधनपर प्रकल्पाकरिता वयोगट निश्चित केलेले आहेत. लहान गट १० ते १३ वर्षे मोठा गट १४ ते १७ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयारर करून तो १६ आॅगस्टपर्यंत जिल्हा शैक्षणिक समन्वयक धनंजय जिराफे यांचेकडे नोंदवावा व निवडलेला प्रकल्प १७ आॅक्टोबर रोजी सादर करावयाचा आहे. संचालन धनंजय जिराफे यांनी केले तर आभारर कुंदन मडामे यांनी मानले. (प्रतिनिधी)