शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विज्ञानाची कास धरा, विज्ञाननिष्ठ बना

By admin | Updated: August 9, 2014 23:38 IST

सद्याचे युग हे विज्ञानाचे, माहिती तंत्रज्ञानाचे युग आहेत. नवनवीन संशोधनामुळे मानवाचे जीवन कल्याणककारी बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी, विज्ञाननिष्ठ व्हावे तसेच

चंद्रपूर : सद्याचे युग हे विज्ञानाचे, माहिती तंत्रज्ञानाचे युग आहेत. नवनवीन संशोधनामुळे मानवाचे जीवन कल्याणककारी बनले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरावी, विज्ञाननिष्ठ व्हावे तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील संशोधन वृत्तीला प्रोत्साहीन करावे असे प्रतिपादन माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांनी केले. राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेअंतर्गत आयोजित विज्ञान शिक्षकांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.देशातील १० ते १७ वयोगटातील मुलांमधील सहज नैसर्गिक कुतूहल शक्तीला व चौकसपणाला वाव देणे, पुस्तकातील विज्ञान व अवतीभवतीच्या परिसरातील विविध घटना यांचा संबंध जोडणे, मुलांच्या शास्त्रीय संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देणे तसेच मुलांमध्ये राष्ट्राच्या भविष्यकाळातील गरजांबाबत जागरूकता निर्माण करणे व वैज्ञानिक दृष्टीकोन आणि शास्त्रीय वृत्ती असलेले देशाचे भावी नागरिक घडविणे ही उद्दिष्टये समोर ठेवून भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून दरवर्षी राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे आयोजन केले जाते. सदर परिषदेचे आयोजन हे जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीयस्तरावर करण्यात येते.चंद्रपूर जिल्ह्यातील विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर येथे आयोजित करणयत आली होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भवानजीभाई चव्हाण हायस्कूलचे प्राचार्य बी.के. रामटेके होते, तर कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रविकांत देशपांडे हे होते. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. योगेश्वर दुधपचारे, प्रा. महेंद्र ठाकरे, प्रमोद कोंडलकर, कुंदन मडामे, धनंजय जिराफे यांची उपस्थिती होती.सन २०१३ मध्ये भवानजीभाई चव्हाण हायस्कूल चंद्रपूर व नेवजाभाई हितकारिणी ब्रह्मपुरी या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाची राज्यस्तरावर निवड झाली होती. हा प्रकल्प सादर करण्याच्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा याप्रसंगी शिक्षणाधिकारी रविकांत देशपांडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. व राष्ट्रीय स्तरावरील प्रकल्प सादरीकरणाचे वेळापत्रक याविषयी सविस्तर माहिती व्हावी याकरिता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत आले होते. याकरिता जिल्ह्यातील एकूण ६२ शाळांची व त्यांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.या संशोधनपर प्रकल्पाकरिता वयोगट निश्चित केलेले आहेत. लहान गट १० ते १३ वर्षे मोठा गट १४ ते १७ वर्षे या वयोगटातील विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयारर करून तो १६ आॅगस्टपर्यंत जिल्हा शैक्षणिक समन्वयक धनंजय जिराफे यांचेकडे नोंदवावा व निवडलेला प्रकल्प १७ आॅक्टोबर रोजी सादर करावयाचा आहे. संचालन धनंजय जिराफे यांनी केले तर आभारर कुंदन मडामे यांनी मानले. (प्रतिनिधी)