शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

शाळा बंद असल्याने मुलांसोबतच पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:30 IST

चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. अशावेळी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरू असला तरी अधिक वेळ मुले घरी ...

चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. अशावेळी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय सुरू असला तरी अधिक वेळ मुले घरी राहत असल्याने घराघरांत आता मुले तसेच आईवडिलांमध्ये चिडचिडपणा वाढला आहे. विशेष म्हणजे, मुले शाळेत जात नसल्याने शिस्त कमी झाली असून वाट्टेल तसे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. अशावेळी पालकांचा पारा चढत आहे.

कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुले आता घरच्या घरी राहत आहे. त्यांचा पूर्ण वेळ घरीच जात असल्यामुळे टीव्ही बघणे, मोबाईलवर खेळणे तसेच वाट्टेल तसे राहण्याचा प्रयत्न करीत आहे. विशेष म्हणजे, मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे ते घरातील कामांकडे किंवा आई-वडिलांनी सांगितलेल्या छोट्या-छोट्या कामाकडेही दुर्लक्ष करीत आहे. दिवसभर टीव्ही बघण्यासह आपल्याच आवडीचे कार्यक्रम ते बघत असल्याने घराघरांत सध्या चिडचिडपणा वाढला आहे. अशावेळी पालकांनी मुलांना समजून घेत त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केल्यास दोघांचेही मानसिक आरोग्य चांगले राहून कोरोना संकटाच्या काळातही यातून मार्ग निघणे सहज शक्य आहे.

बाॅक्स

पालकांच्या समस्या

मुले दिवसभर घरी राहत आहे. त्यामुळे वाट्टेल तिथे घरातील कोणत्याही वस्तू ठेवतात. अनेकांच्या घरात नीटनेटकेपणा राहिलेला नाही. त्यामुळे आई-वडील मुलांना रागावतात. अशावेळी घरात रुसवे-फुगवे वाढले आहेत. टीव्हीवरील कार्यक्रम बघताना मुलांच्या पसंतीचेच कार्यक्रम बघावे लागत आहेत. ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये बहुतांश घरी मुले आई-वडिलांचाच मोबाईल वापरतात. कामाच्या वेळीच मुले मोबाईल घेऊन राहतात. शाळा नसल्याने अनेकांनी अभ्यास करणे सोडून दिले आहे. त्यामुळे पालकांना ताण वाढत आहे.

बाॅक्स

मुलांच्या समस्या

शाळा बंद आहे. त्यामुळे काही मुले ऑनलाईन अभ्यासक्रम करीत आहे. मात्र दिवसभर घरी राहून कंटाळले आहे. मोबाईल, टरव्ही एवढेच त्यांचे सध्या विश्व झाले आहे. त्यामुळे मुलांमध्येही चिडचिडेपणा वाढला आहे. बाहेर जाण्यावरही निर्बंध आले आहे.त काही घरी आई-वडील दोघेही कामावर जातात. अशावेळी दिवसभर त्यांना एकटे रहावे लागत आहे. यामुळे त्यांच्यामध्ये एकाकीपणा वाढला आहे. तर माध्यमिक तसेच वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची चिंता सतावत आहे.

डाॅक्टर म्हणतात....

मुलांना बाहेर जाण्यावर त्यांच्या आवडी-निवडीवर निर्बंध आले आहे. मित्र -मैत्रिणीसोबत खेळणे बालकांना आवडतात. सध्या ते स्वतंत्र खेळू शकत नाही. त्यांच्या आवडी पालकांनी समजून घेणे सध्या अत्यंत गरजेचे आहे. त्यांना मोबाईल आणि टीव्ही यातून मुक्तता हवी आहे. मुलांच्या मनासारखे होत नसल्याने ते चिडचिडपणा करतात. मुलांच्या आवडी-निवडी ओळखून त्यांना अधिकाधिक आनंदी ठेवण्याचा प्रयत्न पालकांनी करावा. म्हणजे पालक आणि मुलांना दोघांनाही समाधान मिळेल.

-डाॅ. गोपाल मुंधडा

बालरोगतज्ज्ञ, चंद्रपूर