शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

बचत गटाची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला

By admin | Updated: April 20, 2015 01:15 IST

आर.टी. अ‍ॅक्टनुसार शालेय पोषण आहार योजनेच्या संदर्भात शालेय पोषण आहाराचे संनियंत्रण करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची आहे.

चंद्रपूर : आर.टी. अ‍ॅक्टनुसार शालेय पोषण आहार योजनेच्या संदर्भात शालेय पोषण आहाराचे संनियंत्रण करण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीची आहे. बचत गटाची नियुक्ती करण्याचे अधिकार शाळा व्यवस्थापन समितीला आहे, असे स्पष्ट मत शिक्षण उपसंचालक महेश पालकर यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेला पाठविलेल्या पत्रातून व्यक्त केले आहे. ज्या ठिकाणी बचतगट अस्तित्वात आहे, अशा ठिकाणी बचत गटामार्फत स्वयंपाकी तथा मदतनीसांची नियुक्ती करायची आहे. परंतु सत्र २०१४-१५ मध्ये नियुक्ती संदर्भात शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समितीकडे गावस्तरावर कोणतीच लेखी तक्रार नसतानासुद्धा जिल्हा परिषद प्रशासनाकडे परस्पर तक्रारी करून मुख्याध्यापकांना विनाकारण मानसिक त्रास देण्याचा प्रकार घडत आहे. म्हणून या संदर्भात वस्तुस्थिती स्पष्ट होण्याच्या दृष्टीने शासनस्तरावर २१ डिसेंबर २०१४ रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने रितसर तक्रार केली होती. शासनाने परिषदेच्या तक्रारीच्या अनुषंगाने ३१ जानेवारीला प्राथमिक शिक्षण संचालकांकडे निवेदनाच्या अनुषंगाने माहिती देण्याच्या दृष्टीने पत्र पाठविले होते. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेकडे ३१ मार्चला कार्यवाहीचे पत्र पाठविले आहे.शालेय पोषण आहार योजनेत मुख्याध्यापकाची जबाबदारी कमी करण्याबाबत २६ फेब्रुवारी २०१४ रोजीचे परिपत्रक निर्गमीत केले आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांना कळविण्यात आले असून त्यानुसार कार्यवाही करण्यात येत असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.शालेय पोषण आहार संदर्भात बचतगटाकडे इंधन व मजुरी खर्च वर्ग करण्यात येत असतो, तर शालेय पोषण आहार शिजविण्याचे काम स्वयंपाकी तथा मदतनीस करतात. त्यासाठी त्यांना स्वतंत्र मानधन दिले जाते. तसेच याबाबत स्वतंत्र अनुदान वितरीत केले जाते. सदर योजनेतून पूर्णत: मुख्याध्यापकांना वगळण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषदेने केली असली तरीही सदर योजना ही विद्यार्थी केंद्रीत असून त्यामध्ये मुख्याध्यापकांची भूमिका महत्त्वाची आहे. (प्रतिनिधी)