शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

शाळा बंदच; शालेय वस्तूची विक्री ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा यंदातरी सुरू होईल, अशी अपेक्षा शालेय वस्तूची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना होती. ...

चंद्रपूर : मागील दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा यंदातरी सुरू होईल, अशी अपेक्षा शालेय वस्तूची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना होती. मात्र अद्यापही प्राथमिक शाळा व महाविद्यालये सुरू झाली नसल्याने शालेय वस्तूची विक्री ठप्प झाली आहे. परिणामी व्यावसायिकांमध्ये चिंता पसरली आहे. सत्र सुरू होण्यापूर्वी कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली होती. त्यामुळे व्यावसायिकांना शाळा-महाविद्यालये सुरू होतील या अनुषंगाने साहित्य बोलविले. मात्र आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यात आली. त्यानंतर १६ ऑगस्टपासून प्राथमिक शाळा सुरू करण्याची घोषणा केली. मात्र काही दिवसानंतर शाळा सुरू न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आपोआपच शालेय साहित्यांची विक्री घटली आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने बुक, पेन, पुस्तकाची मागणीच नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. स्कूल बॅगची विक्री तर मागील दोन वर्षांपासून होतच नसल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. यंदा शाळा सुरू होणार या आशेने विविध साहित्य आणले होते. मात्र आता पुन्हा शाळा सुरू होण्यास किती दिवसांचा कालावधी लागतो ते सांगणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यामध्ये चिंता पसरली आहे.

कोट

दरवर्षी जून आणि जुलै महिन्यात शालेय वस्तूसाठी पालकांची गर्दी असते. मात्र मागील दोन वर्षांपासून ग्राहक कमी झाले आहेत. यंदा शाळा सुरू होईल, अशा आशेने नवीन माल आणला. मात्र शाळाच सुरू नसल्याने खपच झाला नाही.

-सुधीर रायपुरे, विक्रेता