शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रखरखत्या उन्हात भरते सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा

By admin | Updated: April 26, 2017 00:42 IST

सध्या सूर्य आग ओकत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उन्हामुळे विदर्भातील नागरिक कमालीचे त्रस्त असून याचा विद्यार्थ्यांनाही फटका बसत आहे.

भद्रावती शहरातील प्रकार : विद्यार्थी बेहाल, पालक चिंताग्रस्तविनायक येसेकर भद्रावतीसध्या सूर्य आग ओकत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उन्हामुळे विदर्भातील नागरिक कमालीचे त्रस्त असून याचा विद्यार्थ्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे अनेक जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जात आहेत. मात्र येथील सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या शासकीय केंद्रीय विद्यालयाचे सत्र दुपार पाळीतच सुरु आहेत. यामुळे विद्यार्थी कमालीचे त्रस्त असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे.भद्रावती शहरातील वातावरणाचा विचार केल्यास येथील शाळा सकाळ पाळीत घेणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणे विदर्भात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वाढले आहे. या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या काळात थंड पेय घेण्याचाही सल्लाही दिल्या जात आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचे तापमान देशात सर्वाधिक असल्याची नोंद झाली. एवढ्या मोठ्या तप्त वातावरणात मात्र सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळा व महाविद्यालये सुरु आहेत. या शाळांमध्ये वयाचे सहा वर्षापासून ते १८ वर्षापर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा वातावरणात शिक्षण तर दूरच परंतु त्यांच्या शारिरीक, आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. वर्ग खोलीत साधे पंखे असल्याने ते वातावरणातील गरम हवा देतात. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होतो. शाळा सुटल्यानंतर शाळेपासून घरापर्यंत प्रत्येक विद्यार्थी स्वत:च्या वाहनाने, आॅटो व स्कूल बसने जात असतात. प्रत्यक्ष या शाळांना भेट देवून तेथील मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, सर्कुलरनुसार आम्हाला शाळा सुरु ठेवावी लागते. त्यामुळे आमचा नाईलाज आहे. एवढ्या उष्ण वातावरणात या भागातील शाळांना सुट्टी असने आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आमच्या पाल्यांची अवस्था पाहू जात नाही, असे मत पालकांनी व्यक्त केले. त्यामुळे केंद्र शासनाने येथील वातावरणाचा विचार करुन शाळेच्या वेळापत्रकात बद्दल करावा, जेणेकरुन उन्हाचा त्रास होणार नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. केंद्रीय शिक्षण विभागाला देणार निवेदनरखरखत्या उन्हात सीबीएससी अभ्यासक्रमाचे खासगी व शासकीय केंद्रीय विद्यालय सुरु असल्याने त्याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तप्त वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा वातावरणात त्यांचे शिक्षणावर लक्ष लागत नाही. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अतिवृष्टी किंवा बर्फवृष्टी झाली तर त्या-त्या भागातील स्थानिक प्रशासन शाळा बंद ठेवत असते. मग एवढ्या तप्त उन्हात या शाळाां सुट्ट्या का नाही, केंद्रीय शिक्षण विभाग जिल्हाधिकारी, ना. हंसराज अहीर यांना यासंदर्भातील निवेदन देणार असल्याचे भद्रावती शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप ठेंगे यांनी सांगितले.अन्यथा आंदोलन करणारवातावरणामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांचा विचार न करता केंद्र शासनाच्या सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळा एप्रिल व मे महिन्याच्या कडक उन्हातही सुरु असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिकत्तेवर परिणाम होत आहे. या शाळा राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे सुरु ठेवाव्यात यासाठी संबंधीतांना निवेदन पाठविले जाईल. निवेदनाची दखल न घेतल्यास आपण आंदोलन उभारु, असा इशारा भाकपाचे जिल्हा सहसचिव राजू गैणवार यांनी दिला आहे.