शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रखरखत्या उन्हात भरते सीबीएसई अभ्यासक्रमाची शाळा

By admin | Updated: April 26, 2017 00:42 IST

सध्या सूर्य आग ओकत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उन्हामुळे विदर्भातील नागरिक कमालीचे त्रस्त असून याचा विद्यार्थ्यांनाही फटका बसत आहे.

भद्रावती शहरातील प्रकार : विद्यार्थी बेहाल, पालक चिंताग्रस्तविनायक येसेकर भद्रावतीसध्या सूर्य आग ओकत असल्याने जिवाची लाही-लाही होत आहे. उन्हामुळे विदर्भातील नागरिक कमालीचे त्रस्त असून याचा विद्यार्थ्यांनाही फटका बसत आहे. त्यामुळे अनेक जिल्हा परिषद शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जात आहेत. मात्र येथील सीबीएसई अभ्यासक्रम असलेल्या शासकीय केंद्रीय विद्यालयाचे सत्र दुपार पाळीतच सुरु आहेत. यामुळे विद्यार्थी कमालीचे त्रस्त असून त्यांच्या आरोग्यावर परिणाम जाणवत आहे.भद्रावती शहरातील वातावरणाचा विचार केल्यास येथील शाळा सकाळ पाळीत घेणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणे विदर्भात एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच तापमान वाढले आहे. या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या काळात थंड पेय घेण्याचाही सल्लाही दिल्या जात आहे. काही दिवसांपूर्वी चंद्रपूरचे तापमान देशात सर्वाधिक असल्याची नोंद झाली. एवढ्या मोठ्या तप्त वातावरणात मात्र सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळा व महाविद्यालये सुरु आहेत. या शाळांमध्ये वयाचे सहा वर्षापासून ते १८ वर्षापर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा वातावरणात शिक्षण तर दूरच परंतु त्यांच्या शारिरीक, आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. वर्ग खोलीत साधे पंखे असल्याने ते वातावरणातील गरम हवा देतात. त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होतो. शाळा सुटल्यानंतर शाळेपासून घरापर्यंत प्रत्येक विद्यार्थी स्वत:च्या वाहनाने, आॅटो व स्कूल बसने जात असतात. प्रत्यक्ष या शाळांना भेट देवून तेथील मुख्याध्यापकांना विचारणा केली असता, सर्कुलरनुसार आम्हाला शाळा सुरु ठेवावी लागते. त्यामुळे आमचा नाईलाज आहे. एवढ्या उष्ण वातावरणात या भागातील शाळांना सुट्टी असने आवश्यक आहे, असे ते म्हणाले. आमच्या पाल्यांची अवस्था पाहू जात नाही, असे मत पालकांनी व्यक्त केले. त्यामुळे केंद्र शासनाने येथील वातावरणाचा विचार करुन शाळेच्या वेळापत्रकात बद्दल करावा, जेणेकरुन उन्हाचा त्रास होणार नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. केंद्रीय शिक्षण विभागाला देणार निवेदनरखरखत्या उन्हात सीबीएससी अभ्यासक्रमाचे खासगी व शासकीय केंद्रीय विद्यालय सुरु असल्याने त्याठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तप्त वातावरणाचा त्रास सहन करावा लागत आहे. अशा वातावरणात त्यांचे शिक्षणावर लक्ष लागत नाही. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अतिवृष्टी किंवा बर्फवृष्टी झाली तर त्या-त्या भागातील स्थानिक प्रशासन शाळा बंद ठेवत असते. मग एवढ्या तप्त उन्हात या शाळाां सुट्ट्या का नाही, केंद्रीय शिक्षण विभाग जिल्हाधिकारी, ना. हंसराज अहीर यांना यासंदर्भातील निवेदन देणार असल्याचे भद्रावती शहर काँग्रेस अध्यक्ष दिलीप ठेंगे यांनी सांगितले.अन्यथा आंदोलन करणारवातावरणामुळे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या परिणामांचा विचार न करता केंद्र शासनाच्या सीबीएससी अभ्यासक्रमाच्या शाळा एप्रिल व मे महिन्याच्या कडक उन्हातही सुरु असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शारिरीक व मानसिकत्तेवर परिणाम होत आहे. या शाळा राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे सुरु ठेवाव्यात यासाठी संबंधीतांना निवेदन पाठविले जाईल. निवेदनाची दखल न घेतल्यास आपण आंदोलन उभारु, असा इशारा भाकपाचे जिल्हा सहसचिव राजू गैणवार यांनी दिला आहे.