शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पहाडावरील जिल्हा परिषद शाळांची खिचडी तीन महिन्यांपासून बंद

By admin | Updated: October 3, 2015 00:59 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांत मागील तीन महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचा ..

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : शालेय पोषण आहार योजना कुचकामीशंकर चव्हाण जिवतीअतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांत मागील तीन महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचा पुरवठा कंत्राटदारामार्फत होत नसल्याने कोणत्याच शाळेत खिचडी शिजत नसल्याचा प्रकार पहायला मिळत आहे. याकडे मात्र संबंधित शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असून शालेय पोषण आहार योजनेचा पुर्णत: बोजबारा उडत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. शासन आदेशानुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण थांबवावे, सकस आहाराने त्यांंच्या बुद्धीचा विकास व्हावा, या हेतुने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. मात्र संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून शाळेत खिचडी शिजत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना उपाशीपोटी शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. सध्या परिसरात शेतीच्या कामाला वेग आल्याने घरी कुणीच राहत नाही. त्यामुळे शाळकरी मुलांना जेवणाचा वांदा आहे. ‘घरीही कुणी नाही आणि शाळेतही खिचडी शिजत नाही’ मग त्या विद्यार्थ्यांनी करावे काय, उपाशीपोटीच शैक्षणिक धडे घ्यावे का, त्यांच्यात खरच शाळेत येऊन शिक्षण घेण्याचा उत्साह दिसेल काय, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. एखाद्या वेळेस काही अडचणी अभावी शिक्षकाने शाळेत खिचडी शिजवली नाही तर त्याला शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धारेवर धरले जाते. मग पहाडावरील जिल्हा परिषद शाळांत गत तीन महिन्यापासून पोषण आहाराअभावी खिचडी शिजत नाही, त्याचे काय. याला जबाबदार कोण. शिक्षण विभाग की, कंत्राटदार, मग ते कार्यवाही पात्र ठरत नाही का, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असले तरी शिक्षण विभाग मात्र बघ्याची भूमिका घेऊन आहे. या संदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.