शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

पहाडावरील जिल्हा परिषद शाळांची खिचडी तीन महिन्यांपासून बंद

By admin | Updated: October 3, 2015 00:59 IST

अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांत मागील तीन महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचा ..

शिक्षण विभागाचे दुर्लक्ष : शालेय पोषण आहार योजना कुचकामीशंकर चव्हाण जिवतीअतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांत मागील तीन महिन्यांपासून शालेय पोषण आहाराचा पुरवठा कंत्राटदारामार्फत होत नसल्याने कोणत्याच शाळेत खिचडी शिजत नसल्याचा प्रकार पहायला मिळत आहे. याकडे मात्र संबंधित शिक्षण विभागाचे दुर्लक्ष होत असून शालेय पोषण आहार योजनेचा पुर्णत: बोजबारा उडत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. शासन आदेशानुसार प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण थांबवावे, सकस आहाराने त्यांंच्या बुद्धीचा विकास व्हावा, या हेतुने शालेय पोषण आहार योजना सुरू केली. मात्र संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्या दुर्लक्षितपणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून शाळेत खिचडी शिजत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना उपाशीपोटी शिक्षणाचे धडे घ्यावे लागत आहे. सध्या परिसरात शेतीच्या कामाला वेग आल्याने घरी कुणीच राहत नाही. त्यामुळे शाळकरी मुलांना जेवणाचा वांदा आहे. ‘घरीही कुणी नाही आणि शाळेतही खिचडी शिजत नाही’ मग त्या विद्यार्थ्यांनी करावे काय, उपाशीपोटीच शैक्षणिक धडे घ्यावे का, त्यांच्यात खरच शाळेत येऊन शिक्षण घेण्याचा उत्साह दिसेल काय, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. एखाद्या वेळेस काही अडचणी अभावी शिक्षकाने शाळेत खिचडी शिजवली नाही तर त्याला शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून धारेवर धरले जाते. मग पहाडावरील जिल्हा परिषद शाळांत गत तीन महिन्यापासून पोषण आहाराअभावी खिचडी शिजत नाही, त्याचे काय. याला जबाबदार कोण. शिक्षण विभाग की, कंत्राटदार, मग ते कार्यवाही पात्र ठरत नाही का, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत असले तरी शिक्षण विभाग मात्र बघ्याची भूमिका घेऊन आहे. या संदर्भात चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आहे.