शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नदी, नाले पार करून २५० किलोमीटरवर पोहचवली शालेय पुस्तके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2020 21:49 IST

जिल्हाबंदी हटताच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संस्थाध्यक्ष गजानन पाथोडे व संस्थासचिव जान्हवी पाथोडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चारही तालुक्यातील ८५ गावामधील २०० विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पोहचविण्याचा धाडसी उपक्रम हाती घेण्यात आला व यशस्वी करण्यात आला.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचे नुकसान टाळलेशिक्षकांची सामाजिक बांधिलकी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कानपा येथील आश्रमशाळेच्या शिक्षकांनी २०० ते २५० किमी अंतरावर असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके पोहचवून दिली. त्यांचा हा उपक्रम कोरोना काळात प्रशंसनीय ठरला आहे.तालुक्यातील कानपा येथे मातोश्री लक्ष्मीबाई आदिवासी प्राथ व माध्य.आश्रम शाळा तसेच स्व.वासुदेवराव पाथोडे कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आहे. यात एकूण ४०० च्या जवळपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यात चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मात्र देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यसरकारने १५ मार्चपासून शाळा बंद केल्या तर केंद्र सरकारने २३ मार्चपासून देशात टाळेबंदी केली असल्याने शाळा बंद आहेत.

या शाळेत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, सिरोंचा, आरमोरी, वडसा, एटापल्ली तालुक्यातील ८५ गावातील २०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अतिशय सुसज्ज इमारत, राहण्याची व शिक्षणाची उत्तम व्यवस्था, यामुळे या आश्रमशाळेत दुरुदुरुन विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र कोरोना विषाणूचे संक्रमण वाढत असल्याने सरकारने वेळोवेळी टाळेबंदी वाढवली. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी संस्थेचे अध्यक्ष गजानन पाथोडे यांच्या सूचनेनुसार ज्या ठिकाणी विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणी समुपदेशकांची नियुक्ती करून सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवून शैक्षणिक मार्गदर्शन सुरू आहे. सोशल मीडियाचा वापर करून ज्या भागात नेटवर्कची सेवा उपलब्ध आहे, अशा भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचेही काम सुरू आहे.

जिल्हाबंदी हटताच प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांनी संस्थाध्यक्ष गजानन पाथोडे व संस्थासचिव जान्हवी पाथोडे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्ह्यातील चारही तालुक्यातील ८५ गावामधील २०० विद्यार्थ्यांना घरपोच पुस्तके पोहचविण्याचा धाडसी उपक्रम हाती घेण्यात आला व यशस्वी करण्यात आला. ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या घरी पोहचवत असताना अनेक अडचणी आल्या. अनेक ठिकाणी शिक्षकांना स्थानिक लोकांची मदत घेत नदी, नाले डोक्यावर पुस्तकांचा गठ्ठा घेऊन पार करावे लागले. तर काही दुर्गम व डोंगराळ भागात ४ ते ५ किलोमीटर डोक्यावर पुस्तके घेऊन पायपीट करत विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत पोहचावे लागले. यात पालक व विद्यार्थी यांनी सर्व शिक्षकांना सहकार्य केले. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र