शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ंअंत्यविधीसाठी लाकडांचा तुटवडा

By admin | Updated: February 17, 2017 00:57 IST

मृत्यू झाल्यानंतर त्या-त्या धर्माच्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात.

२० किमीहून पुरवठा : महिनाभरापासून साठा नाही चंद्रपूर : मृत्यू झाल्यानंतर त्या-त्या धर्माच्या रिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जातात. हिंदूत मृत देहाला अग्नि देऊन पंचतत्वात विलीन केले जाते. मात्र, राजुरा परिसरातील मृतांच्या आप्तांना एका नव्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे. वनविभागाच्या लाकूड विक्री केंद्रात गत महिनाभरापासून जळाऊ लाकूडच उपलब्ध नाही. त्यामुळे मृतदेह जाळण्यासाठी लाकडांचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडून लाकडांची जुळवाजुळव करावी लागत आहे. राजुरा येथे वनविभागात लाकूड विक्री केंद्र आहे. मृतदेह जाळण्यासाठी येथून लाकडे विकत घेतली जातात. यापूर्वी अंत्यविधीकरिता जळाऊ लाकडे मिळाली नाहीत, असा प्रसंग आला नाही. मागील एका महिन्यापासून येथे लाकडांचा साठाच शिल्लक नाही. १३ जानेवारीला सोमनाथपूर वॉर्डातील निवासी कोवे यांचा मृत्यू झाला. अंत्यविधीसाठी लाकडे आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक वनविभागाच्या विक्री केंद्रात गेले. तेव्हा गत एका महिन्यांपासून लाकूड उपलब्ध नसल्याचे समोर आले. त्यांना २० किलोमीटर अंतरावरील कळमना बिटातून लाकडे आणावी लागली. आता मंगळवारला तालुक्यातील पंचाळा गावचे निवासी नीलकंठ कोडापे आणि यादवराव चोतले या दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या अंत्यविधीसाठीही विक्री केंद्रात लाकूड मिळाले नाही. जळाऊ लाकडे होती. ती सार्वजनिक स्वयंपाकासाठी मोठ्या प्रमाणात विकल्या गेली. सध्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गावागावात भोजनावळी उठल्या. त्यासाठी तेथे जळाऊ लाकडांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असावी, असा अंदाज आहे. लाकडांसाठी स्थानिक नेतेमंडळी दबाव टाकत असल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे समजते. वनविभागाच्या आलापल्ली डेपोकडे जळाऊ लाकडांची मागणी मागील एका महिन्यापूर्वी केली आहे, अशी माहिती वनविभाग देत आहे. अद्याप मागणीची पूर्तता झाली नाही. त्यामुळे राजुरा परिसरातील मृत व्यक्तीला मरणानंतरही मरणयातना भोगाव्या लागत आहेत. यासंदर्भात वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता गांभीर्याने पावले उचलून लवकरात लवकर लाकडे उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)