शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी सावित्रीच्या लेकींचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:26 IST

पुरामुळे दोन महिन्यांपूर्वी रस्त्याची कड खचली आणि रस्ता पुर्णत: पोखरला गेला. तेव्हापासून महामंडळाची एसटी गावात येणे बंद झाले आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी जावे लागते. परंतु गावात बस येत नसल्याने सावित्रींच्या लेकींचा दोन महिन्यांपासून पायदळ प्रवास सुरू आहे. रस्ता दुरूस्त करायला सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी व गावकऱ्यांनी केला आहे.

ठळक मुद्देरस्ता खचल्याने गावात बस येईना : विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी हाल

प्रकाश काळे।लोकमत न्यूज नेटवर्कगोवरी : पुरामुळे दोन महिन्यांपूर्वी रस्त्याची कड खचली आणि रस्ता पुर्णत: पोखरला गेला. तेव्हापासून महामंडळाची एसटी गावात येणे बंद झाले आहे. शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना शहराच्या ठिकाणी जावे लागते. परंतु गावात बस येत नसल्याने सावित्रींच्या लेकींचा दोन महिन्यांपासून पायदळ प्रवास सुरू आहे. रस्ता दुरूस्त करायला सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी व गावकऱ्यांनी केला आहे.गाव तिथे एसटी अशी शासनाची योजना आहे. त्याप्रमाणे गावात एसटी येऊ लागली. मात्र दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुरामुळे राजुरा - कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या हरदोना खुर्द उपरवाही या मार्गावरील नाल्याला आलेल्या पुरामुळे रस्त्याची कड खचली. पाण्याच्या जोरदार प्रवाहाने डांबरी रस्ता आतून पूर्णत: पोखरला गेला आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांचा कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतो, यासाठी हा मार्ग मोठ्या वाहनांसाठी बंद केला असून शासनाची चंदनवाही - मंगी मार्गे उपरवाही आणि हरदोनावरून गडचांदूरला जाणारी एसटी बंद झाली आहे.शिक्षणासाठी या परिसरातील विद्यार्थ्यांना गडचांदूरला जावे लागते. परंतु रस्त्याअभावी बस बंद झाली असून नागरिकांना व विद्यार्थ्यांना पायदळ प्रवास करीत शिक्षणासाठी जावे लागत आहे.एकीकडे शासनाने रस्ते हॉयटेक करण्याचा संकल्प केला असतानाच राजुरा - कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या उपरवाही - हरदोना खुर्द मार्गाची कड खचली असून आतून रस्ता पोखरला आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी हरदोना येथील नागरिक मुर्लीधर, मांडवकर, संतोष बलकी, यादव ठेंगणे, प्रवीण खाटे, कमलेश राजूरकर, महेंद्र बावणे, नरेश राजूरकर, दशरथ ढवस आणि गावकरी व विद्यार्थ्यांनी केली आहे.बांधकाम विभागाला जाग येणार केव्हा ?दोन महिन्यांपूर्वी आलेल्या पुराने उपरवाही हरदोना खुर्द रस्त्याची कड खचून रस्ता आतून पाण्याच्या प्रवाहाने पोखरला. मात्र दुरूस्ती करण्याचे सौजन्य अजूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने दाखविले नाही.