शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

सावरगाववासी घरकूलपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घरकूल देण्यासाठी जिल्ह्याला लक्ष्यांक दिला आहे. सावरगव हे मोठे गाव असल्याने सदर योजनेतंर्गत लाभार्थ्यांची प्रपत्र ड यादी मागील वर्षी प्रसिद्ध झाली. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या अधिकृत जागेचा छायायाचित्रासह जिओ टॅग केला. मात्र अजूनपर्यंत घरकूल मंजूर केले नाही. त्यामुळे गरीब कुटुंबांना सदर योजनेपासून वंचित राहावे लागत आहे.

ठळक मुद्देप्रक्रिया रखडली : २२३ कुटुंबांमध्ये तीव्र नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील पात्र कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेतून घरकूल देण्यासाठी गतवर्षीच प्रपत्र ड यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत विविध प्रवर्गातील २२३ कुटुंबांची नावे नमुद आहेत. त्यांच्या मालकीच्या जागेचा जीओ टॅगही झाला. मात्र, वर्ष लोटूनही अद्याप घरकूल न मिळाल्याने पात्र कुटुंबांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घरकूल देण्यासाठी जिल्ह्याला लक्ष्यांक दिला आहे. सावरगव हे मोठे गाव असल्याने सदर योजनेतंर्गत लाभार्थ्यांची प्रपत्र ड यादी मागील वर्षी प्रसिद्ध झाली. पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या अधिकृत जागेचा छायायाचित्रासह जिओ टॅग केला. मात्र अजूनपर्यंत घरकूल मंजूर केले नाही. त्यामुळे गरीब कुटुंबांना सदर योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यात बºयाच कुटुंबांची घरे कोसळली. ही कुटुंबे घरकूल योजनेसाठी पात्र आहेत. परंतु, त्यांना पक्के घर नसल्याने मोडक्या घरातच वास्तव्य करावे लागत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी लागू केलेल्या निकषात ही कुटुंबे येतात. बीपीएल यादीत नावे समाविष्ट असल्याने त्यांनी घरकूलसाठी अर्ज केला होता. तालुक्यातील अन्य गावांमध्ये प्रधानमंत्री योजनेची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने अनेकांना लाभ मिळाला. मात्र, सावरगाव येथे ही प्रक्रिया रखडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पंचायत समितीच्या संबंधित विभागाने योग्य पाठपुरावा न केल्याने सावरगावातील पात्र कुटुंबांवर अन्याय झाला. त्यामुळे अनेक कुटुंबे झोपडीत राहून दिवस ढकलत आहेत. काही भाड्याच्या घरात वास्तव्य करीत आहेत. अन्य पर्याय नसल्याने काहींनी पडक्या घरालाच आश्रय मानले आहे. पावसामुळे घराची पडझड झाल्याने एक कुटुंब समाज मंदिरात राहत आहे. बाबुराव शेंदरे यांच्या घराच्या दोन्ही भिंती खचल्या. पण घरकूल नसल्याने भिंतीला काठीचा आधार देऊन कुटुंबासह तिथेच वास्तव्य करीत असल्याचे दिसून येत आहे.ओबीसी कुटुंबांना घरकूलची प्रतिक्षापिंपळगाव (भो) : ब्रह्मपुरी तालुक्यातील पिंपळगाव (भो.) व परिसरातील गावांमध्ये ओबीसी प्रवर्गातील शेकडो कुटुंबे आहेत. पण, आर्थिकदृष्ट्या गरीब व दारिद्रयरेषेखालील येथील ओबीसी प्रवर्गातील कुटुंबांना शासनाकडून अद्याप घरकूल मिळाले नाही. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळावा, याकरिता शासनाने ओबीसी प्रवर्गाला काही जागा राखीव ठेवल्या. परंतु, पंचायत समितीने यासंदर्भात कार्यवाही न केल्याने वंचित राहावे लागत आहे. काही कुटुंबांचा उदरनिर्वाह केवळ मजुरीतूच सुरू आहे. घर बांधण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. मुला-मुलींच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी या कुटुंबांची दमछाक होत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ओबीसी प्रवर्गातील घरकूलचा प्रश्न सोडविण्याची मागणी नागरिकांनी पंचायत समितीकडे केली.परिस्थिती हलाखीची असल्याने घर बांधू शकलो नाही. अनेक वर्षांपासून अपूर्णावस्थेत असलेल्या पडक्या समाज मंदिरात कुटुंबासह राहत आहे. माझे नाव ड यादीत आले आहे. परंतु, अजूनपर्यंत घरकूल मिळाले नाही.- रामदास पालकर, सावरगाव

टॅग्स :Pradhan Mantri Awas Yojanaप्रधानमंत्री आवास योजना