शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

साता समुद्रापलिकडून मदतीचा हात

By admin | Updated: February 5, 2016 00:50 IST

व्हाटस्अ‍ॅप, फेसबुकमुळे २३ वर्षांपूर्वीच्या मैत्रीचा धागा पुन्हा जुळला. कॉलेज जीवनातील मैत्रीचे रूपांतर संभाषणात झाले.

गावकरी भारावले : जुने ऋनाणुबंध फेसबुकमुळे पुन्हा जुळलेचंद्रपूर : व्हाटस्अ‍ॅप, फेसबुकमुळे २३ वर्षांपूर्वीच्या मैत्रीचा धागा पुन्हा जुळला. कॉलेज जीवनातील मैत्रीचे रूपांतर संभाषणात झाले. शिक्षणाची आवड असल्यामुळे राजशेखर चिंतापल्ली यांनी थेट सातासमुद्रापलिकडून कोरपना तालुक्यातील हेटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पाच हजार रुपयांची मदत पाठविली. परिणामी गावकऱ्यांनीसुद्धा शाळेला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सातासमुद्रापलिकडून आलेल्या मदतीचे गावकऱ्यांनी भरभरून कौतुक केले. हेटी येथील शाळा व्यवस्थापन समितीनेसुद्धा त्यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित केला.राजशेखर चिंतापल्ली आणि मुख्याध्यापक अरूण उमरे हे दोघेही नागपूर येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये सन १९९२-९३ मध्ये मायनिंग या शाखेला शिक्षण घेत होते. त्यानंतर राजशेखर चिंतापल्ली यांनी व्हीआरसीई नागपूर येथून इंजिनिअरींगची पदवी पूर्ण केली. त्यानंतर विविध ठिकाणी त्यांनी भारतात नोकरी केली. मागील १३ वर्षापासून अमेरिका देशातील चेरी हिल, न्यु जर्सी येथे ते स्थायिक झाले. ते एनर्जी सर्व्हीस कंपनी, फिलाडेफिया येथे मोठ्या पदाच्या नोकरीवर कार्यरत आहे.राजशेखर चिंतापल्ली यांना शिक्षणाची आवड आहे. काही महिण्यापूर्वी अरुण उमरे आणि राजशेखर चिंतापल्ली हे फेसबुक, व्हाटस्अ‍ॅपमुळे जवळ आले. काही दिवसांपूर्वी मला शाळेला मदत करायची आहे, असे त्यांचे बोलणे झाले. उमरे यांनी होकार देताच राजशेखर चिंतापल्ली यांनी त्यांच्या वैयक्तिक खात्यावर पाच हजार रुपयांची मदत जमा केली. याचा उलगडा मुख्याध्यापक अरुण उमरे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गावकऱ्यांसमोर केला. त्यामुळे गावकऱ्यांचा आनंद गगणात मावेनासा झाला. आपल्या हेटी गावाशी काही एकनाते नसताना परदेशातून मदत आली. म्हणून आपणही शाळेला दान द्यावे, या हेतुने ज्याच्या त्याच्या परीने गावकरी शाळेला मदत करू लागले आहेत. त्यानंतर राजशेखर चिंतापल्ली यांच्याशी अरुण उमरे यांनी संवाद साधला. गावकरीसुद्धा शाळेला मदत करीत असल्याची माहिती दिली. त्यामुळे त्यांना खुप आनंद झाला. अमेरिकेतील लोकांना हसता येत नाही. आपल्या भारत देशातील लोक प्रत्येक विनोदावर हसतात. वेळप्रसंगी गंभीरही होतात. त्यामुळे हसण्याचा आनंद घेण्याकरिता भारतातील मित्र, नातेवाईकांशी नेहमी संवाद साधत असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.सातासमुद्रापलिकडून राजशेखर चिंतापल्ली यांची हेटी शाळेला आलेली मदत खरच वाखाणण्याजोगी आहे. त्यांच्या आलेल्या मदतीतून शाळेतील संरक्षण भिंत बोलकी करण्याचा मानस आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी चालता, बोलता, खेळताना शिकेल, त्यांची उत्तरोत्तर प्रगती होईल, असे मुख्याध्यापक अरुण उमरे यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)