शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

सीईओंच्या व्हिसीने वाढला सरपंचांचा आत्मविश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST

द्रपूर जिल्ह्यात सध्यातरी एकही कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. असे असले तरी सर्तकता म्हणून प्रत्येक बारीकसारिक गोष्टींवर लक्ष दिल्या जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने गावातील आढावा घेण्यासाठी थेट सरपंचासोबत संवाद साधून माहिती जाणून घेतली.

ठळक मुद्देजाणून घेतली माहिती : कोरोनाला हरवायचे, घराबाहेर नाही पडायचे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा प्रादूर्भाव जिल्ह्यात होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांपासून गावपातळीवरील सर्व कर्मचारीही कामाला लागले आहे. दरम्यान, कोरोनाविषयी गावातील परिस्थिती जाणून घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहूल कर्डिले, उपमुख्य कार्यपालन अधिकारी निलेश काळे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सरपंचासोबत संवाद साधला. या संवादामुळे कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सरपंचाचा आत्मविश्वास वाढला असून गावपातळीवर ते अधिक जोमाने कामाला लागले आहे.चंद्रपूर जिल्ह्यात सध्यातरी एकही कोरोना रुग्ण नाही. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला थोडाफार दिलासा मिळाला आहे. असे असले तरी सर्तकता म्हणून प्रत्येक बारीकसारिक गोष्टींवर लक्ष दिल्या जात आहे. दरम्यान, जिल्हा परिषद प्रशासनाने गावातील आढावा घेण्यासाठी थेट सरपंचासोबत संवाद साधून माहिती जाणून घेतली.सरपंचांनी दिली गावातील संपूर्ण माहितीजिल्हा प्रशासनाने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद साधल्यामुळे गावागावांतील सरपंचाचा आत्मविश्वास वाढला असून त्यांनीही कोरोनासंदर्भात गावातील परिस्थितीची अधिकाऱ्यांजवळ संपूर्ण माहिती कथन केली. प्रशासकीय यंत्रणांसोबत आपणही त्याच जोमाने काम करणार असून कोणत्याही परिस्थितीत कोरोनावर मात करू, असा विश्वासही सरपंचानी यावेळी व्यक्त केला.या प्रश्नांची जाणून घेतली माहितीगावामध्ये स्वच्छता केली काय, फवारणी सुरु आहे का, ग्राम पंचायत स्तरावर समिती स्थापन केली काय, बाहेर गावावरून आलेले विलगीकरणात राहतात काय, प्रचार प्रसिद्ध कोणत्या प्रकारे केली आहे. साबण वाटप केले काय, हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले काय, गावात पुरेसा टीसीएल साठा आहे काय, गावामध्ये असंघटीत मजुर आहे का, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू पुरवठादारांची यादी प्रसिद्ध केली काय, जीवनावश्यक वस्तू पुरवठा करताना दोन ग्राहकांमध्ये अंतर ठेवल्या जाते काय.नियंत्रण कक्षातून १० हजारांवर नागरिकांसोबत संवादकोवीड- कोरोनाला हरवायचे, घराबाहेर नाही पडायचे या अंतर्गत मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने नियंत्रण कक्षातून १० हजारांच्यावर नागरिकांसोबत संवाद साधून परिस्थिती जाणून घेतली. येवढेच नाही तर कोरोनासंदर्भात आवश्यक ती माहिती देण्यात आली. यामुळे नागरिकांचा गैरसमजही दूर केला जात आहे.कोरोनाविषयक गावातील प्रत्येक गोष्टींची माहिती घेण्यासाठी संवाद साधण्यात आला. सरपंचांनी यासंदर्भात सुरु असलेल्या कामाची माहिती दिली. या संवादातून गावागावांत सुरु असलेल्या कामाची माहिती मिळाली.- राहुल कर्डिले,मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :sarpanchसरपंच