शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

सरपंचपदाचा राजीनामा द्यावा

By admin | Updated: May 31, 2017 01:51 IST

भिसी ग्रा.पं.चे सरपंच अरविंद रेवतकर यांना तीन अपत्य असल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने अपात्र घोषीत केले.

लोकमत न्यूज नेटवर्क भिसी : भिसी ग्रा.पं.चे सरपंच अरविंद रेवतकर यांना तीन अपत्य असल्याच्या कारणावरुन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने अपात्र घोषीत केले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता चंद्रपूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रेवतकर यास सदस्य पदावरुन अपात्र घोषित करण्याचे आदेश दिले आहे.त्यामुळे रेवतकर यांनी सरपंच पदाचा राजीनामा द्यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य देवा मुंगले व राजू गभणे यांनी केली आहे. भिसी येथील सरपंच अरविंद रेवतकर यांनी तीन अपत्य असूनही ग्रामपंचायत नामांकन अर्ज दाखल करताना अपत्यासंबंधीच्या दाखल्यावर दोन मुली असल्याचा उल्लेख केला होता. आॅगस्ट २०१५ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अरविंद रेवतकर गटाने १७ पैकी आठ सदस्य निवडून आणले. सत्ता स्थापनेच्या वेळी ठोंबरे गटाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. सरपंच पदावर रूजू होताच अरविंद रेवतकर यांच्या विरोधात धनराज मुंगले यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदविली. सदर तक्रारीसोबत अरविंद रेवकर यांना तीन अपत्य असून तिसरी मुलगी स्वरा उर्फ परी अरविंद रेवकर हिचा जन्म ८ आॅगस्ट २०१४ ला झाला असल्याचे तक्रारीत निदर्शनास आणून दिले. त्यामुळे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम १४ -१ नुसार चंद्रपूर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी २८ जानेवारी २०१६ ला अरविंद रेवकर यांना अपात्र घोषित केले. त्यानंतर रेवतकर यांनी उच्चायुक्त कार्यालय नागपूर व त्यानंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली. याचिकेवर उच्च न्यायालयात सर्व माहितीच्या आधारे अरविंद रेवतकरवर एक लाख पाच हजाराचा दंड ठोठावला. तर चंद्रपूरच्या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी रेवतकर यांना अपात्र घोषित करण्याचा आदेश दिला. वरील सर्व मुद्यांचा विचार करता सरपंच अरविंद रेवतकर यांनी तात्काळ स्वत:ची नैतिक जबाबदारी समजून कायद्याच्या नियमाचे पालन करीत आपल्या सरपंच पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी ग्रापंचायत सदस्य देवा मुगंले व राजू गभणे यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकातून केली आहे.