शहरं
Join us  
Trending Stories
1
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
2
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
3
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
5
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
6
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
7
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
8
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
9
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
10
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
11
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
12
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
13
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
14
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
15
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
16
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
17
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
18
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
19
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
20
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश

येल्लापूरच्या सरपंचाने थाटला समाज भवनात संसार

By admin | Updated: March 10, 2017 02:00 IST

गावातील समाज बांधवांना सामाजिक कार्यक्रम व इतर कार्य करण्यासाठी एकत्र बसण्याची सोय व्हावी,

सरपंचाची हुकूमशाही : चौकशी करून कारवाई करण्याची मागणीजिवती : गावातील समाज बांधवांना सामाजिक कार्यक्रम व इतर कार्य करण्यासाठी एकत्र बसण्याची सोय व्हावी, यासाठी शासनाने आमदार निधीतून येल्लापूर येथील गोंडगुडा येथे सामाजिक सभागृहाचे बांधकाम करून दिले. मात्र त्या सभागृहाचा वापर सामाजिक कायार्साठी न होता खुद सरपंचानेच आपला आटाचक्की व संसार चालविण्यासाठी करीत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व संवर्ग विकास अधिकारी जिवती यांच्याकडे नागरिकांनी केली आहे. जीवती तालुक्यातील येल्लापूर ग्रामपंचायतीमध्ये चार गावे येत असून येथील लोकसंख्या १ हजार २५४ तर कुटुंब संख्या ४१८ आहे. गावात नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जातात. हे उपक्रम राबविण्यासाठी सामाजिक सभागृहाची गरज नेहमीच पडत असते. परंतु सभागृह असूनही समाज कायार्साठी उपयोगी पडत नाही. गेल्या कित्येक वषार्पासून येथील सरपंच माधव कान्हु पेंदोर यांनी आपली हुकुमशाही दाखवित समाज भवनात अटाचक्की लावून संसार थाटल्याचा प्रकार गावकऱ्यांनी उजेडात आणला आहे. याबाबत नागरिकांनी जिवतीचे संवर्ग विकास अधिकारी व ग्रामसेवक यांना लेखी तक्रारी दिल्या होत्या. मात्र त्याकडे कोणीही लक्ष न दिल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. एकीकडे सरपंच म्हणजे गावचा पुढारी समजला जातो. त्यांच्या देखरेखीखाली गावातील संपुर्ण विकास कामे राबविताना पाहायला मिळतात. तर दुसरीकडे मात्र आपली हुकुमशाही दाखवून समाज भवनात संसार थाटतो अन् संबंधित विभाग याकडे कानाडोळा करतो, याला काय म्हणावे?सन १९९२-९३ मध्ये येल्लापूर ग्रामपंचायतीमध्ये जलद सिंचाई विभागामार्फत तलावाचे काम पूर्ण करण्यात आले. त्याच तलावात अतिक्रमण करून माजी सरपंच सोनेराव पेंदोर यांनी विहिर खोदून शेतीसाठी पाणी वापरत असल्याने पाणी टंचाई जाणवत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. सरपंच माधव कान्हु पेंदोर व माजी सरपंच सोनेराव पेंदोर हे दोघेही सख्खे भाऊ आहेत. त्यांचा अनेक वर्षापासून या ग्रामपंचायतीवर ताबा आहे. त्यामुळे हुकुमशाही दाखवित असून चौकशी करून कारवाईची मागणी तक्ररारीतून केली आहे. (तालुका प्रतिनिधी)