शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
2
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
3
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
4
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
5
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
6
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
7
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
8
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
9
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
10
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
11
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
12
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
13
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
14
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
15
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
16
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
17
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
18
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
19
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
20
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
Daily Top 2Weekly Top 5

सरपंच लागले विकास आराखडा बनविण्याच्या कामाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मासळ बु. : मासळ ग्रामपंचायतीवर आता नव्यानेच कारभारी निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मासळ बु. : मासळ ग्रामपंचायतीवर आता नव्यानेच कारभारी निवडून आलेले आहेत. ग्रामपंचायतीचे विकास आराखडे तयार करण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. त्यामुळे नवीन आराखड्यात घनकचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन, पाणी योजनेसाठी सोलर वीज पंप, कुषोषणमुक्ती, शाळांचे शौचालय, गावातील बोलक्या भिंती यासारख्या उपाययोजनांचा समावेश होणे आवश्यक आहे.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक उपाययोजनेवर भर देणे फायदेशीर ठरणार आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायती दरवर्षी ‘आमचं गाव आमचा विकास’ या अंतर्गत पुढील वर्षाचा विकास आराखडा तयार करतात. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी आराखड्याला निधी कमी प्रमाणात उपलब्ध झाला होता; मात्र आता काही प्रमाणात राज्यातील परिस्थिती सुधारल्याने अनेक प्रकारच्या योजनेतून प्रत्येक ग्रामपंचायतीला चांगल्याप्रकारे निधी मिळणार आहे तसेच ग्रामपंचायतींना केंद्राकडूनही मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असतो. या निधीचा वापर योग्य व चांगल्याप्रकारे होण्यासाठी या आराखड्यात विकासकामांचे नियोजन केले जाते.

ग्रामपंचायतीचा गाव विकास आराखडा तयार करताना २५ टक्के निधी आरोग्य, शिक्षण व उपजीविका, १० टक्के निधी महिला व बालकल्याण व उर्वरित निधी गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जाती - जमाती कल्याण उपक्रमावर खर्च करता येतो. दहा टक्केपेक्षा अधिक निधीचा वापर वैयक्तिक लाभाच्या उपक्रमावर करता येत नाही. येत्या पंधरा दिवसात हा आराखडा आता ई - ग्रामस्वराज्य पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया जलदगतीने सुरू आहे.