शहरं
Join us  
Trending Stories
1
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
2
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
3
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"मी इनसाइडर असते तर बरं झालं असतं", इंडस्ट्रीतील स्ट्रगलवर लोकप्रिय अभिनेत्रीची क्रिप्टिक पोस्ट
7
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
8
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
9
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
10
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
11
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
12
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
13
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
14
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
15
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
16
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
17
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
18
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
19
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
20
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?

आदिवासींचे आबादी प्लॉट बळकावण्यासाठी सरपंचांनी केला पदाचा गैरवापर

By admin | Updated: September 3, 2015 00:40 IST

शासकीय जागेवर आबादी प्लॉट मिळालेल्या आदिवासी लाभार्थ्यांचे प्लाट स्वत: व कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करण्यासाठी सरपंच पदाचा गैरवापर ...

वडाळा : शासकीय जागेवर आबादी प्लॉट मिळालेल्या आदिवासी लाभार्थ्यांचे प्लाट स्वत: व कुटुंबातील व्यक्तीच्या नावे करण्यासाठी सरपंच पदाचा गैरवापर केल्याचे प्रकरण दादापूर येथे उघडकीस आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्याकडे केली आहे.शेगाव (बु.) जवळ असलेल्या दादापूर येथे सन १९९० ला शासकीय जागेवर आबादी प्लाट काढून गावातील गरजूवंत लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. त्याची नोंद ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयात घेवून तत्कालीन तहसीलदार यांनी त्या जागेचा ताबा लाभार्थ्यांना दिला. सदर लाभार्थ्यांनी घरांचे बांधकाम केले. गरिबांनी मात्र अजूनपर्यंत घरे बांधले नाही. त्यामुळे रिकाम्या जागा असल्याची संधी साधून २८ मे २०११ च्या ग्रामपंचायत मासिक सभेत सरपंच छाया लेडांगे यांनी आपल्या मर्जीतील सदस्यांना हाताशी धरून विजय विठ्ठल सोनवाने यांच्या नावे असलेला आबादी प्लाट क्र. ७२ हे स्वत:चे नावे व देवराव बेंडू नन्नावरे यांच्या नावे असलेला आबादी प्लाट क्र. ७५ सरपंच यांचे पती भाऊराव गंगाराम लेडांगे यांच्या नावे करण्याचा ठराव मंजूर केला. त्याला प्लाटधारकाची मंजुरीसुद्धा घेण्यात आली नाही. ग्रामसभेत सुद्धा हा विषय आणून मंजुरी घेण्यात आली नाही. मात्र सदर दोन्ही प्लाट ग्रामपंचायत व तलाठी रेकार्डला परस्पर चढविण्यात आल्याने आदिवासी प्लाटधारक लाभार्थ्यावर अन्याय झाला आहे. मूळ दोन्ही प्लॉटधारकांची नावे कमी करून विजय विठ्ठल सोनवाने यांचे प्लाट क्र. ७२ वर छाया भाऊराव लेडांगे व देवराव बेंडू नन्नावरे यांचे प्लाट क्र. ७५ वर भाऊराव गंगाराम लेडांगे यांची नावे ग्रामपंचायत व तलाठी रेकॉर्डला चढविण्यात आली आणि सरपंच व त्यांचे पती यांनी दोन्ही जागेवर अतिक्रमण करून सदर प्लाटचे पट्टे आमचे नावे करून देण्याबाबत तहसीलदार वरोरा यांचे अर्ज केला. तेव्हा सदर प्रकार उघडकीस आला.याबाबत अधिक माहिती घेतली असता, या प्रकरणात उपसरपंच भास्कर जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य अण्णा नन्नावरे यांचा सुद्धा सहभाग असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. हे प्रकरण नियमबाह्य असून आदिवासीवर अन्याय करणारे आहे. त्याचबरोबर स्वत:च्या स्वार्थासाठी आदिवासी लाभार्थ्यांचे प्लाट बळकावण्याचे प्रयत्नात सरपंच यांनी पदाचा गैरवापर केला असल्याने या प्रकरणाची चौकशी करून सरपंचावर कारवाई करण्यासाठी संबंधित तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन दिले आहे. त्यावर प्रशासकीय अधिकारी कोणती भूमिका घेतात याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)