शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
3
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
4
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
5
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
6
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
7
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
8
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
9
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
10
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
11
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
12
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
13
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
14
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
15
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
16
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
17
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
18
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
19
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
20
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 

सरदार पटेलांचे राष्ट्र उभारणीतील योगदान अविस्मरणीय : अहीर

By admin | Updated: November 4, 2015 00:52 IST

राष्ट्रनिर्मितीत सरदार पटेल यांचे योगदान अविस्मरणीय आहे.

चंद्रपूर : राष्ट्रनिर्मितीत सरदार पटेल यांचे योगदान अविस्मरणीय आहे. स्वतंत्र भारतात सर्व संस्थानांचे विलिनीकरण करून एकसंघ भारत निर्माण करण्याचे कार्य लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलांनी केले. आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जे ग्रामीण जनतेसाठी काम केले आहे, ते अतिशय महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन ना. हंसराज अहीर यांनी केले. राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची १४० वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे होते. तर केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला रमेश मामीडवार, शफीक अहमद, प्राचार्य डॉ. कीर्तीवर्धन दिक्षीत प्रामुख्याने उपस्थित होते.स्व. इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशची निर्मिती घडवून आणली. हे योगदान अविस्मरणीय असल्याचे ना. अहीर यांनी सांगितले. राष्ट्रसंत व इंदिरा गांधी यांचे पुण्यस्मरण याचदिवशी असल्याने त्यांचेही कार्यक्रमात स्मरण करण्यात आले.शांताराम पोटदुखे यांनी आपल्या मार्गदर्शनात, सरदार पटेलांचा वारसा शिक्षण संस्थेच्या रूपाने जतन केल्याचे सांगितले. सरदार पटेल महाविद्यालय व सरदार पटेल मेमोरिअल सोसायटी या संस्था सरदार पटेलांचे स्मरण कायम ठेवत, असल्याचे ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित यांनी केले. संचालन प्रा. प्रेरणा दहीवडे यांनी केले. कार्यक्रमाला राहुल सराफ, मुरलीमनोहर व्यास, पूनम तिवारी, महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. सरदार पटेल यांच्या जयंती कार्यक्रमासोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व इंदिरा गांधी यांचा पुण्यतिथी कार्यक्रम यावेळी घेण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)