शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

‘संथारा’ आत्महत्या नाही, न्यायालयात पुनर्विचार याचिका

By admin | Updated: August 25, 2015 01:09 IST

जयपूर उच्च न्यायालयाने जैन धर्म विधी ‘संथारा’ची तुलना आत्महत्येशी केली. त्यामुळे समाजबांधवांनी नाराजी व्यक्त

चंद्रपूर : जयपूर उच्च न्यायालयाने जैन धर्म विधी ‘संथारा’ची तुलना आत्महत्येशी केली. त्यामुळे समाजबांधवांनी नाराजी व्यक्त करत सोमवारी स्थानिक राजीव गांधी कामगार भवनात सहपरिवार धरणे आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठविले. धरणे आंदोलनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना, माजी खासदार तथा सकल जैन समाज चंद्रपूरचे अध्यक्ष नरेश पुगलिया म्हणाले, याविरोधात सर्व जैन समाजबांधव जयपूर उच्च न्यायालय तथा सर्वोच्च न्यायालयात पूर्नविचार याचिका दाखल करून न्याय मागणार आहेत. यावेळी निर्दोष पुगलिया, डॉ. महावीर सोईतकर, सुभाष जैन, योगेश भंडारी, अमर गांधी, महेंद्र मंडलेचा आदी उपस्थित होते. नरेश पुगलिया यांनी यावेळी सांगितले, जैन समाजामध्ये संथारा या समाधिस्त होणे ही धर्माची उच्च साधना मानली जाते. शरीराला नश्वर मानून तप, उपवासाने आत्मशुद्धी केली जाते. मात्र न्यायालयाने या विधीची तुलना आत्महत्येशी केल्याने समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद २५ मध्ये दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे संविधानिक अधिकारापासून अल्पसंख्याक जैन धर्माचे साधु-संत तथा समाजबांधव वंचित राहू नये, यासाठी या निर्णयावर न्यायालयाकडून पूर्नविचार होण्याची आवश्यकता आहे. यासाठी सकल जैन समाजद्वारा याचिका दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे सांगितले. जैन धर्माची धार्मिक साधना तथा परंपरेचा सन्मान राखण्यासाठी समाजबांधवानी सोमवारी सहपरिवार मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यार्फत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठविले. निवेदनाच्या प्रति केंद्रीय कायदामंत्री, केंद्रीय गृहमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनाही पाठविण्यात आल्या आहे. (स्थानिक प्रतिनिधी)