शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘संथारा’ आत्महत्या नाही, न्यायालयात पुनर्विचार याचिका

By admin | Updated: August 25, 2015 01:09 IST

जयपूर उच्च न्यायालयाने जैन धर्म विधी ‘संथारा’ची तुलना आत्महत्येशी केली. त्यामुळे समाजबांधवांनी नाराजी व्यक्त

चंद्रपूर : जयपूर उच्च न्यायालयाने जैन धर्म विधी ‘संथारा’ची तुलना आत्महत्येशी केली. त्यामुळे समाजबांधवांनी नाराजी व्यक्त करत सोमवारी स्थानिक राजीव गांधी कामगार भवनात सहपरिवार धरणे आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठविले. धरणे आंदोलनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना, माजी खासदार तथा सकल जैन समाज चंद्रपूरचे अध्यक्ष नरेश पुगलिया म्हणाले, याविरोधात सर्व जैन समाजबांधव जयपूर उच्च न्यायालय तथा सर्वोच्च न्यायालयात पूर्नविचार याचिका दाखल करून न्याय मागणार आहेत. यावेळी निर्दोष पुगलिया, डॉ. महावीर सोईतकर, सुभाष जैन, योगेश भंडारी, अमर गांधी, महेंद्र मंडलेचा आदी उपस्थित होते. नरेश पुगलिया यांनी यावेळी सांगितले, जैन समाजामध्ये संथारा या समाधिस्त होणे ही धर्माची उच्च साधना मानली जाते. शरीराला नश्वर मानून तप, उपवासाने आत्मशुद्धी केली जाते. मात्र न्यायालयाने या विधीची तुलना आत्महत्येशी केल्याने समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद २५ मध्ये दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे संविधानिक अधिकारापासून अल्पसंख्याक जैन धर्माचे साधु-संत तथा समाजबांधव वंचित राहू नये, यासाठी या निर्णयावर न्यायालयाकडून पूर्नविचार होण्याची आवश्यकता आहे. यासाठी सकल जैन समाजद्वारा याचिका दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे सांगितले. जैन धर्माची धार्मिक साधना तथा परंपरेचा सन्मान राखण्यासाठी समाजबांधवानी सोमवारी सहपरिवार मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यार्फत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठविले. निवेदनाच्या प्रति केंद्रीय कायदामंत्री, केंद्रीय गृहमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनाही पाठविण्यात आल्या आहे. (स्थानिक प्रतिनिधी)