शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘संथारा’ आत्महत्या नाही, न्यायालयात पुनर्विचार याचिका

By admin | Updated: August 25, 2015 01:09 IST

जयपूर उच्च न्यायालयाने जैन धर्म विधी ‘संथारा’ची तुलना आत्महत्येशी केली. त्यामुळे समाजबांधवांनी नाराजी व्यक्त

चंद्रपूर : जयपूर उच्च न्यायालयाने जैन धर्म विधी ‘संथारा’ची तुलना आत्महत्येशी केली. त्यामुळे समाजबांधवांनी नाराजी व्यक्त करत सोमवारी स्थानिक राजीव गांधी कामगार भवनात सहपरिवार धरणे आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठविले. धरणे आंदोलनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना, माजी खासदार तथा सकल जैन समाज चंद्रपूरचे अध्यक्ष नरेश पुगलिया म्हणाले, याविरोधात सर्व जैन समाजबांधव जयपूर उच्च न्यायालय तथा सर्वोच्च न्यायालयात पूर्नविचार याचिका दाखल करून न्याय मागणार आहेत. यावेळी निर्दोष पुगलिया, डॉ. महावीर सोईतकर, सुभाष जैन, योगेश भंडारी, अमर गांधी, महेंद्र मंडलेचा आदी उपस्थित होते. नरेश पुगलिया यांनी यावेळी सांगितले, जैन समाजामध्ये संथारा या समाधिस्त होणे ही धर्माची उच्च साधना मानली जाते. शरीराला नश्वर मानून तप, उपवासाने आत्मशुद्धी केली जाते. मात्र न्यायालयाने या विधीची तुलना आत्महत्येशी केल्याने समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. हा निर्णय संविधानाच्या अनुच्छेद २५ मध्ये दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखे आहे. त्यामुळे संविधानिक अधिकारापासून अल्पसंख्याक जैन धर्माचे साधु-संत तथा समाजबांधव वंचित राहू नये, यासाठी या निर्णयावर न्यायालयाकडून पूर्नविचार होण्याची आवश्यकता आहे. यासाठी सकल जैन समाजद्वारा याचिका दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे सांगितले. जैन धर्माची धार्मिक साधना तथा परंपरेचा सन्मान राखण्यासाठी समाजबांधवानी सोमवारी सहपरिवार मूक मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यार्फत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निवेदन पाठविले. निवेदनाच्या प्रति केंद्रीय कायदामंत्री, केंद्रीय गृहमंत्री, अल्पसंख्याक मंत्री, राज्यपाल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनाही पाठविण्यात आल्या आहे. (स्थानिक प्रतिनिधी)