शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

एकाच आठवड्यातील ‘त्या’ दोन घटनेने समाजमन गहिवरले

By admin | Updated: June 1, 2017 01:22 IST

मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही. तो कधीही, कुठेही व कोणत्याही वाटेने आला तरी तो अशुभच आणि दु:खदायीच.

लग्नात विघ्न: चौघांचा जीव गेला वसंत खेडेकर। लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही. तो कधीही, कुठेही व कोणत्याही वाटेने आला तरी तो अशुभच आणि दु:खदायीच. पण, लग्न समारंभासारख्या आनंदाच्या व शुभक्षणी तो आला की त्याची व त्याच्याने होणाऱ्या दु:खाची-हानीची तिव्रता अधिक वाढते. त्याचा अनेकांना, अनेक प्रकारे फ टका बसतो. येथे एकाच आवठवड्यात दोन-तीन दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या घरातील लग्नप्रसंगी मृत्यूने चार जिवांना गाठून, लग्न प्रसंगीच्या आनंद व उत्साहात विरजन पाडले. एवढेच नव्हे, तर एका घरी खुद्द उपवरावर मृत्यूने घाला घातला. सोबतच, त्याच्या आईलाही मृत्यूने कवेत घेतले. येथील पेपर मिल समोरील फुलसिंग नाईक वार्डात आयोजित एका लग्न समारंभात भाग घेण्याकरिता अगदी जवळचे नातेवाईक असलेले राहुल कोटावार आणि स्वप्नील कोटावार आले होते. हळदीचा कार्यक्रम व इतर कार्यक्रमात भाग घेता यावा म्हणून ते दोन दिवसांपूर्वीच आले होते. १७ आणि १९ वर्षे असलेले हे दोघ चुलतभावंड सकाळी वर्धा नदीच्या घाटावर आंघोळीकरिता गेले आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दोन दिवसांवर लग्न असलेल्या घरी यामुळे शोककळा पसरली. त्या मुलांच्या कुटुंबावर या दु:खद प्रसंगाने जे संकट कोसळले, त्याचे वर्णन शब्दातीत आहे. या घटनेच्या तीन दिवसांनंतरच याच परिसरात विवेकानंद वार्डात याच प्रकारे अत्यंत दुर्देवी घटना घडली. या वार्डातील व पेपर मिलमध्ये नोकरीला असलेल्या विनोद त्र्यंबके यांचे लग्न २ जूनला ठरले होते. त्यांच्या आई नजिकच्या टाक्यातून पाणी काढायला गेल्या. त्या टाक्याला विद्युतस्पर्श असल्याने त्याचा झटका त्यांना लागला व त्या त्या खाली कोसळल्या. आईला काय झाले हे बघायला गेलेल्या विनोदलाही विद्युत स्पर्श झाल्याने आईसोबत तोही दगावला. या आकस्मित दुर्घटनेने आनंदी क्षणाची जागा दु:ख आणि अश्रूंनी घेतली. आई आणि मुलाची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली. तो सारा क्षण सर्वांचे अश्रू अनावर करणारा होता. कुठेही घडू नये, असे त्र्यंबके कुंटुंबाबाबत घडले. हे सारे बघून, नियती अशी निष्ठूर का वागते, असा प्रश्न कुणालाही पडेल. सरता आठवडा बल्लारपूला वाईट व दुर्देवी घटनांचा गेला. लग्नप्रसंगीच्या या घटनांसोबत त्याच दरम्यान येथील पी.डी.पोले या वनपालाचा अचानक मृत्यू झाला. पोले हे आपल्या मित्रासोबत बाईकने जंगलात जात असताना, बाईक घसरली. मित्राला बरीच इजा झाली. पोले यांचे किरकोळवर निभावले. ते प्राथमिक उपचारानंतर घरी आराम करीत बसले असताना घरी साप निघाला. त्याला बघण्याकरिता उठले असताना छातीत कळ आली. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अशा एकामागून एक दुर्देवी घटना या एकाच आठवड्यात बल्लारपुरात घडल्या आहेत.