शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच आठवड्यातील ‘त्या’ दोन घटनेने समाजमन गहिवरले

By admin | Updated: June 1, 2017 01:22 IST

मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही. तो कधीही, कुठेही व कोणत्याही वाटेने आला तरी तो अशुभच आणि दु:खदायीच.

लग्नात विघ्न: चौघांचा जीव गेला वसंत खेडेकर। लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : मृत्यू कधी कुणाला सांगून येत नाही. तो कधीही, कुठेही व कोणत्याही वाटेने आला तरी तो अशुभच आणि दु:खदायीच. पण, लग्न समारंभासारख्या आनंदाच्या व शुभक्षणी तो आला की त्याची व त्याच्याने होणाऱ्या दु:खाची-हानीची तिव्रता अधिक वाढते. त्याचा अनेकांना, अनेक प्रकारे फ टका बसतो. येथे एकाच आवठवड्यात दोन-तीन दिवसांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या घरातील लग्नप्रसंगी मृत्यूने चार जिवांना गाठून, लग्न प्रसंगीच्या आनंद व उत्साहात विरजन पाडले. एवढेच नव्हे, तर एका घरी खुद्द उपवरावर मृत्यूने घाला घातला. सोबतच, त्याच्या आईलाही मृत्यूने कवेत घेतले. येथील पेपर मिल समोरील फुलसिंग नाईक वार्डात आयोजित एका लग्न समारंभात भाग घेण्याकरिता अगदी जवळचे नातेवाईक असलेले राहुल कोटावार आणि स्वप्नील कोटावार आले होते. हळदीचा कार्यक्रम व इतर कार्यक्रमात भाग घेता यावा म्हणून ते दोन दिवसांपूर्वीच आले होते. १७ आणि १९ वर्षे असलेले हे दोघ चुलतभावंड सकाळी वर्धा नदीच्या घाटावर आंघोळीकरिता गेले आणि खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. दोन दिवसांवर लग्न असलेल्या घरी यामुळे शोककळा पसरली. त्या मुलांच्या कुटुंबावर या दु:खद प्रसंगाने जे संकट कोसळले, त्याचे वर्णन शब्दातीत आहे. या घटनेच्या तीन दिवसांनंतरच याच परिसरात विवेकानंद वार्डात याच प्रकारे अत्यंत दुर्देवी घटना घडली. या वार्डातील व पेपर मिलमध्ये नोकरीला असलेल्या विनोद त्र्यंबके यांचे लग्न २ जूनला ठरले होते. त्यांच्या आई नजिकच्या टाक्यातून पाणी काढायला गेल्या. त्या टाक्याला विद्युतस्पर्श असल्याने त्याचा झटका त्यांना लागला व त्या त्या खाली कोसळल्या. आईला काय झाले हे बघायला गेलेल्या विनोदलाही विद्युत स्पर्श झाल्याने आईसोबत तोही दगावला. या आकस्मित दुर्घटनेने आनंदी क्षणाची जागा दु:ख आणि अश्रूंनी घेतली. आई आणि मुलाची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्यात आली. तो सारा क्षण सर्वांचे अश्रू अनावर करणारा होता. कुठेही घडू नये, असे त्र्यंबके कुंटुंबाबाबत घडले. हे सारे बघून, नियती अशी निष्ठूर का वागते, असा प्रश्न कुणालाही पडेल. सरता आठवडा बल्लारपूला वाईट व दुर्देवी घटनांचा गेला. लग्नप्रसंगीच्या या घटनांसोबत त्याच दरम्यान येथील पी.डी.पोले या वनपालाचा अचानक मृत्यू झाला. पोले हे आपल्या मित्रासोबत बाईकने जंगलात जात असताना, बाईक घसरली. मित्राला बरीच इजा झाली. पोले यांचे किरकोळवर निभावले. ते प्राथमिक उपचारानंतर घरी आराम करीत बसले असताना घरी साप निघाला. त्याला बघण्याकरिता उठले असताना छातीत कळ आली. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. अशा एकामागून एक दुर्देवी घटना या एकाच आठवड्यात बल्लारपुरात घडल्या आहेत.