शहरं
Join us  
Trending Stories
1
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
2
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
3
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा वापर ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
4
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
5
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
6
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
7
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!
8
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
9
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
10
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
11
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
12
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
13
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
14
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
15
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
16
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
17
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
18
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
20
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

चंद्रपुरात जिथे वाहन उभे केले तीच पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST

वरोरा नाका ते पाण्याची टाकी वरोरा नाका ते पाण्याची टाकी परिसरात रस्ता गुळगुळीत झाला आहे. परंतु, पाण्याच्या टाकीजवळ भर ...

वरोरा नाका ते पाण्याची टाकी

वरोरा नाका ते पाण्याची टाकी परिसरात रस्ता गुळगुळीत झाला आहे. परंतु, पाण्याच्या टाकीजवळ भर रस्त्यावर पार्किंग होत असल्याचे दिसून आले. या ठिकाणी ट्रॅव्हल्स ऐन रस्त्यावर उभ्या केलेल्या होत्या. रस्ता रुंद असला तरी या ठिकाणी तो वाहनांच्या नियमबाह्य पार्किंगमुळे अरुंद वाटायला लागतो.

प्रियदर्शिनी चौक ते जटपुरा गेट

प्रियदर्शिनी चौक जटपुरा गेट रस्ता दुभाजक आहे. एकेरी वाहतूक होते. आधीच रस्ता अरुंद. त्यातही निम्म्या रस्त्यावर वाहने उभी केलेली असतात. यावर कुणाचाही वचक नाही.

जटपुरा गेट ते ज्युबिली हायस्कूल चौक

जटपुरा गेटमधून मुख्य शहरात प्रवेश केल्यानंतर वाहनधारकांना जिकिरीने वाहन चालवावे लागते. कुठेही पार्किंगची सुविधा नसताना दुतर्फा वाहने उभी केलेली असतात. दोन्ही बाजूंच्या उभ्या असलेल्या वाहनांमुळे उर्वरित रस्त्यावरून वाहने काढावे लागते.

श्रीकृष्ण टाॅकीज ते कस्तुरबा चौक

हाही मार्ग अरुंदच आहे. या मार्गाने जाताना कुठेही पार्किंगचे नियम पाळलेले दिसत नाहीत. निम्म्या रस्त्यावर वाहने उभी केलेली असल्यामुळे रस्ता अरुंद होऊन जातो. या भागात अनेक किरकोळ अपघात झालेले आहेत.

शहराचे हृदयस्थान गांधी चौकाची कोंडी कायमच

गांधी चौकातून कारागृहाकडे जाणाऱ्या मार्गावर सात मजली इमारतीसमोर उभ्या दुचाकीची रांग, लागूनच ऑटोच्या दोन रांगामध्ये पार्किंग केली जाते. यामुळे निम्म्यापेक्षा अधिक रस्ता पार्किंगमध्येच व्यापल्या गेल्याने उर्वरित मार्गावरून पायी जाणारे नागरिक आणि रस्त्याने जाणारी वाहने कशीबशी काढावी लागतात. या चौकातून पठाणपुराकडे जाणारा मार्गही दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या वाहनांमुळे अरुंद झालेला आहे. गांधी चौकातून जटपुरा गेटकडे जाणारा मार्ग आधीच अरुंद आहे. महानगरपालिकेने फुटपाथ तोडून रस्ता रुंद केला. मात्र, रस्त्याची कोंडी सुटलेली नाही. निम्म्याहून अधिक रस्ता उभ्या वाहनाने व्यापलेला असतो.

वाहनधारकांनाही नियमांचा विसर

चंद्रपूर शहरातील पार्किंगवर जिल्हा वा मनपा प्रशासनाला अद्याप तोडगा सापडलेला नाही. हे चंद्रपूरकरांना चांगलेच ठाऊक आहे.

याचाच फायदा चंद्रपुरातील वाहनधारक घेत आहेत. वाहन पार्किंग करायला जागा नसल्याचे पाहून दोन मिनिटांत येतो, असे कारण पुढे करून भररस्त्यावर वाहने उभी करून बिनदिक्कतपणे बाजारात जातात. त्या एका वाहनामुळे नेहमीच वाहतूक कोडींचा सामना करावा लागतो.

कोंडीकडे पोलीस व मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष

शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी पर्याय अद्याप मनपाला सापडलेला दिसत नाही. वाहतूक नियंत्रक पोलीस केवळ चौकात उभे राहण्यातच धन्यता मानत आहे. त्यांच्यासमोरच रस्त्यावर वाहने उभी असताना त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नसल्याचीही बाब पुढे आली आहे.