शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

१५ वर्षे वयाच्या झाडाचा असाही प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:01 IST

झाडांच्या रोपाची लागवड ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून होत असते. अशा रोपांचे वय साधारणत: एक ते दोन वर्षांपर्यंत असू शकते. त्यापेक्षा मोठ्या वयाच्या झाडांना उपटून दुसऱ्या ठिकाणी लावणे हा आजपर्यंत काल्पनिकच विषय होता. परंतु यावर मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने मात केली असून एक-दोन नव्हे तर चक्क १५ वर्षांचे झाड एका जागेवरून हलवून पाहिजे त्या ठिकाणी लावणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देवृक्षतोड थांबविण्यासाठी प्रेरणादायी : दिल्लीला होणार तेलंगणातील वृक्षाची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : झाडांच्या रोपाची लागवड ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून होत असते. अशा रोपांचे वय साधारणत: एक ते दोन वर्षांपर्यंत असू शकते. त्यापेक्षा मोठ्या वयाच्या झाडांना उपटून दुसऱ्या ठिकाणी लावणे हा आजपर्यंत काल्पनिकच विषय होता. परंतु यावर मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने मात केली असून एक-दोन नव्हे तर चक्क १५ वर्षांचे झाड एका जागेवरून हलवून पाहिजे त्या ठिकाणी लावणे शक्य झाले आहे. तेलंगनातून दिल्लीला लागवडीकरिता निघालेल्या २२ फुट उंचीच्या झाडांचे वरोरा येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागरिकांना झालेल्या दर्शनाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.सदर झाडे अजस्त्र जातीची असून शहरातून जाताना ती सर्वांसाठी कुतुहूलाचा विषय ठरली होती.वरोरा येथील उड्डाणपुल जवळील पथकर नाक्यावरून ट्रक (क़ एमएच-४० बीजीओ २६५) जात असताना त्यावर २२ फूट उंचीची झाडे ठेवलेली होती. जी सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरली होती. यामुळे बघ्यांची मोठी गर्दी तिथे उसळली होती. या संंदर्भात ट्रक चालक निला मोहम्मद यांच्याकडून माहिती घेतली असता तेलंगणातील जिल रंगा येथील युनिक ट्री प्रायव्हेट लिमिटेड या नर्सरी कंपनीतून घेतलेली ही झाडे ट्रकमधून दिल्लीकडे नेली जात असून या झाडांमध्ये फिगस बी रोपैसी हे २२ फुट उंचीचे अजस्र नावाचे झाड आणि दुसरे आलिव्ह मल्टी बॉल्स हे दहा फूट उंचीचे झाड असल्याचे सांगण्यात आले.झांडाचे वय १२ ते १५ वर्षे असूनही ही झाडे दिल्ली येथील राजीव चोप्रा यांच्या बंगल्यातील प्रांगणात लावण्यासाठी नेली जात असल्याचे म्हटले जाते. सर्व झाडे दोन दिवसांच्या प्रवासानंतरही हिरवीगार दिसत होती. ती आणखी तीन दिवसांच्या प्रवासानंतर दिल्लीला पोहचणार आहे. झाडांची ही वाहतूक वृक्षतोड थांबविण्यासाठी आशेचे किरण ठरू शकणार आहे. रस्ते, औद्योगिक वसाहतीसह अन्य विकास कामे केली जाताना मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जाते. परंतु, अशा विकसित तंत्रज्ञानामुळे तोडावी लागणारी झाडे व्यवस्थितपणे उपडून सुरक्षित ठिकाणी त्यांची लागवड करणे आता शक्य होणार आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी आता शासनाने त्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे.