शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

१५ वर्षे वयाच्या झाडाचा असाही प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:01 IST

झाडांच्या रोपाची लागवड ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून होत असते. अशा रोपांचे वय साधारणत: एक ते दोन वर्षांपर्यंत असू शकते. त्यापेक्षा मोठ्या वयाच्या झाडांना उपटून दुसऱ्या ठिकाणी लावणे हा आजपर्यंत काल्पनिकच विषय होता. परंतु यावर मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने मात केली असून एक-दोन नव्हे तर चक्क १५ वर्षांचे झाड एका जागेवरून हलवून पाहिजे त्या ठिकाणी लावणे शक्य झाले आहे.

ठळक मुद्देवृक्षतोड थांबविण्यासाठी प्रेरणादायी : दिल्लीला होणार तेलंगणातील वृक्षाची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : झाडांच्या रोपाची लागवड ही वृक्षारोपणाच्या माध्यमातून होत असते. अशा रोपांचे वय साधारणत: एक ते दोन वर्षांपर्यंत असू शकते. त्यापेक्षा मोठ्या वयाच्या झाडांना उपटून दुसऱ्या ठिकाणी लावणे हा आजपर्यंत काल्पनिकच विषय होता. परंतु यावर मानवाने तंत्रज्ञानाच्या मदतीने मात केली असून एक-दोन नव्हे तर चक्क १५ वर्षांचे झाड एका जागेवरून हलवून पाहिजे त्या ठिकाणी लावणे शक्य झाले आहे. तेलंगनातून दिल्लीला लागवडीकरिता निघालेल्या २२ फुट उंचीच्या झाडांचे वरोरा येथे सकाळी ११ वाजताच्या सुमारास नागरिकांना झालेल्या दर्शनाने यावर शिक्कामोर्तब झाले आहे.सदर झाडे अजस्त्र जातीची असून शहरातून जाताना ती सर्वांसाठी कुतुहूलाचा विषय ठरली होती.वरोरा येथील उड्डाणपुल जवळील पथकर नाक्यावरून ट्रक (क़ एमएच-४० बीजीओ २६५) जात असताना त्यावर २२ फूट उंचीची झाडे ठेवलेली होती. जी सर्वांसाठी कुतूहलाचा विषय ठरली होती. यामुळे बघ्यांची मोठी गर्दी तिथे उसळली होती. या संंदर्भात ट्रक चालक निला मोहम्मद यांच्याकडून माहिती घेतली असता तेलंगणातील जिल रंगा येथील युनिक ट्री प्रायव्हेट लिमिटेड या नर्सरी कंपनीतून घेतलेली ही झाडे ट्रकमधून दिल्लीकडे नेली जात असून या झाडांमध्ये फिगस बी रोपैसी हे २२ फुट उंचीचे अजस्र नावाचे झाड आणि दुसरे आलिव्ह मल्टी बॉल्स हे दहा फूट उंचीचे झाड असल्याचे सांगण्यात आले.झांडाचे वय १२ ते १५ वर्षे असूनही ही झाडे दिल्ली येथील राजीव चोप्रा यांच्या बंगल्यातील प्रांगणात लावण्यासाठी नेली जात असल्याचे म्हटले जाते. सर्व झाडे दोन दिवसांच्या प्रवासानंतरही हिरवीगार दिसत होती. ती आणखी तीन दिवसांच्या प्रवासानंतर दिल्लीला पोहचणार आहे. झाडांची ही वाहतूक वृक्षतोड थांबविण्यासाठी आशेचे किरण ठरू शकणार आहे. रस्ते, औद्योगिक वसाहतीसह अन्य विकास कामे केली जाताना मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जाते. परंतु, अशा विकसित तंत्रज्ञानामुळे तोडावी लागणारी झाडे व्यवस्थितपणे उपडून सुरक्षित ठिकाणी त्यांची लागवड करणे आता शक्य होणार आहे. वृक्षतोड थांबविण्यासाठी आता शासनाने त्या दिशेने प्रयत्न करण्याची गरज आहे.