शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ंब्रह्मपुरी तालुक्यात खताच्या नावावर मातीची विक्री

By admin | Updated: August 19, 2015 01:28 IST

एक वर्षापूर्वी तालुक्यातील चांदली, कालता, नान्होरी, बेलगाव, चांदगाव, बोरगाव, बेलदारी यासह अनेक गावामध्ये बोगस खत कंपनी ...

प्रकरण थंडबस्त्यात : ब्रह्मपुरी पोलिसांची कामगिरी संशयाच्या भोवऱ्यातब्रह्मपुरी : एक वर्षापूर्वी तालुक्यातील चांदली, कालता, नान्होरी, बेलगाव, चांदगाव, बोरगाव, बेलदारी यासह अनेक गावामध्ये बोगस खत कंपनी व त्यांच्या प्रतिनिधीने शेतकऱ्यांना खताच्या नावावर मातीची विक्री करण्याचा गोरखधंदा सुरू केला होता. यामुळे हजारो शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक झाली. त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारीवर पंचायत समिती व कृषी विभागाद्वारे सखोल चौकशी होऊन चौकशीअंती ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात १३ डिसेंबर २०१३ ला गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. मात्र या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींना केवळ सूचनापत्र देऊन सोडण्यात आले. आता केवळ कागदी घोडे नाचविणे सुरू आहे.याच प्रकरणातील फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व न्याय मिळावा म्हणून आमदार नाना श्यामकुळे यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. विशेष म्हणजे आयुक्तालयातून देखील आरोपीविरुद्ध कारवाई व नुकसान भरपाईबाबतचे आदेश देण्यात आले होते.एरव्ही सामान्य माणसावर गुन्ह्याची नोंद होताच त्याला तात्काळ अटक करण्यात येते. याही प्रकरणात हीच अपेक्षा होती. पोलिसांनी तक्रारीत नमूद आरोपींना अटक करण्यासाठी २२ सप्टेंबर २०१४ ला अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून पथक पाठविले. या पथकाने अमरावती, भिवापूर व ब्रह्मपुरी येथून सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाण्यात आणले. त्यांचे बयाण नोंदविले. त्याबाबतची सविस्तर नोंद स्टेशन डायरीत घेण्यात आली. त्यानंतर त्यांना सुचनापत्र देऊन २४ सप्टेंबर सोडून देण्यात आले. ज्या आरोपींना अटक करण्यात आली होती, त्यात शशीकांत प्रभाकर लाकडे रा. अमरावती, माधव प्रभाकर निमकर किरसा (जि. अमरावती) अशोक पंजाबराव दहीकर गाडगेनगर अमरावती तसेच महेश उर्फ राहूल हरडे यास भिवापूरवरुन तर गिरीश पांडुरंग चालखुरे याला ब्रह्मपुरीतील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले होते. आरोपी दूरवरचे असल्याने पोलिसांनी त्यांना अटक करुन न्यायालयात हजर करणे आवश्यक होते. पण आरोपीना सुचनापत्र देऊन सोडविण्यात आले. यावरुन या प्रकरणातील कारवाईची प्रक्रीया बदलविण्याचा प्रकार पोलिसांकडून करण्यात आल्याचा आरोप आहे. (तालुका प्रतिनिधी)