शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शेतकऱ्यांकडून शासन अनुदानित बैलांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:31 IST

राजुरा तालुक्यातील लक्कडकोट व कवीठपेठ येथील बैल खरेदीदाराने गावोगावी एजंट नेमून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बैलांची खरेदी सुरू केली आहे.

ठळक मुद्देआर्थिक संकट : संधीचा फायदा घेत आहेत दलाल

आॅनलाईन लोकमतराजुरा : राजुरा तालुक्यातील लक्कडकोट व कवीठपेठ येथील बैल खरेदीदाराने गावोगावी एजंट नेमून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील बैलांची खरेदी सुरू केली आहे. सध्या नापिकी, कर्ज व वन्यप्राण्यांचा हैदोस, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरीही अनुदानित बैलांची विक्री करीत आहे. याच संधीचा लाभ घेत एजंटांकडून पडत्या दरात बैलांची खरेदी केली जात आहे.या बैलांची वाहतूक बगलवाही (कोस्टाळा) या आडमार्गाने तेलंगणा राज्यातील गणेशपूर बैल बाजारात केली जाते. शासनाकडून मिळालेल्या अनुदानित बैलाची खरेदी करून नेले जात असताना प्रस्तुत प्रतिनिधीस आढळून आले.शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन कर्जात अडकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीची घोषणा केली. यात विविध अटी व शर्ती लादल्यामुळे त्याची शहनिशा व तपासणी करण्यात बराच कालावधी गेला. त्यामुळे शेतकºयांना वेळेवर कर्ज मिळू शकले नाही. नुकतीच प्रथम कर्जमाफीची यादी जाहीर करण्यात आली. त्यात मोठ्या प्रमाणात तफावत व दोष आढळल्यामुळे शेतकरी लाभापासून वंचित आहे.यंदा अल्पशा पावसाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पेरणी केली. त्यास निसर्गाने साथ दिली नाही. पिकावर विविध प्रकारचे रोग, जमिनीचा ओलावा नष्ट होणे, कमी भाव, उत्पादनात घट, वन्यप्राण्यांचा हैदोस, बँक व खासगी कर्जाचा बोझा यात शेतकरी पिसला जात आहे.यातून मार्ग काढण्यासाठी काय करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. याच संधीचा लाभ घेण्यासाठी बैल खरेदीदारांनी मोठ्या प्रमाणात चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यातील बैलाची पडत्या दरात खरेदी सुरू केली आहे. रविवारी अशाच प्रकारे काही बैलांची खरेदी करून नक्षलग्रस्त बगलवाही (कोष्टाळा) या अतिदुर्गम पहाडी आडमार्गाने गणेशपूर (तेलंगाणा) बैल बाजारात नेले जात होते. यात शासनाकडून अनुदानात मिळालेला बैलही होता. या बैलाच्या कानाला बिल्ला क्रमांक एम.एल.डी.बी. न्यु इंडिया ३७००१२१९७९२० लावला होता. बैल नेणाऱ्या इसमाजवळ कोणतेच कागदपत्र नव्हते. सदर बैल कवळजी ता. बल्लारपूर येथून आणला असल्याचे त्याने सांगितले.खरेदीदाराचे एजंट गावोगावी फिरून बैल खरेदी करतात. त्यानंतर कवडजी, आक्सापूर, कवीठपेठ या ठिकाणी डेपोवर बैल गोळा करून बगलवाही (कोष्टाळा) मार्गाने गणेशपूर बाजारात नेले जात आहे. तेथे दररोज शेकडो बैल येतात. हैद्राबाद, आदिलाबाद, करीमनगर येथील मोठे व्यापारी बैलाची खरेदी करून कटाईसाठी ट्रकमध्ये घेऊन जातात. सध्या शेतकरी आर्थिक समस्या सोडविण्यासाठी नाईलाजाने बैल विकत आहे.यंदा नापिकी, वन्यप्राण्यांचा हैदोस, शेतमालास कमी भाव, फसलेली कर्जमाफी, यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यावर पर्याय म्हणून बैल विकावे लागत आहे.- भीमराव बंडी, सरपंच व शेतकरी, ग्रा.पं. लक्कडकोट.