शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

विविध समस्या निवारणासाठी मुख्याधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST

घुग्घुस : ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर आठ महिने लोटून गेले. अजूनही नगर परिषदेची निवडणूक झाली नसल्याने नगर परिषदेचा ...

घुग्घुस : ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर आठ महिने लोटून गेले. अजूनही नगर परिषदेची निवडणूक झाली नसल्याने नगर परिषदेचा कारभार प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. गावातील प्रत्येक वार्डांत विविध समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसने मुख्याधिकारी आर्शिया जुही यांना निवेदन दिले.

कचरा वाहून नेणाऱ्या अधिकांश घंटागाड्या नादुरुस्त असल्याने वाॅर्डात कचरा संकलन नियमित होत नाही. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सोलर पॅनल बंद पडले आहे. अनेक वॉटर एटीएम बंद पडलेले आहेत. शहरात अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने त्या ठिकाणी लाईट लावण्यात यावे. रस्ते, नाल्या नाहीत. त्यांची यादी बनवून आवश्यक ठिकाणी तातडीने रस्ते नाल्या टाकण्यात यावे. शहरातील कचराकुंडी स्वच्छ करण्यात याव्या, बंद पडलेले हातपंप दुरुस्त करण्यात यावे व तोटी नसलेल्या नळाला तोट्या लावण्यात याव्या अशा अनेक मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. निवेदन देताना काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, नुरुल सिद्दिकी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.