शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
3
इकडे पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिली; तिकडे 'बेवफा' सोनम युपीत सापडली...
4
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
5
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
6
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
7
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
8
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
9
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची
10
आऊट देताच महिला अंपायरवर भडकला अश्निन, रागाच्या भरात पॅडवर मारली बॅट!
11
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
12
Sonam Raghuwanshi: राजा रघुवंशीची हत्या करण्यासाठी सोनमने घेतली तिघांची मदत; दोघांना अटक, एक फरार
13
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
14
कुटुंबासोबत साजरी केली ईद, अचानक रुग्णालयात दाखल झाली 'बिग बॉस' विजेती अभिनेत्री
15
Bank Of Baroda, HDFC Bank नं ग्राहकांना दिली खुशखबर; कर्जाच्या व्याजदरात केली कपात, पाहा नवे दर
16
रणबीर कपूर-आलियाचा नवा आलिशान बंगला तयार, सोशल मीडियावर दिसली पहिली झलक
17
५ वर्षांत थेट ५ लाखांचा फायदा! गुंतवणूकीसाठी एकदम बेस्ट आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम
18
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
19
सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने केलं थाटामाटात लग्न, आदिनाथ कोठारेची खास उपस्थिती

विविध समस्या निवारणासाठी मुख्याधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST

घुग्घुस : ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर आठ महिने लोटून गेले. अजूनही नगर परिषदेची निवडणूक झाली नसल्याने नगर परिषदेचा ...

घुग्घुस : ग्रामपंचायतीचे नगर परिषदेत रूपांतर झाल्यानंतर आठ महिने लोटून गेले. अजूनही नगर परिषदेची निवडणूक झाली नसल्याने नगर परिषदेचा कारभार प्रशासक व मुख्याधिकारी यांच्या देखरेखीखाली सुरू आहे. गावातील प्रत्येक वार्डांत विविध समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. त्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसने मुख्याधिकारी आर्शिया जुही यांना निवेदन दिले.

कचरा वाहून नेणाऱ्या अधिकांश घंटागाड्या नादुरुस्त असल्याने वाॅर्डात कचरा संकलन नियमित होत नाही. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सोलर पॅनल बंद पडले आहे. अनेक वॉटर एटीएम बंद पडलेले आहेत. शहरात अनेक ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने त्या ठिकाणी लाईट लावण्यात यावे. रस्ते, नाल्या नाहीत. त्यांची यादी बनवून आवश्यक ठिकाणी तातडीने रस्ते नाल्या टाकण्यात यावे. शहरातील कचराकुंडी स्वच्छ करण्यात याव्या, बंद पडलेले हातपंप दुरुस्त करण्यात यावे व तोटी नसलेल्या नळाला तोट्या लावण्यात याव्या अशा अनेक मागण्या निवेदनात नमूद केल्या आहेत. निवेदन देताना काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, अनुसूचित जाती विभाग जिल्हाध्यक्ष पवन आगदारी, कामगार नेते सैय्यद अनवर, नुरुल सिद्दिकी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.