शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

संत गाडगे बाबांचा विचार विज्ञाननिष्ठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:07 IST

अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन संत गाडगे बाबांनी कीर्तनाचा प्रभावी वापर केला. या विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टी आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी यांनी केले.

ठळक मुद्देअंजली घोटेकर : मनपात जयंती उत्सव

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा यांनी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन संत गाडगे बाबांनी कीर्तनाचा प्रभावी वापर केला. या विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टी आहे, असे प्रतिपादन महापौर अंजली घोटेकर यांनी यांनी केले.मनपाच्या वतीने मंगळवारी आयोजित जयंती कार्यक्रमात त्या बोलत होत्या. संत गाडगे बाबाच्या महाराजांचे प्रतिमेला पुष्पमालार्पण करुन उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी उपमहापौर अनिल फुलझेले, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहेरे, नोडल अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, प्रभाग अधिकारी नामदेव राऊत, कवडू नेहारे, ज्योती देशमुख, अशोक डुमरे, जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर रैच, महेश शिंदे, चेतन पूलगमकर, चैतन्य चोरे आदी उपस्थित होते.महापौर घोटेकर म्हणाल्या, संत गाडगेबाबांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. विज्ञानाचा विचार मांडणारे संत गाडगेबाबा हे कोणत्याही शाळा, महाविद्यालयात गेले नाहीत. पण, सुशिक्षितांना लाजवणारे तत्वज्ञान त्यांनी कीर्तनातून लोकांसमोर मांडले. बाबाना गोरगरीब, दलित, भिकारी व अनाथांचे दु:ख जाणले होते. त्यांनी मानवता धर्म जागविला. गरीबांच्या सेवा करण्यातच मानवी जीवन सार्थकी लागते, हा विचार मांडला, असेही महापौर घोटेकर यांनी यावेळी सांगितले.अनिल फुलझेले म्हणाले, खूप शिकण नसूनही बाबानी अंधश्रद्धा- अस्पृश्यता, जातीवादाविरुद्ध जनजागृती केली. जगात सर्व समान आहेत. उच्च- नीच, गरीब, श्रीमंत हा भेद पाळला नाही. एकच धर्म तो म्हणजे समता. एकच जागृत देवता ती मानवता होय. सर्वसामान्य जनतेला स्वच्छता आणि समृद्धीचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या विचारातून समाजात परिवर्तन घडू शकते, असेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी आशिष भारती, चिन्मय देशपांडे, विकास दानव, गुरुदास नवले, विलास बेले, मनोज सोनकुसरे, धाबेकर, भूषण ठकरे, अशोक ठोंबरे, मयूर मलिक व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.