शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

किल्ल्यांच्या स्वच्छतेसाठी सह्यांद्रीचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:11 IST

जिल्ह्याचा इतिहास गौरवशाली असताना येथील अनेक किल्ल्यांकडे पुरातत्व विभागाचे गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा संपुष्टात येत आहे.

ठळक मुद्देपुण्यातील सह्यांद्री प्रतिष्ठानने किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याचा इतिहास गौरवशाली असताना येथील अनेक किल्ल्यांकडे पुरातत्व विभागाचे गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा संपुष्टात येत आहे. अशातच पुण्यातील सह्यांद्री प्रतिष्ठानने किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. सह्यांद्रीच्या चंद्रपूर शाखेने बल्लारपूर येथील राजे बल्लाळशहाचा किल्ला नुकताच स्वच्छ केल्याने किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडली आहे.किल्ल्याच्या स्वच्छतेसाठी सह्यांद्री प्रतिष्ठानचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप रिंगणे चंद्रपूर जिल्हा महिला उपाध्यक्ष अनुश्री घोटेकर, जिल्हा सचिव संजय अनेजा, तालुकाध्यक्ष निमेश मानकर, संपर्क प्रमुख सचिन आवारी व प्रसिद्धी प्रमुख प्रकाश हांडे, राजपालसिंह मितर पुरातत्व विभागाचे पसिने, मुख्याधिकारी विपीन मुध्दा यांनी पुढाकार घेतला.मोहिमेदरम्यान गडावरील टाके स्वच्छता, वाटा दुरुस्ती करण्यात येऊन किल्लावर किल्ल्याच्या इतिहासाचा माहितीफलक, सूचना फलक, दिशादर्शक तसेच वास्तुदर्शक तक्ते लावण्याचे कार्य करण्यात आले. प्रारंभी गडपूजन करण्यात आल्यानंतर पुरातत्व विभागाचे अधिकारी पसिने यांच्या हस्ते स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली. संपूर्ण परिसर स्वच्छ केल्यानंतर किल्ल्यातील आतील दुर्ग अवशेषांची पाहणी करुन इतिहास माहिती फलकाचे नियोजन करण्यात आले. विशेष म्हणजे, हा उपक्रम भारतीय सर्वेक्षण पुरातत्व विभागाच्या अनुमतीने राबविण्यात आला. सह्यांद्री प्रतिष्ठाणने राज्यातील अनेक किल्ले यापूर्वी स्वच्छ केले आहे.