शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

विहारात सुरू आहे विद्यादानाचे पवित्र कार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST

फोटो कोरपना : तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. त्यांच्याच विचारांचा ...

फोटो

कोरपना : तथागत गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जीवनात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. त्यांच्याच विचारांचा वसा घेऊन कोरोनामुळे शाळेपासून दूर असलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांना गणिताचे धडे देण्याचे पवित्र कार्य गडचांदूर येथील विहारात सुरू आहे.

गडचांदूर येथील पद्माकर खैरे या शिक्षकाने हे कार्य सुरू केले असून, ते महात्मा गांधी विद्यालय सोनुर्ली येथे गणिताचे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या शाळा-महाविद्यालयात इयत्ता ५वी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून, नर्सरी ते चवथ्या वर्गापर्यंतचे विद्यार्थी अजूनही घरीच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात व अभ्यासात मोठा खंड पडला असून, भविष्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांसाठी अहितकारक आहे.

घरी असणाऱ्या छोट्या विद्यार्थ्यांच्या शाळा कधी सुरू होतील, याचा सद्यस्थितीत अंदाज बांधता येत नाही. अशा छोट्या मुलांच्या शिक्षणाची पालकांसमोर ही फार मोठी अडचण निर्माण झाली आहे. विद्यार्थी पालकांचे घरी ऐकत नसल्यामुळे त्यांच्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करावी, अशी भावना अनेक पालकांची आहे. मात्र, कोरोनामुळे लहान मुलांची ट्युशनही बंद आहेत. त्यामुळे पाल्यांना पाठवायचे कुठे, हा गंभीर प्रश्न पालकांसमोर आहे. पालक व छोट्या मुलांची गरज लक्षात घेता, ध्येयवेड्या शिक्षकाने नि:शुल्क गणिताचे वर्ग सुरू केले आहेत. गडचांदुरातील वेगवेगळ्या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शाळांचे लहान विद्यार्थी विहारात येऊन शिक्षणाचे धडे घेत असल्याने, विद्यार्थ्यांची शाळेची उणीव काही प्रमाणात भरून निघत आहे.

कोट

लहान मुलांची शाळा बंद असल्याने अनेक विद्यार्थी मोबाइल व इतर खेळांमध्ये व्यस्त आहे. शाळा नसल्याने माझ्या घराच्या आजूबाजूचे विद्यार्थीही दिवसभर अभ्यास न करता केवळ खेळत राहतात, म्हणून दिवसभराची शाळा झाल्यानंतर आपण आपला फावला वेळ जर या विद्यार्थ्यांना शिकविण्यात घालविला, तर विद्यार्थ्यांचा फायदा होईल. म्हणूनच विहारामध्ये संचारबंदीच्या काळापासून सामाजिक अंतर राखून गणित शिक्षणाचे कार्य सुरू केले आहे.

- पद्माकर खैरे, गणित शिक्षक