शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

रूग्णालयात प्रसूतीसाठी ग्रामीण महिला मागेच

By admin | Updated: February 22, 2016 01:17 IST

मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. जन्माला येणारे बाळ सुदृढ व निरोगी राहावे यासाठी आरोग्य संस्थातील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर शासनाचा भर आहे.

बालमृत्यूचे प्रमाण कसे रोखणार?: आरोग्य विभागाच्या अहवालातून स्पष्ट चंद्रपूर : मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. जन्माला येणारे बाळ सुदृढ व निरोगी राहावे यासाठी आरोग्य संस्थातील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर शासनाचा भर आहे. मात्र आजही ग्रामीण भागातील महिला अनभिज्ञ दिसून येत असून २०१४-१५ या वर्षात जिल्ह्यातील ५८ आरोग्य केंद्रांर्तगत ५४८ महिलांची प्रसुती घरी झाल्याचे आरोग्य विभागाच्या वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम शासनाकडून राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम व इतर आनुषंगीक योजना सुरू आहेत. प्रत्येक गरोदर मातेस प्रसुतीपुर्व, प्रसुती दरम्यान व प्रसूतीपश्चात आरोग्य सुविधा व प्रयोगशाळा चाचण्या व एक वर्षापर्यंतच्या आजारी बालकांस प्रयोगशाळा चाचण्या, औषधोपचार योग्यवेळी मोफत उपलब्ध करुन देणे, हे जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.मात्र आजही ग्रामीण महिलांमध्ये आरोग्य संस्थांबाबत अनभिज्ञता असल्याने प्रसूती घरीच केले जात आहे. परिणामी बालमृत्यूचे प्रकार घडत आहेत. सन २०१४-१५ या वर्षात ५८ आरोग्य केंद्रांर्तगत ग्रामीण भागामध्ये ३८१ तर शहरी भागातील १६७ अशा ५४८ महिलांची प्रसूती ही घरी झाली आहे. आरोग्य संस्थांमध्ये प्रसूती होण्याचा आकडाही मोठा आहे. मात्र आरोग्य विभागाकडून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या जनजागृती नंतरही घरी प्रसुतीचे प्रमाण आजही पूर्णपणे कमी झालेले नाही. रुग्णालयात गरोदर मातेस व एक वषार्खालील आजारी बालकास मिळणाऱ्या सेवांच्या गुणवत्तेत वाढ करणे व वाहतूक सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी जननी शिशू सुरक्षा योजना सुरु आहे. मात्र याची अनेकांना माहितीच नाही. (स्थानिक प्रतिनिधी)