शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

ग्रामीण रस्त्याच्या नूतनीकरणाचा धडक कार्यक्रम

By admin | Updated: June 27, 2016 01:22 IST

विकासाच्या दृष्टीने रस्त्यांचे फार महत्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचा कार्यक्रम हाती

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : जिल्ह्यातील रस्त्यांसाठी वर्षभरात २७२ कोटीचंद्रपूर : विकासाच्या दृष्टीने रस्त्यांचे फार महत्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळेच गेल्या केवळ एकाच वर्षात २७२ कोटी रुपये जिल्ह्याच्या रस्त्यांसाठी देण्यात आले आहे. जिल्ह्यातील रस्त्यांच्या डांबरीकरण, मजबुतीकरणासाठी पैशाची कमतरता भासणार नाही, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.मूल तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या हस्ते पूल तथा रस्त्यांचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिल्हा परिषद सदस्या वर्षा परचाके, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल यांच्यासह त्या त्या गावचे सरपंच, उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागील चार वर्षात जिल्हयातील रस्त्यांसाठी २०० कोटी रुपये प्राप्त झाले होते. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या केवळ एका वर्षात २७२ कोटी रुपये रस्त्यांसाठी देण्यात आले आहेत. ग्रामीण रस्ते पक्क्या रस्त्याने जोडण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व रस्ते पूर्ण होतील. यासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे ते म्हणाले. रस्ते व विकासाच्या अन्य बाबतीत मूल तालुका मागे राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांशी झालेल्या भेटीत बल्लारपूर मतदारसंघ हागणदारीमुक्त करण्याचे आश्वासन मी दिले आहे. हा मतदारसंघ देशातील पहिला हागणदारी मुक्त मतदारसंघ ठरणार आहे. मतदारसंघातील जनतेच्या विश्वासावरच हे आश्वासन मी दिले आहे. यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यक असून हागणदारी मुक्तीसाठी गावांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.ही कामे होणारपालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध रस्ते व पुलांमध्ये नागपूर-मुल-खेडी-गोंडपिपरी येथील मार्गावरील गांगलवाडी जवळील एक कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या पुलाचा समावेश आहे. बोरचांदली येथील मूल-चामोर्शी रस्त्याची तीन कोटी रुपये खर्च करुन सुधारणा करणे, मूल-मारोडा-सोमनाथ रस्त्याचे एक कोटी रुपये खर्च करुन रुंदीकरण व डांबरीकरण, पेटगांव-घाटुर्नी-मारोडा-मुल-भेजगांव रस्त्याच्या नदीवरील १० कोटी रुपये खर्चाचा मोठा पुल, सुशी ते उथळपेठ रस्त्याचे ५० लक्ष रुपये खर्चाचे मजबुतीकरण व डांबरीकरण, कोळसा-झरी-पिंपळखुट-नंदगुर-अजयपूर-केळझर-चिरोली-ताडाली रस्त्याचे १ कोटी ९० लाख रुपये खर्चांचे मजबुतीकरण व डांबरीकरण या कामांचा समावेश आहे.