शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रस्त्याच्या नूतनीकरणाचा धडक कार्यक्रम

By admin | Updated: June 27, 2016 01:22 IST

विकासाच्या दृष्टीने रस्त्यांचे फार महत्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचा कार्यक्रम हाती

पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण : जिल्ह्यातील रस्त्यांसाठी वर्षभरात २७२ कोटीचंद्रपूर : विकासाच्या दृष्टीने रस्त्यांचे फार महत्व आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रस्त्यांचे नूतनीकरण करण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळेच गेल्या केवळ एकाच वर्षात २७२ कोटी रुपये जिल्ह्याच्या रस्त्यांसाठी देण्यात आले आहे. जिल्ह्यातील रस्त्यांच्या डांबरीकरण, मजबुतीकरणासाठी पैशाची कमतरता भासणार नाही, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.मूल तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या हस्ते पूल तथा रस्त्यांचे लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरुनुले, जिल्हा परिषद सदस्या वर्षा परचाके, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल यांच्यासह त्या त्या गावचे सरपंच, उपसरपंच व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.मागील चार वर्षात जिल्हयातील रस्त्यांसाठी २०० कोटी रुपये प्राप्त झाले होते. राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या केवळ एका वर्षात २७२ कोटी रुपये रस्त्यांसाठी देण्यात आले आहेत. ग्रामीण रस्ते पक्क्या रस्त्याने जोडण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आला आहे. येत्या काही दिवसात टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील सर्व रस्ते पूर्ण होतील. यासाठी निधीची कमतरता भासणार नसल्याचे ते म्हणाले. रस्ते व विकासाच्या अन्य बाबतीत मूल तालुका मागे राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पंतप्रधानांशी झालेल्या भेटीत बल्लारपूर मतदारसंघ हागणदारीमुक्त करण्याचे आश्वासन मी दिले आहे. हा मतदारसंघ देशातील पहिला हागणदारी मुक्त मतदारसंघ ठरणार आहे. मतदारसंघातील जनतेच्या विश्वासावरच हे आश्वासन मी दिले आहे. यासाठी गावकऱ्यांचे सहकार्य आवश्यक असून हागणदारी मुक्तीसाठी गावांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले.ही कामे होणारपालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध रस्ते व पुलांमध्ये नागपूर-मुल-खेडी-गोंडपिपरी येथील मार्गावरील गांगलवाडी जवळील एक कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या पुलाचा समावेश आहे. बोरचांदली येथील मूल-चामोर्शी रस्त्याची तीन कोटी रुपये खर्च करुन सुधारणा करणे, मूल-मारोडा-सोमनाथ रस्त्याचे एक कोटी रुपये खर्च करुन रुंदीकरण व डांबरीकरण, पेटगांव-घाटुर्नी-मारोडा-मुल-भेजगांव रस्त्याच्या नदीवरील १० कोटी रुपये खर्चाचा मोठा पुल, सुशी ते उथळपेठ रस्त्याचे ५० लक्ष रुपये खर्चाचे मजबुतीकरण व डांबरीकरण, कोळसा-झरी-पिंपळखुट-नंदगुर-अजयपूर-केळझर-चिरोली-ताडाली रस्त्याचे १ कोटी ९० लाख रुपये खर्चांचे मजबुतीकरण व डांबरीकरण या कामांचा समावेश आहे.