शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रोजगाराला पिंपळगावात खिंडार

By admin | Updated: August 27, 2015 01:24 IST

तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील मनरेगाच्या कामगारांना मजुरी मिळाली नाही.

प्रकरणाची चौकशी करा : ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांना निवेदनब्रह्मपुरी : तालुक्यातील पिंपळगाव (भो) येथील मनरेगाच्या कामगारांना मजुरी मिळाली नाही. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून मजुरांना न्याय मिळवून देण्याची मागणी शिवसेनेचे प्रा. अमृत नखाते यांनी राज्यमंत्री दीपक केसरकर यांना दिलेल्या निवेदनातून केली.जगातील सर्वात मोठी रोजगार योजना म्हणून ‘मनरेगा’चा उल्लेख केला जातो. मात्र, स्थानिक पातळीवर यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास आल्याने योजनेच्या मूळ संकल्पनेला खिंडार पडलेली दिसत आहे. ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत मनरेगाच्या माध्यमातून पिंपळगाव येथे काम करण्यात आले. यादरम्यान अनेक मजुरांची नोंदच करण्यात आली नाही. यामध्ये बोगस मजुरांचे नावदेखील टाकण्यात आले.सर्व मजुरांची रक्कम रोजगार सेवकाने आपल्याच बँक खात्यात जमा केली. मात्र, कामगारांनी मजुरी मिळाली नाही. २०१४ यावर्षी याच योजनेच्या माध्यमातून क्रीडा मैदानाचे काम करण्यात आले. यामध्येदेखील कामगारांना मोबदला दिला गेला नाही. चौकशीअंती हे स्पष्ट झाल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी ठोस कार्यवाही केली नाही.मजुरांनाही मोबदला मिळाला नाही. याचदरम्यान ग्रामीण विकास राज्यमंत्री दीपक केसरकर हे जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यासाठी शहरात आले असता शिवसेनेचे ताालुका प्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या शिष्टमंडळाने राज्यमंत्र्यांची भेट घेतली. या प्रकरणात विशेष लक्ष घालून सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली. पीडित मजुरांना त्यांचा हक्क न दिल्यास शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारादेखील निवेदनात देण्यात आला. शिष्टमंडळात तालुका प्रमुखासह, शहर प्रमुख श्यामराव भानारकर, गुड्डू वाहारे, निर्मला राऊत, जया कन्नाके व अन्यायग्रस्त मजूर यांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)