शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

टाळेबंदीतही ग्रामीण कोरोना समित्या हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:20 IST

मासळ बु : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने पायंडा रोवला आहे. अनेक नागरिक कोरोनाचे शिकार होत आहे. परिसरात किंवा गावात ...

मासळ बु : शहरासह ग्रामीण भागात कोरोनाने पायंडा रोवला आहे. अनेक नागरिक कोरोनाचे शिकार होत आहे. परिसरात किंवा गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावर कोरोना ग्राम निर्मूलन संघर्ष समितीची स्थापना करण्याचे आदेश काढले. गाव-खेड्यात समित्या स्थापन झाल्या. गावात ये-जा करणाऱ्या व्यक्तीवर समित्या नजर ठेवून त्यांचे विलगीकरण देखरेख करीत आहे. मात्र, हल्ली टाळेबंदीत गावकऱ्यांच्या सहकार्याच्या अभावामुळे ग्रामीण भागात कोरोना ग्राम ॲम्बुलन्स समित्या हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

कोरोनाची पहिली लाट येऊन एक वर्षाचा कालावधी झाला. कोरोना विषाणूची दुसरी लाट सुरू आहे. अनेक नागरिक सर्दी, ताप, खोकला या आजाराने ग्रस्त आहेत. टाळेबंदीमुळे अनेक नागरिकांनी गावाचा रस्ता धरला आहे. यामुळे गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, यासाठी ग्रामपंचायतीने गाव स्तरावर कोरोना ग्राम निर्मूलन समितीची स्थापना केली. या समितीमध्ये सरपंच ग्रामसेवक, तलाठी, आरोग्यसेवक, ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश आहे. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी ही समिती बाहेरून येणाऱ्या नवीन व्यक्तीवर नजर ठेवते. गावबंदीची प्रभावी अंमलबजावणी व त्यांच्या वैद्यकीय चाचणीसह विलगीकरणाची व्यवस्था करत देखरेख व औषध उपचार करते. त्यानुसार, कोरोना निर्मूलन समिती आपले कार्य पार पाडत आहे.

बॉक्स

गावकरी लपवितात माहिती

नजर चुकीने गावात नविन व्यक्ती आला, तर त्याची कल्पना गावातील कुटुंबाच्या प्रमुखाने समितीला देण्याची जबाबदारी आहे. असे असताना मात्र गावकऱ्यांकडून अशी माहिती लपविली जाते. त्यामुळे गाव खेड्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची अवहेलना गावकरी करीत आहे. त्यामुळे गावबंदीची अंमलबजावणी ग्रामस्तरावर होताना दिसून येत नाही.

पोलीस प्रशासन गावातील चौरस्तावर सजग पहारा देत असले, तरी गावात येणारा व्यक्ती चोर पावलांनी आड मार्गाने येत असतो व गावात मुक्त संचार करीत असतो. अशा वातावरणामुळे ग्रामीण भागातील कोरोना निर्मूलन समिती हतबल झाल्या आहेत.

बाॅक्स

आरोग्य कर्मचाऱ्यांचे अपडाऊन

प्राथमिक आरोग्य केंद्र मासळ बु. अंतर्गत परिसरातील अनेक गाव येत असतात. अनेक गावात गृहविलगीकरणात असलेले कोविड रुग्ण आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत आरोग्य विभागाचेच कर्मचारी तालुक्याच्या ठिकाणावरून अपडाऊन करीत असतात. स्थानिक पातळीवर एकही कर्मचारी राहत नाही. परिसरात कोरोनाचे सौम्य लक्षण असणाऱ्या रुग्णाकडे दुर्लक्ष होत आहे.