शहरं
Join us  
Trending Stories
1
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
2
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
3
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
4
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
5
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
6
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
7
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
8
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
9
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
10
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
11
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
12
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
13
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
14
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
15
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
16
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

गवराळा क्षेत्र’ देऊ शकतो पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:55 IST

भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.

ठळक मुद्देराज्य सरकारने द्यावा ५ कोटींचा निधी, नगर परिषदेकडून पाठपुरावा सुरू

सचिन सरपटवार ।लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : शहरातील ऐतिहासिक गवराळा पर्यटन क्षेत्राचा विकास केल्यास विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा सुरळीत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका वठवू शकतो.भद्रावती शहर यापूर्वीच ‘ब’ वर्ग पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित झाले. शासनाकडून निधी मिळतो. पर्यटनाला चालना देण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहे. येथील तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळांची संख्या मोठी आहे. गवराळा येथील वरद विनायक मंदिर तर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. निसर्गाचे वरदान, रमणीय परिसर, आजुबाजुला टेकड्या, सभोवताली आमराई, बाजुलाच १० एकर परिसर असलेला गवराळा तलाव असे सौंदर्य या मंदिराला लाभले आहे. नगरपरिषदद्वारे हा खासगी तलाव विकत घेवून सौंदर्यीकरणाच प्रयत्न सुरू आहे.सदर प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. सदर तलाव न.प. ने विकत घेतल्यास तसेच यासाठी शासनाकडून ५ कोटींचा निधी उपलब्ध झाल्यास चांगले पर्यटन स्थळ अस्तित्वात येवू शकते. तलावात बोटींग, तलाव खोलीकरण, सभोवताल दिवे, तलावाभोवती फिरण्यासाठी मार्ग तयार करण्याचा न. प. चा मानस आहे. यातून परिसराचा चेहरामोहरा बदलू शकतो. एका उत्तरभिमुख असलेल्या या मंदिरात ६ फुट उंचीची गणेशाची मुर्ती आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक हे मंदिर आहे.भद्रावती शहरात पर्यटनाची मांदियाळीभद्रावती परिसरात बरीच पर्यटनस्थळे आहेत. देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचा काही भाग तालुक्यात येतो. भद्रावती ते ताडोबा सरळ मार्ग झाल्यास भद्रावती येथे पर्यटकांची वर्दळ वाढू शकते. जगप्रसिद्ध विजासण लेणी, जैन मंदिर, गोंडराजाचा किल्ला, नाग मंदिर, भवानीमाता मंदिर, पुरातन डोलारा तलाव पर्यटकांचे आकर्षणस्थळ आहे. चांदा ते बांदा योजनेतंर्गत सुधारणा केल्यास तिर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपाला येऊ शकते.गृत्स्यमदाची तपश्चर्याएका उत्तरभिमुख असलेल्या गवराळा येथील मंदिरात सहा फुट उंचीची गणेशाची मुर्ती आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक. गृत्स्यमदाने ज्या पुष्पक वनात तपश्चर्या केली. तेथे वर प्राप्त झाले, अशी आख्यायिका आहे. त्यानंतर वरदविनायकाची स्थापना झाली. समोर उत्तरमुखी हनुमान मंदिर व बाजुलाच मोठे स्वयंपाकगृह आहे. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

टॅग्स :tourismपर्यटन