शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नोटा बदलण्यासाठी धावपळ

By admin | Updated: November 10, 2016 01:59 IST

भारत सरकारने मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५००, १००० रुपयाच्या नोटा बंद केल्या आहेत.

सुट्या पैशाचा पेच : रेल्वे तिकीट घर व बसमध्ये नोटा स्वीकारणे बंदभारत सरकारने मंगळवारच्या मध्यरात्रीपासून ५००, १००० रुपयाच्या नोटा बंद केल्या आहेत. त्याचा थेट परिणाम बुधवारी व्यवहारावर दिसून आला. दोन दिवस बँक व एटीएम केंद्र बंद असल्याने ग्राहकांची प्रचंड धावपळ दिसून आली. ज्यांच्याकडे नोटा होत्या, त्यांनी विविध मार्गाने नोटा बदलविण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंपावर ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारले जाणार होते. त्यामुळे बुधवारी सकाळी अनेक नागरिकांना वाहनात पेट्रोल टाकण्याच्या बहाण्यावरून नोटा बदलण्याची तयारी चालविली. यात अनेकांना १०० रूपयाचा पेट्रोल टाकल्यानंतर ४०० रूपये परत दिले जात होते. मात्र काही वेळातच नागरिकांची पेट्रोल पंपावर गर्दी वाढली आणि पेट्रोल पंप चालकाकडील सुट्टे पैसे संपले. सर्व ग्राहकांना सुट्टे पैसे देणे शक्य न झाल्याने पेट्रोल पंप चालकांनी सरसकट पाचशे रूपयाचे पेट्रोल भरण्याची एकप्रकारची अटच घालून दिली. नोटा तर चलनातून बंद झाल्या मग ५०० रूपयाचे पेट्रोल टाकून घेणेच फायद्याचे, असे म्हणत अनेकांनी आपल्या वाहनाची पेट्रोल टँक फुल्ल करून घेतली. काही पेट्रोल पंपावर तर पोलीस बंदोबस्त लावण्याची परिस्थीती उद्भवली. वाहतूक शाखेचे पोलीस अवैध वाहतूक रोखण्यासाठी मूल मार्गावर दिसून आले. मात्र वाहनधारकांकडून चालन कापताना त्याच्याकडे ५०० रूपयाची नोट असल्यास तेही चालन कापण्यास असमर्थ दिसून आले. रेल्वेस्थानकावर सुट्टे पैसे नसल्याच्या कारणावरून ५०० व १००० रूपयाच्या नोटा स्वीकरणेच बंद करण्यात आले होते. तसा फलकही लावण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाश्यांनी टिकीटासाठी ५०० रूपयाच्या नोटा दिल्या. मात्र वाहकाकडे सुट्टे पैसे असले तरच त्या नोटा स्वीकारले जात होते. पण ज्या प्रवाश्याकडे ५०० च्या नोटाव्यतीरिक्त पैसेच नाही, अशाला त्याची नोट स्वीकारून उतरताना ३ ते ४ प्रवाश्यांचे मिळून पैसे परत केले जात होते. मात्र उतरल्यानंतर सुट्टे पैसे मिळवण्यासाठी प्रवाश्यांची चांगलीच गोची झाली.