शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

कोरोना उद्रेक टाळण्यासाठी रूणालय, केअर सेंटर होताहेत अपडेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 05:00 IST

कोरोना संसर्गावर नियंत्रण करणे व प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख व प्रशासकीय  अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. 

ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाची तयारी : आरटीपीसीआर चाचण्यांचीही व्याप्ती वाढविणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू लागल्याने केव्हाही उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संभाव्य उपाययोजना म्हणून कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटर व यापूर्वी वापरात आलेल्या इमारतींची तपासणी करून सुविधा अपडेट करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. कोरोना रुग्णांसाठी आवश्यक साहित्य कुठल्याही क्षणी वापरता येतील, अशास्थितीत आणून ठेवण्याची कार्यवाही सोमवारपासून (दि. २२) सुरू होणार आहे.कोरोना संसर्गावर नियंत्रण करणे व प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, मनपा आयुक्त, सर्व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख व प्रशासकीय  अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत. जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांचा नियमित आढावा घेऊन त्यांच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची माहिती घेऊन त्यापैकी संशयितांची आरटीपीसीआर चाचणी केली जाणार आहे. खासगी रुग्णालयांना नियमित भेटी देणे, सौम्य व अतिसौम्य लक्षणे असलेल्या बाधित किंवा संशयित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी गृह विलगीकरण व अलगीकरणाची परवानगी घेऊन नियमांचे पालन केले जाते किंवा नाही, याचीही तपासणी सोमवारपासून सुरू केली जाणार आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासन तयारी करीत आहे.

मंगल कार्यालयातील कार्यक्रमांवर पोलिसांचा वाॅचवरोरा : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. परवानगीमध्ये नमूद संख्येपेक्षा अधिक उपस्थिती असल्याचे विवाह सोहळ्यात दिसून येत आहे. यामुळे मंगल कार्यालयात होणाऱ्या कार्यक्रमांवर वाॅच ठेवण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक नेमण्यात आले आहे. हे पथक आयोजक व मंगल कार्यालय संचालक यांच्यावर तात्काळ कारवाई करणार आहेत.  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता टाळेबंदी करण्यात आली होती. कोरोनाचा प्रभाव कमी होताच टाळेबंदी शिथिल करीत मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, शाळा महाविद्यालय, जलतरण तलाव, व्यायाम शाळा व मंगल कार्यालये सुरू करण्यात आले. यामुळे स्थिती पूर्वपदावर होऊ लागली. मात्र पुन्हा कोरोनाने डोके वर काढले.

पाचपेक्षा जास्त ग्राहकांवर बंदीभाजीपाला मार्केट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल, सर्व दुकानदार, कर्मचारी व विक्रेत्यांना मास्क लावणे बंधनकारक आहे. दुकानाच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर उपलब्ध नसल्यास आणि एकावेळी केवळ पाचपेक्षा जास्त ग्राहक असल्यास कारवाई होणार आहे.अन्यथा कारवाईचा बडगाशासकीय कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाला मास्क लावणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क वापरावा, हात स्वच्छ करण्यासाठी साबण व सॅनिटायझर वापरावे, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर पोलीस व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या फिरत्या पथकाकडून दंड आकारणी आकारण्यात येईल, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. 

२४ तासात २९ कोरोना रुग्णांची भरजिल्ह्यात २४ तासात २९ कोरोना रुग्ण आढळले तर उपचारानंतर २२ जणांना सुटी देण्यात आली. सध्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १२९ असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत बाधितांची संख्या २३ हजार ३६८ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८४३ झाली आहे. दोन लाख नऊ हजार ४२२ नमुन्यांची तपासणी झाली. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या