शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संधीचे सोने करण्यास सत्ताधारी अपयशी

By admin | Updated: November 16, 2015 01:01 IST

मूल नगर परिषदेच्या स्थापनेला तब्बल २८ वर्षाचा काळ लोटत आहे. आजवर लाखो रुपयांचा निधी आला. मात्र वाढत्या भ्रष्टाचाराने मूल शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकला नाही.

राजू गेडाम मूलमूल नगर परिषदेच्या स्थापनेला तब्बल २८ वर्षाचा काळ लोटत आहे. आजवर लाखो रुपयांचा निधी आला. मात्र वाढत्या भ्रष्टाचाराने मूल शहराचा चेहरा-मोहरा बदलू शकला नाही. आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात मूल शहर विकासापासून कोसोदूर राहिले. नगरपरिषदेत भाजपाची सत्ता असून केंद्र व राज्यातसुद्धा भाजपाची सत्ता आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही जन्म याच तालुक्यात झााल. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. सत्तारूढ पदाधिकारी व नगरसेवकांनी नियोजनबद्ध आखणी केल्यास मूल शहराचा चेहरा-मोहरा बदलण्यास व मूल शहर स्मार्ट सिटी होण्यास कुणीही रोखू शकत नाही. मात्र सत्तारूढ पदाधिकारी व नगरसेवकातच ‘हाडवैर’ असल्याने विकासाचा खेळखंडोबा होताना दिसत आहे. विकासाची संधी असताना संधीचे सोने करण्यास अपयश आले आहे. मूल नगरपरिषदचे स्थापना १० सप्टेंबर १९८७ ला झाली.नगर परिषदेवर प्रथमत: काँग्रेसचे वर्चस्व प्राप्त झाले. मात्र त्यांनी देखील जनतेची घोर निराशा केली. त्यानंतर नगरपरिषदेवर काँग्रेस-भाजपा अशी सत्ता बसली. मात्र पदाधिकाऱ्यांची एकवाक्यता नसल्याने विकासाचा खेळखंडोबा झाला. शहराच्या विकासापेक्षा स्वत:चा विकास करण्यास धन्यता मानली गेली. गेल्या चार वर्षापासून नगर परिषदेवर भाजपाची सत्ता आहे. क्षेत्राचे आमदार अर्थमंत्री असल्याने विकासात्मक कार्यात निधी आणण्यात कुठलीही अडचण नाही. मात्र कंत्राटदार प्रवृत्तीच्या नगरसेवकांना विकासाबाबत काहीही देणेघेणे नसल्याचे जाणवते. विकासाचे देणेघेणे नसल्याने नियोजनबद्ध आखणी करण्यास सत्तारूढ पदाधिकारी व नगरसेवक अपयशी ठरले आहेत. सत्तारूढ भाजपाकडे १३ जणांचे स्पष्ट बहुमत आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे फक्त चार नगरसेवक आहेत. मात्र सत्तारूढ पक्षातील काही पदाधिकारी व नगरसेवकाविरुद्ध पक्षाच्या नगरसेवकांना ‘हिरवी झंडी’ दाखवीत असल्याने स्पष्ट बहुमत असतानादेखील मनात असताना देखील एखाद्या ठराव पारीत करणे कठीण जात आहे. सत्तारूढ पक्षाला ठराव पारीत करण्यासाठी तारेवरची कसरत करूनही ‘डाव’ साधता येत नसेल तर ‘सत्तारूढ’ म्हणण्यात काहीच हरकत नाही.