शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

‘आरटीओ’ खासगी बसगाड्यांविषयी अनभिज्ञ

By admin | Updated: August 14, 2015 01:21 IST

रस्त्यांवरुन धावणाऱ्या सर्व गाड्यांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात असते. याच कार्यालयामार्फत खरेदीपासून विक्रीपर्यंतचे सर्व व्यवहार चालतात.

माहिती अधिकारातून उघड : मनोज पाल यांची पत्रकार परिषदचंद्रपूर : रस्त्यांवरुन धावणाऱ्या सर्व गाड्यांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात असते. याच कार्यालयामार्फत खरेदीपासून विक्रीपर्यंतचे सर्व व्यवहार चालतात. मात्र जिल्ह्यातील रस्त्यांवरुन किती खासगी बसगाड्या धावतात, याबाबत हे कार्यालय अनभिज्ञ असल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले, असे शिवसेनेचे पदाधिकारी मनोज पाल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.चंद्रपूर- गडचिरोली, चंद्रपूर- चिमूर आणि चंद्रपूर- नागपूर या मार्गाने खासगी बसेस वाहतूक सुरू आहे. दररोज शेकडो खासगी बसगाड्या राजरोसपणे धावत आहेत. त्यामुळे या गाड्यांची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे असणे अपेक्षित आहे, मात्र शिवसेनचे मनोज पाल यांनी जिल्ह्यातील रस्त्यांवरुन किती वाहने धावतात, किती गाड्यांना आॅल इंडिया परवाना आहे, याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे माहिती अधिकारातून माहिती मागितली. तेव्हा या कार्यालयाने किती खासगी बसगाड्या धावतात, याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले. तसेच आॅल इंडिया परवाना मुंबईच्या परिवहन आयुक्त कार्यालयाकडून दिला जातो. त्यामुळे किती गाड्यांना हा परवाना आहे. याबाबतची माहिती नसल्याचे सांगितले. जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवरुन खासगी आणि अन्य वाहनांनी मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक सुरू आहे. यासाठी येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी जबाबदार आहेत. अवैध प्रवासी वाहतूक थांबविण्याबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु, त्या निवेदनाची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे निवेदनातून तक्रार केली आहे. येत्या काळात अवैध प्रवासी वाहतूक बंद न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असल्याचे पाल यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)