शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी झाली. २३ मार्च ते ३ मेपर्यंत इतर सर्व दुकाने बंद होती.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचे मोठे नुकसान : चंद्रपुरात एक हजार कोटींच्या उलाढालीला फटका

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारने देशभर २३ मार्चपासून लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूवगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद होत्या. ३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली नाही. हा काळ लग्नसराईचा होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना जबर फटका बसला. चंद्रपूर शहरात एक हजार कोटी व ग्रामीण भागात एक हजार कोटींची उलाढाल या काळात ठप्प झाली. परिणामी किरकोळ व्यावसायिकांसोबतच मोठ्या व्यापाºयांचेही आर्थिक समीकरण बिघडले आहे.देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी झाली. २३ मार्च ते ३ मेपर्यंत इतर सर्व दुकाने बंद होती.चंद्रपूर शहरात कापड, रेडीमेड, होजीयरी, हार्डवेअर, जनरल, फर्नीचर, बांधकाम मटेरियल, हेअर सलून, जीम, स्टेशनरी, मोबाईल शॉपी व दुरुस्ती, प्लास्टिक यासारखी अनेक दुकाने आहेत. यात दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. लॉकडाऊनच्या काळात सर्व बाजारपेठच लॉकडाऊन असल्यामुळे लग्नसराई असतानाही एक छदामही खरेदी-विक्री झाली नाही. गतवर्षीची आकडेवारी लक्षात घेतली तर तब्बल एक हजार कोटींची उलाढाल ठप्प होती.२४० कोटींचा महसूल बुडालाचंद्रपूर शहर व ग्रामीण भागातील व्यापारपेठा बंद असल्याने दोन्ही मिळून तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प होती. यातून सरकारलाही मिळणाºया २४० कोटींच्या महसूलावर पाणी फेरले गेले.सराफा व्यवसायावर अवकळाउन्हाळा म्हटला की लग्नसराईचा काळ. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे लग्न व इतर कार्यक्रमावर बंदी होती. काही लग्नं उरकली. मात्र ती अत्यंत साधेपणाने. लग्नसराईत सोना-चांदी व्यवसायाची चांदी असते. मात्र यावेळी २३ मार्च ते ३ मे या कालावधीत सोना-चांदी व्यवसायातील ५० कोटींची उलाढाल ठप्प पडली.ग्रामीण भागातही हीच स्थितीचंद्रपूर शहरवगळता जिल्ह्यातील सर्व बाजारपेठाही लॉकडाऊन काळात बंद होत्या. कापड, रेडीमेड, होजीयरी, हार्डवेअर, जनरल, फर्नीचर, बांधकाम मटेरियल, हेअर सलून, जीम, स्टेशनरी, मोबाईल शॉपी व दुरुस्ती, प्लास्टिक व इतर दुकानातील दरवर्षीची उलाढाल बघता यंदा २३ मार्च ते ३ मे या कालावधीत एक हजार कोटींची उलाढाल होऊ शकली नाही.उन्हाळ्याचा कालावधी लग्न व इतर कार्यक्रमांचा असतो. या काळात व्यापारपेठेत चांगली उलाढाल असते. यंदा लॉकडाऊनमुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील व्यापाºयांचा विचार केला तर किमान दोन हजार कोटींची उलाढाल होऊ शकली नाही. त्याचा किरकोर व मोठ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.- हर्षवर्धन सिंघवी,अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, चंद्रपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या