शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
2
"दिवा विझल्यावर.…’’, भास्कर जाधवांची नाराजी व्यक्त करण्यासाठी ‘स्टेटस’नीती, चर्चांना उधाण
3
Maharashtra Politics : “तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, बापाला पेरणीला पैसेही”, भाजपाच्या लोणीकरांचं वादग्रस्त विधान
4
Shaktipeeth Expressway: ‘शक्तिपीठ’साठी ९२ गावांची मोजणी पूर्ण, ऑगस्टपर्यंत मोजणी; डिसेंबर अखेरीस भूसंपादन 
5
इराणने युद्धात शौर्य दाखवले, मी आता त्यांना रोखणार नाही; नाटोच्या परिषदेत ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
6
दहशतवादावरून राजनाथ सिंह यांनी चीनसमोरच केलं पाकिस्तानचं वस्त्रहरण, म्हणाले...  
7
५० हजार पगारात कोणती कार तुमच्यासाठी ठरेल फायदेशीर?; '२०-४-१०' फॉर्म्युला वापरा
8
लढाई संपली, आता कमाईची संधी! सेन्सेक्स ४०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
9
इराणच्या अण्वस्त्रांचे मोठे नुकसान! सीआयएच्या अहवालात मोठा खुलासा
10
"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
11
जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये
12
क्रिप्टोची लालसा, पैशाची हाव अन् प्रियाच्या सौंदर्याची भुरळ; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये केली देशाशी गद्दारी
13
Viral Video: विमानात प्रवाशाचं लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडलं, लोकांनी काढला व्हिडीओ!
14
मुंबईच्या सर्वात महागड्या एरियात 'पैशांचा पाऊस'! एका ऑफिससाठी १००० कोटींचं भाडं, कोण आहे मालक?
15
रस्त्यावर उत्सव साजरा करणाऱ्यांवर मेक्सिकोत गोळीबार; १२ जणांचा मृत्यू, २० जण जखमी
16
धक्कादायक! डीजे ऑपरेटरच्या प्रेमात मुलगी आंधळी झाली, प्रियकराला घरी बोलावून आईची हत्या केली
17
खात्यामध्ये किमान १० हजार शिल्लक नसेल तर होणार दंड, कापणार एवढी रक्कम, या बँकेचे आदेश
18
प्रवाशांनी भरलेली बस पूर आलेल्या नदीत कोसळली, उत्तराखंडमध्ये भीषण अपघात
19
सर्व ऑनलाइन पासवर्ड बदला; सरकारच्या नागरिकांना सूचना, १६ अब्ज पासवर्ड हॅकर्सनी लांबविले
20
सरकारची ‘कर’ कमाई घसरली; उद्दिष्ट गाठण्यात आले अपयश

लॉकडाऊन काळात दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी झाली. २३ मार्च ते ३ मेपर्यंत इतर सर्व दुकाने बंद होती.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांचे मोठे नुकसान : चंद्रपुरात एक हजार कोटींच्या उलाढालीला फटका

रवी जवळे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारने देशभर २३ मार्चपासून लॉकडाऊन करीत संचारबंदी लागू केली. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूवगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद होत्या. ३ मेपर्यंत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली नाही. हा काळ लग्नसराईचा होता. त्यामुळे व्यापाऱ्यांना जबर फटका बसला. चंद्रपूर शहरात एक हजार कोटी व ग्रामीण भागात एक हजार कोटींची उलाढाल या काळात ठप्प झाली. परिणामी किरकोळ व्यावसायिकांसोबतच मोठ्या व्यापाºयांचेही आर्थिक समीकरण बिघडले आहे.देशात कोरोनाचा संसर्ग होऊ लागल्याने केंद्रासह राज्य सरकार अलर्ट झाले. २२ मार्च रोजी जनता कर्फ्यू व त्यानंतर २३ मार्चपासून देशात सर्वत्र लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. केवळ किराना साहित्य, औषधी, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने सुरू ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातही या लॉकडाऊनची १०० टक्के अंमलबजावणी झाली. २३ मार्च ते ३ मेपर्यंत इतर सर्व दुकाने बंद होती.चंद्रपूर शहरात कापड, रेडीमेड, होजीयरी, हार्डवेअर, जनरल, फर्नीचर, बांधकाम मटेरियल, हेअर सलून, जीम, स्टेशनरी, मोबाईल शॉपी व दुरुस्ती, प्लास्टिक यासारखी अनेक दुकाने आहेत. यात दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. लॉकडाऊनच्या काळात सर्व बाजारपेठच लॉकडाऊन असल्यामुळे लग्नसराई असतानाही एक छदामही खरेदी-विक्री झाली नाही. गतवर्षीची आकडेवारी लक्षात घेतली तर तब्बल एक हजार कोटींची उलाढाल ठप्प होती.२४० कोटींचा महसूल बुडालाचंद्रपूर शहर व ग्रामीण भागातील व्यापारपेठा बंद असल्याने दोन्ही मिळून तब्बल दोन हजार कोटींची उलाढाल ठप्प होती. यातून सरकारलाही मिळणाºया २४० कोटींच्या महसूलावर पाणी फेरले गेले.सराफा व्यवसायावर अवकळाउन्हाळा म्हटला की लग्नसराईचा काळ. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे लग्न व इतर कार्यक्रमावर बंदी होती. काही लग्नं उरकली. मात्र ती अत्यंत साधेपणाने. लग्नसराईत सोना-चांदी व्यवसायाची चांदी असते. मात्र यावेळी २३ मार्च ते ३ मे या कालावधीत सोना-चांदी व्यवसायातील ५० कोटींची उलाढाल ठप्प पडली.ग्रामीण भागातही हीच स्थितीचंद्रपूर शहरवगळता जिल्ह्यातील सर्व बाजारपेठाही लॉकडाऊन काळात बंद होत्या. कापड, रेडीमेड, होजीयरी, हार्डवेअर, जनरल, फर्नीचर, बांधकाम मटेरियल, हेअर सलून, जीम, स्टेशनरी, मोबाईल शॉपी व दुरुस्ती, प्लास्टिक व इतर दुकानातील दरवर्षीची उलाढाल बघता यंदा २३ मार्च ते ३ मे या कालावधीत एक हजार कोटींची उलाढाल होऊ शकली नाही.उन्हाळ्याचा कालावधी लग्न व इतर कार्यक्रमांचा असतो. या काळात व्यापारपेठेत चांगली उलाढाल असते. यंदा लॉकडाऊनमुळे चंद्रपूर शहर व जिल्ह्यातील व्यापाºयांचा विचार केला तर किमान दोन हजार कोटींची उलाढाल होऊ शकली नाही. त्याचा किरकोर व मोठ्या व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे.- हर्षवर्धन सिंघवी,अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स, चंद्रपूर.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या