शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

सुशी दाबगाव येथे रानडुकरांचा उपद्रव

By admin | Updated: December 16, 2014 22:50 IST

मूल तालुक्यातील सुशी, दाबगाव, मक्ता व परिसरातील गावांच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सुशीदाबगाव : मूल तालुक्यातील सुशी, दाबगाव, मक्ता व परिसरातील गावांच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.सुशी, दाबगाव मक्ता व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धान पीक घेतल्या जाते. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे साधनही भातपिकच आहे. यावर्षीच्या हंगामात सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा ठेऊन बळीराजाने मोठ्या उत्साहाने धानाची पेरणी केली. मात्र काही दिवसातच पावसाने दडी मारली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची झळ सहन करावी लागली. एवढेच नाही तर पावसाळाच्या दिवसातच पावसाने दडी मारल्याने धानाची पेरणी करुनही पाण्याअभावी बळीराजाला धानाची रोवणी करता आली नाही. ज्यांच्याकडे पाण्याची मुबलक सोय उपलब्ध होती, त्यांनी कशीबशी रोवणी केली. काहींना तर धानाची एक पेंढीही रोवता आली नाही. ज्यांनी रोवणी केली, त्यापैकी काहींची रोवणी पाण्याअभावी जागेवरच करपून गेली तर काहींची रोवणी (पाणी असलेली) जगली. पण त्याही पिकावर रोगाने आक्रमण केले. धान कसेबसे जगून कापणीला आले. मात्र आता रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रानडुकरांनी आपला मोर्चा सुशी दाबगाव व परिसरातील गावांकडे वळविला आहे. शेतात धुमाकूळ घालून या रानडुकरांनी अनेकांच्या शेतीची नासधुस केली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर गावे ही जंगली शिवाराला लागून आहेत. याबाबतीत वनविभाग सूचना देऊनही काहीच उपाययोजना होत नसल्याने वन विभागाबद्दल सुशी दाबगाव व परिसरातील शेतकऱ्यांत तिव्र रोष व्यक्त होत आहे. वन विभागाने लक्ष पूरवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)