शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

सुशी दाबगाव येथे रानडुकरांचा उपद्रव

By admin | Updated: December 16, 2014 22:50 IST

मूल तालुक्यातील सुशी, दाबगाव, मक्ता व परिसरातील गावांच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सुशीदाबगाव : मूल तालुक्यातील सुशी, दाबगाव, मक्ता व परिसरातील गावांच्या शेतशिवारात गेल्या अनेक महिन्यांपासून रानडुकरांचा धुमाकूळ सुरु आहे. यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.सुशी, दाबगाव मक्ता व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात धान पीक घेतल्या जाते. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या उदरनिर्वाहाचे साधनही भातपिकच आहे. यावर्षीच्या हंगामात सुरुवातीला पावसाने हजेरी लावली. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पन्न होईल, अशी अपेक्षा ठेऊन बळीराजाने मोठ्या उत्साहाने धानाची पेरणी केली. मात्र काही दिवसातच पावसाने दडी मारली. त्यामुळे काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीची झळ सहन करावी लागली. एवढेच नाही तर पावसाळाच्या दिवसातच पावसाने दडी मारल्याने धानाची पेरणी करुनही पाण्याअभावी बळीराजाला धानाची रोवणी करता आली नाही. ज्यांच्याकडे पाण्याची मुबलक सोय उपलब्ध होती, त्यांनी कशीबशी रोवणी केली. काहींना तर धानाची एक पेंढीही रोवता आली नाही. ज्यांनी रोवणी केली, त्यापैकी काहींची रोवणी पाण्याअभावी जागेवरच करपून गेली तर काहींची रोवणी (पाणी असलेली) जगली. पण त्याही पिकावर रोगाने आक्रमण केले. धान कसेबसे जगून कापणीला आले. मात्र आता रानडुकरांच्या उपद्रवाने शेतकरी त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून रानडुकरांनी आपला मोर्चा सुशी दाबगाव व परिसरातील गावांकडे वळविला आहे. शेतात धुमाकूळ घालून या रानडुकरांनी अनेकांच्या शेतीची नासधुस केली. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदर गावे ही जंगली शिवाराला लागून आहेत. याबाबतीत वनविभाग सूचना देऊनही काहीच उपाययोजना होत नसल्याने वन विभागाबद्दल सुशी दाबगाव व परिसरातील शेतकऱ्यांत तिव्र रोष व्यक्त होत आहे. वन विभागाने लक्ष पूरवून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)