शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बल्लारपूरच्या किल्ल्यात रॉक गार्डन होणार

By admin | Updated: July 5, 2016 02:02 IST

जिल्ह्यातील बल्लारपूर येथील गोंड राजा आदिया बल्लाळशहा यांच्या भुईकोट किल्ल्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास

पर्यटनाचा प्रयत्न : नागपूर येथील पुरातत्त्व विभागाशी संपर्कमिलिंद कीर्ती ल्ल चंद्रपूरजिल्ह्यातील बल्लारपूर येथील गोंड राजा आदिया बल्लाळशहा यांच्या भुईकोट किल्ल्याचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्याबाबत बल्लारपूर नगरपरिषद विचार करीत आहे. लोकसहभागातून किल्ल्यात बगिचा व इतर बाबी तयार करण्यात येणार आहेत. हा किल्ला पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असल्याने नागपूर येथील कार्यालयाकडे संपर्क करण्यात आला आहे. या संदर्भात ४ जुलै रोजी चर्चा करण्यात आली.गोंड सैनिक जमा करून पहिल्या गोंड सुलतानाने राजावर हल्ला केले. त्या युद्धात राज्याचा काही भाग जिंकला. त्यानंतर आंध्र प्रदेशातील शिरपूर येथे राजधानी बनवून महाल बांधला. मात्र मध्यवर्ती ठिकाण म्हणून आदिया बल्लाळशहा याने बल्लारपूर येथे इरई नदीच्या काठावर किल्ला बांधला . आता हा किल्ला मोडकीळ आला आहे. राज महाल भुईसपाट झाला तरी त्या किल्ल्याचा परकोट शाबूत आहे. तसेच राणी महालाचा काही भाग, किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार, आतील प्रवेशद्वार, विहीर, घोडबळ (अस्तबल) आदी सुस्थितीत आहे. या किल्ल्याची निगा राखण्याचा प्रयत्न पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.आता बल्लापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी विपीन मुद्धा यांनी किल्ल्यातील मोकळा भाग पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचे ठरविले आहे. या संदर्भात एका विकासकाशी त्यांनी चर्चा केली आहे. मुख्याधिकारी मुद्धा व ठाणेदार प्रदीप शिरस्कार यांनी ४ जुलै रोजी पुन्हा या विषयावर चर्चा केली. किल्ल्याचा विकास करण्यासाठी पुरातत्त्व विभागाच्या परवानगीची गरज आहे. त्यासंदर्भात नागपूर येथील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचे एका सूत्राने सांगितले.२६ जानेवारीची परेड किल्ल्यातगणराज्य दिन २६ जानेवारी रोजी दिल्ली येथील लाल किल्ल्यासमोर विविध कवायती आणि सैन्य परेड केली जाते. त्याप्रमाणे बल्लारपूर येथील किल्ला विकसित करण्यात आल्यावर प्रवेशद्वारावर झेंडावंदन करून पोलीस विभाग, होमगार्ड आदींचे जवान आणि एनसीसी, एमसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांची परेड करण्यात येणार आहे. अस्तबल परिसरात दगडाचे स्टेज आहे. तेथे खुले सभागृह तयार केल्यावर पाडवा पहाट हा संगीतमय कार्यक्रम इरई नदीच्या काठावर घेण्याबाबत विचार करण्यात येत आहे.बगिचा विकसित करणारवृंदावन गार्डनप्रमाणे बल्लारपूरच्या किल्ल्यामधील आतील मोकळ्या भागात रॉक गार्डन विकसित केले जाणार आहे. किल्ल्याच्या पुरातत्त्वीय अवशेषांना कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता बगिचा तयार करण्यात येईल. लँडस्केप करून विविध जातीची झाडे आणि विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात येणार आहेत. राणी महालच्या भागात खुले सभागृह तयार केले जाईल.सध्या हा किल्ला विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात येत आहे. पुरातत्त्व विभागाची परवानगी प्राप्त झाल्यावर किल्ला विकसित करण्याचा प्रस्ताव नगरपरिषदेच्या आमसभेत मांडण्यात येईल. नगरपरिषदेने मंजुरी दिल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सध्या किल्ल्यातील झाडे-झुडपे साफ करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.-विपीन मुद्धा,मुख्याधिकारी,नगरपालिका, बल्लारपूर.