शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

३५० रुपयांसाठी सावलीतील पथदिवे पाच दिवस बंद

By admin | Updated: July 14, 2016 00:57 IST

नव्याने निर्माण झालेल्या सावली नगरपंचायतीचे पथदिवे अवघ्या ३५० रुपयासाठी पाच दिवस बंद ठेवल्याचा अफलातून प्रकार घडला.

सावली : नव्याने निर्माण झालेल्या सावली नगरपंचायतीचे पथदिवे अवघ्या ३५० रुपयासाठी पाच दिवस बंद ठेवल्याचा अफलातून प्रकार घडला. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाविरूद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. सावली तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असताना गेल्या पाच दिवसापर्यंत पथदिवे बंद होते. पथदिवे बंद असल्याचे कारण विद्युत जनित्राजवळील ग्रीप तुटल्याची सबब पुढे करण्यात आली. त्या ग्रीपची किंमत केवळ ३५० ते ४०० रुपये होती. मात्र नगरपंचायत प्रशासनाकडे ५०० रुपये सुद्धा तात्काळ खर्च करण्याचा अधिकार नसल्याने मुख्याधिकाऱ्याच्या आदेशाची प्रतीक्षा करावी लागली. मुख्याधिकारी आठवड्यातून एकदाच येत असल्यामुळे सावली येथील नागरिकांना भर पावसात अंधारात ये-जा करावी लागली. सावली नगर पंचायत प्रशासन व पदाधिकारी यांच्यात व्यक्तीगत बनाव असल्याची शक्यता असल्यामुळे पदाधिकाऱ्यांना ५०० रुपयापर्यंतही खर्च करता येऊ नये, याचे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महावितरण विभागाची तांत्रिक अडचण असती तर एकदाचे मान्य करता आले असते. परंतु, केवळ ३५० रुपयासाठी सावली नगराचे पथदिवे बंद ठेवणे याला काय म्हणावे, अशी चर्चा सावली नगरात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)