शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

मोहाळी परिसरातील रस्त्यांची दैना

By admin | Updated: December 2, 2014 23:04 IST

अनेक वर्षांपासून मोहाळी परिसरातील रस्त्याचे पूर्णत: डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते, अशी परिसरातील रस्त्याची दैनावस्था झाली आहे.

मोहाळी (नले.) : अनेक वर्षांपासून मोहाळी परिसरातील रस्त्याचे पूर्णत: डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते, अशी परिसरातील रस्त्याची दैनावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहेत. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे मोहाळी परिसरातील रस्त्यान मार्गक्रमण करताना डोकेदु:खी ठरत आहे. तर एसटी बस व इतर वाहनांना या रस्त्याने मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मोहाळी, कळमगाव, सिंदेवाही हा मार्ग नेहमीच वर्दळीचा मार्ग आहे. पाच वर्षांपूर्वी आलेल्या महापुराने कळमगाव या गावाशेजारी हा रस्ता पूर्णत: उखडला. त्यामुळे या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.याच ठिकाणी दुचाकी वाहनधारकांना अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कुकडहेटी जाणाऱ्या मार्गात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. उमा नदीच्या पुलाशेजारीच सिंदेवाहीकडे जाणारा मार्गही मोठ्या प्रमाणात उखडला आहे. या मार्गावरही पावसाळ्याच्या दिवसात अनेक दुचाकी वाहनधारक अपघात होऊन पडले आहेत. या मार्गाने मार्गक्रमण करताना अनेक वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच विसापूर मार्गे मोहाळी येणाऱ्या रस्त्यावरील डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असते. त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना रस्ता पार करावा लागत आहे.तसेच पेठगाव मार्ग भादुर्णा,उसर्ला, मारोडा, मूल या मार्गाचीही अंत्यत दैनावस्था असून या मार्गावरही मोठमोठे खड्डे पडेल आहेत. या रस्त्यांची दैनावस्था १० ते १२ वर्षांपासूनची आहे. पेठगाव, भादुर्णा, मूल मार्ग हा कमी अंतराचा असल्याने अनेक वाहनधारक पूर्वी या मार्गाने मार्गक्रमण करीत असत. मात्र हा रस्ता पूर्णत: उखडल्याने राजोली मूल असा सात किलोमिटर अधिकचा फेरा घालून जावे लागत आहे. एवढी या रस्त्याची दैनावस्था आहे. त्यामुळे या मार्गाने चालणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तर एसटी बसने प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात धक्के खात प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गाने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध आजारांनी ग्रासले आहे. रस्त्याची अशी दैनावस्था झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे की झोपेचे सोंग घेऊन आहे, असा प्रश्न या परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधींनाही ही गंभीर समस्या माहित असताना चे मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांत असंतोष खदखदत आहे. त्यामुळे उखडलेले रस्ते व रस्त्यात पडलेले खड्डे बुजवून या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)