शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोहाळी परिसरातील रस्त्यांची दैना

By admin | Updated: December 2, 2014 23:04 IST

अनेक वर्षांपासून मोहाळी परिसरातील रस्त्याचे पूर्णत: डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते, अशी परिसरातील रस्त्याची दैनावस्था झाली आहे.

मोहाळी (नले.) : अनेक वर्षांपासून मोहाळी परिसरातील रस्त्याचे पूर्णत: डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ते, अशी परिसरातील रस्त्याची दैनावस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे या रस्त्याकडे अनेक वर्षांपासून दुर्लक्ष करीत आहेत. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधीही मूग गिळून गप्प बसले आहेत. त्यामुळे मोहाळी परिसरातील रस्त्यान मार्गक्रमण करताना डोकेदु:खी ठरत आहे. तर एसटी बस व इतर वाहनांना या रस्त्याने मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.मोहाळी, कळमगाव, सिंदेवाही हा मार्ग नेहमीच वर्दळीचा मार्ग आहे. पाच वर्षांपूर्वी आलेल्या महापुराने कळमगाव या गावाशेजारी हा रस्ता पूर्णत: उखडला. त्यामुळे या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.याच ठिकाणी दुचाकी वाहनधारकांना अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कुकडहेटी जाणाऱ्या मार्गात अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. उमा नदीच्या पुलाशेजारीच सिंदेवाहीकडे जाणारा मार्गही मोठ्या प्रमाणात उखडला आहे. या मार्गावरही पावसाळ्याच्या दिवसात अनेक दुचाकी वाहनधारक अपघात होऊन पडले आहेत. या मार्गाने मार्गक्रमण करताना अनेक वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच विसापूर मार्गे मोहाळी येणाऱ्या रस्त्यावरील डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत असते. त्यामुळे या मार्गाने प्रवास करताना जीव मुठीत घेऊन वाहनधारकांना रस्ता पार करावा लागत आहे.तसेच पेठगाव मार्ग भादुर्णा,उसर्ला, मारोडा, मूल या मार्गाचीही अंत्यत दैनावस्था असून या मार्गावरही मोठमोठे खड्डे पडेल आहेत. या रस्त्यांची दैनावस्था १० ते १२ वर्षांपासूनची आहे. पेठगाव, भादुर्णा, मूल मार्ग हा कमी अंतराचा असल्याने अनेक वाहनधारक पूर्वी या मार्गाने मार्गक्रमण करीत असत. मात्र हा रस्ता पूर्णत: उखडल्याने राजोली मूल असा सात किलोमिटर अधिकचा फेरा घालून जावे लागत आहे. एवढी या रस्त्याची दैनावस्था आहे. त्यामुळे या मार्गाने चालणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तर एसटी बसने प्रवास करताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात धक्के खात प्रवास करावा लागतो. त्यामुळे या मार्गाने बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विविध आजारांनी ग्रासले आहे. रस्त्याची अशी दैनावस्था झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत आहे की झोपेचे सोंग घेऊन आहे, असा प्रश्न या परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत. या क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करणारे लोकप्रतिनिधींनाही ही गंभीर समस्या माहित असताना चे मूग गिळून गप्प असल्याने नागरिकांत असंतोष खदखदत आहे. त्यामुळे उखडलेले रस्ते व रस्त्यात पडलेले खड्डे बुजवून या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)