शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
2
“निवडणूक आयुक्तांना नेपाळला पाठवा, तिथेही भाजपा सरकार स्थापन करेल”; कुणाल कामराची टीका
3
कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...
4
बिहारमध्ये आज जे तेजस्वी यादवांसोबत घडलं, तेच २०१०मध्ये लालू प्रसादांसोबतही घडलं होतं...
5
उपमुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुकेश साहनींच्या पदरी भोपळा; VIP चा दारुण पराभव...
6
मी काय बोललो समजलं का? धर्मेंद्र यांच्या प्रकरणावरुन 'भिडू'ने पापाराझींची मराठीत घेतली शाळा
7
सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची नवी किंमत
8
Kuldeep Yadav: कुलदीप यादवच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद, घरच्या मैदानावर घेतल्या १५० विकेट्स!
9
Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर काश्मीरचा 'टिकिंग टाईम बॉम्ब' डॉक्टर बेपत्ता; उमरसोबत केलं होतं काम
10
कोण आहेत नागपूरचे सुपुत्र आयपीएस विजय साखरे ? मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे दिल्लीतील स्फोटप्रकरणी एनआयए पथकाचे नेतृत्व
11
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
12
पर्सनल लोन घेताय? केवळ व्याजदर नका पाहू! 'या' Hidden Charges मुळे कर्ज बनते डोकेदुखी!
13
अंता पोटनिवडणुकीत १५९ मतांमुळे भाजपाची लाज राखली; मात्र काँग्रेस उमेदवारानं मारली बाजी
14
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
15
Nitin Gilbile: कारमध्येच मित्राला घातल्या गोळ्या, नितीन गिलबिले हत्या प्रकरणात लोणावळ्यात एकाला अटक
16
ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आरोग्य विमा घेताना धूम्रपान, मद्यपान या सवयी जाहीर करणे का महत्त्वाचे आहे? काय म्हणताहेत एक्सपर्ट
18
कोटींचा आकडा गाठायचा आहे? 'हॉट स्टॉक टिप्स' सोडा, फक्त 'या' २ सवयी पाळा; तज्ञांनी सांगितला 'श्रीमंतीचा मंत्र'!
19
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
20
Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला द्या हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल
Daily Top 2Weekly Top 5

सांडव्यातील रस्ता वाहून गेला

By admin | Updated: July 18, 2016 01:52 IST

सिंचन शाखा रोजोली, उपविभाग मुल अंतर्गत येत असलेला चिखली येथील भसबोरण तलाव पुर्णपणे भरलेला आहे.

सिंचन विभागाचे दुर्लक्ष : शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यास अडचण चिखली : सिंचन शाखा रोजोली, उपविभाग मुल अंतर्गत येत असलेला चिखली येथील भसबोरण तलाव पुर्णपणे भरलेला आहे. या तलावाची पाणी साठविण्याची क्षमता २.९०५ द.ल.घ.मी. आहे. चिखली ते कन्हाळगाव हा मार्ग भसबोरण तलावाच्या सांडव्यातून जात असून मागील आठवड्यातील संततधार पावसामुळे सांडव्यातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचा काही भाग वाहून गेला आहे. चिखली येथील भसबोरण तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे तलावातील अतिरीक्त पाणी सांडव्याच्यामार्फत जात असून याच सांडव्यात चिखलीवरून कन्हाळगावला जाणारा एकच मुख्य रस्ता आहे. सांडव्यात बांधण्यात आलेली दगडांची पिचींग ही मागील वर्षीच पुर्णपणे वाहुन गेल्यामुळे तिथे एकही दगड शिल्लक नसून मोठमोठे खड्डे पडले आहेत. जनावरांना चराईसाठी कन्हाळगाव येथील जंगल हे एकमेव ठिकाण असल्यामुुळे गुराखी जनावरांना याच रस्त्याने जनावरांना नेत असतात. रस्त्यातील खडयात पडून अनेक जनावरे जखमी होत असून पाण्याचा ओव्हरफ्लो जास्त वाढल्यावर बकऱ्या, गायी व म्हशी वाहून जाण्याचा धोका असतो. शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कन्हाळगाव येथे हनुमानाचे जागृत मंदीर आहे. मंदीराकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून रस्ता बंद असल्यामुळे आपली वाहने अर्ध्या रस्त्यात ठेवून त्यांना तीन ते चार किलोमीटर पायी जावे लागत आहे. कन्हाळगाव परीक्षेत्रात चिखली येथील शेतकऱ्यांच्या जमिनी असुन आता रोवणीचे काम सुरू झाले आहेत. शेतकऱ्यांना शेतात ट्रक्टर घेऊन जाणे अवघड झाले असल्यामुळे शेतीची कामे खोळंबली आहेत. पावसाळा अजून शिल्लक आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास याठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे सिंचाई विभागाच्या निष्काळाजीपणाविरूद्ध नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहेत. पावसाळा लागण्यापूर्वीच सिंचाई विभागाने याकडे लक्ष देऊन सिमेंट रस्ता व रस्त्याच्या काठावरील दगडाची पिचींग दुरुस्त करून घेतली असती तर आज रस्ता वाहून जाण्याची वेळ आली नसती. गावातील सरपंच प्रेमिला कडस्कर यांनी याबाबतचे निवेदन सिंचाई विभागाला दिले आहे. सिंचाई विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन लवकरात लवकर रस्ता दुरूस्त करून रस्ता पुर्ववत चालु करावा व शेतकऱ्यांना, जनावरांचा तसेच भाविकांना होणारा नाहक त्रास कमी करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने राजोलीचे शाखा अभियंता पारखी यांच्याशी संपर्क साधला असता येत्या दोन ते तीन दिवसात रस्ता पूर्ववत सुरू होईल, असे सांगितले. (वार्ताहर)