शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपवर ₹४१,९२१ कोटींच्या महाघोटाळ्याचा आरोप! 'कोबरापोस्ट'चा सनसनाटी दावा, ग्रुपने आरोप फेटाळले
2
पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात युद्धविराम? तुर्की बनला सरपंच; शहबाज शरीफ यांची तालिबाननं जिरवली
3
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
5
बापरे! ऑर्डर केला १.८५ लाखांचा Samsung Z Fold; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत भानगड
6
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
8
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
9
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
10
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
11
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
12
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
13
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
14
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
15
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
16
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
17
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
18
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
19
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
20
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला

त्यांच्या शाळेचा रस्ता वाघाच्या घरातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST

दिलीप मेश्राम नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या खांडला, सरांडी येथील विद्यार्थ्यांना जंगलातून सायकलने २६ ...

दिलीप मेश्राम

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या खांडला, सरांडी येथील विद्यार्थ्यांना जंगलातून सायकलने २६ किलोमीटरचा प्रवास करून नवरगावला शिक्षणासाठी जावे लागते. या जंगलात वाघ, बिबट्या व अनेक हिंस्र प्राणी आहेत. वाघाच्या दहशतीतच त्यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.

खांडला, सरांडी ही दोन्ही गावे तालुक्याच्या टोकावर वसलेली आहेत. या गावांना चहूबाजूंनी जंगलाने वेढलेले असून, आदिवासीबहुल गावे आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ग्रामस्थांचा जंगलाशी संबंध येतोच. नवरगावपासून खांडला दहा किलोमीटर तर सरांडी हे गाव १३ किलोमीटरवर आहे. शिवाय किराणापासून ते आरोग्य, शिक्षणाच्या सोयी मिळविण्यासाठी नवरगावलाच यावे लागते.

खांडला, सरांडी या दोन्ही गावांमध्ये चौथीपर्यंतच शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी खांडला येथील १२ ते १३ व सरांडी येथील १९ ते २० विद्यार्थ्यांना यावर्षी नवरगावला यावे लागत आहेत. काहींचे पालक दुचाकीने आणून सोडतात तर बरेच विद्यार्थी जंगलाचा रस्ता तुडवत सायकलने ये -जा करत आहेत. हा प्रवास करताना या जंगलात वाघ, बिबटे, अस्वल अशा हिंस्र प्राण्यांचे दर्शनही विद्यार्थ्यांना होते. १९ सप्टेंबर २०२१ला खांडला परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले. ही घटना ताजी असतानाच २२ सप्टेंबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सरांडी - खांडला या रस्त्यावर रामू चोधरी यांच्या शेताजवळील रस्त्यावर पट्टेदार वाघाने काही ग्रामस्थांना दर्शन दिले. तर २४ सप्टेंबरला सरांडीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महादवाडी येथील उत्तम कोरांगे या शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले. याचदिवशी वांगे नाला परिसरातून विद्यार्थी रस्त्याने जात असताना वाघ रस्त्यावर होता. वाघ पुढे गेल्यानंतर विद्यार्थी गावाकडे गेले. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॉक्स

मिनी बस हाच पर्याय

या २६ किलोमीटरच्या रस्त्यावर दुचाकी सोडल्यास कोणतेही प्रवासी साधन चालत नाही. यापूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जनावरे राखणे व शेती करणेच पसंत केले आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत, यासाठी प्रयत्न करते तर दुसरीकडे जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचावे लागते. शासनाने या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी मिनी बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

कोट

मी नववीच्या वर्गात शिकत असून, दुपारची शाळा असते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने घरातून सकाळी ६ वाजता अंधारातूनच निघावे लागते. काही दिवसांपूर्वी माझे वडील अनिल पांडुरंग सोनुले यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन ठार केले. या घटनेमुळे भीती अधिकच वाढली आहे.

- अनिकेत अनिल सोनुले, विद्यार्थी, खांडला.

250921\gfff.jpg

अशा घनदाट जंगलातुन विद्यार्थी शाळेला जातात