शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

त्यांच्या शाळेचा रस्ता वाघाच्या घरातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST

दिलीप मेश्राम नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या खांडला, सरांडी येथील विद्यार्थ्यांना जंगलातून सायकलने २६ ...

दिलीप मेश्राम

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या खांडला, सरांडी येथील विद्यार्थ्यांना जंगलातून सायकलने २६ किलोमीटरचा प्रवास करून नवरगावला शिक्षणासाठी जावे लागते. या जंगलात वाघ, बिबट्या व अनेक हिंस्र प्राणी आहेत. वाघाच्या दहशतीतच त्यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.

खांडला, सरांडी ही दोन्ही गावे तालुक्याच्या टोकावर वसलेली आहेत. या गावांना चहूबाजूंनी जंगलाने वेढलेले असून, आदिवासीबहुल गावे आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ग्रामस्थांचा जंगलाशी संबंध येतोच. नवरगावपासून खांडला दहा किलोमीटर तर सरांडी हे गाव १३ किलोमीटरवर आहे. शिवाय किराणापासून ते आरोग्य, शिक्षणाच्या सोयी मिळविण्यासाठी नवरगावलाच यावे लागते.

खांडला, सरांडी या दोन्ही गावांमध्ये चौथीपर्यंतच शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी खांडला येथील १२ ते १३ व सरांडी येथील १९ ते २० विद्यार्थ्यांना यावर्षी नवरगावला यावे लागत आहेत. काहींचे पालक दुचाकीने आणून सोडतात तर बरेच विद्यार्थी जंगलाचा रस्ता तुडवत सायकलने ये -जा करत आहेत. हा प्रवास करताना या जंगलात वाघ, बिबटे, अस्वल अशा हिंस्र प्राण्यांचे दर्शनही विद्यार्थ्यांना होते. १९ सप्टेंबर २०२१ला खांडला परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले. ही घटना ताजी असतानाच २२ सप्टेंबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सरांडी - खांडला या रस्त्यावर रामू चोधरी यांच्या शेताजवळील रस्त्यावर पट्टेदार वाघाने काही ग्रामस्थांना दर्शन दिले. तर २४ सप्टेंबरला सरांडीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महादवाडी येथील उत्तम कोरांगे या शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले. याचदिवशी वांगे नाला परिसरातून विद्यार्थी रस्त्याने जात असताना वाघ रस्त्यावर होता. वाघ पुढे गेल्यानंतर विद्यार्थी गावाकडे गेले. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॉक्स

मिनी बस हाच पर्याय

या २६ किलोमीटरच्या रस्त्यावर दुचाकी सोडल्यास कोणतेही प्रवासी साधन चालत नाही. यापूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जनावरे राखणे व शेती करणेच पसंत केले आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत, यासाठी प्रयत्न करते तर दुसरीकडे जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचावे लागते. शासनाने या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी मिनी बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

कोट

मी नववीच्या वर्गात शिकत असून, दुपारची शाळा असते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने घरातून सकाळी ६ वाजता अंधारातूनच निघावे लागते. काही दिवसांपूर्वी माझे वडील अनिल पांडुरंग सोनुले यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन ठार केले. या घटनेमुळे भीती अधिकच वाढली आहे.

- अनिकेत अनिल सोनुले, विद्यार्थी, खांडला.

250921\gfff.jpg

अशा घनदाट जंगलातुन विद्यार्थी शाळेला जातात