शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

त्यांच्या शाळेचा रस्ता वाघाच्या घरातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST

दिलीप मेश्राम नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या खांडला, सरांडी येथील विद्यार्थ्यांना जंगलातून सायकलने २६ ...

दिलीप मेश्राम

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या खांडला, सरांडी येथील विद्यार्थ्यांना जंगलातून सायकलने २६ किलोमीटरचा प्रवास करून नवरगावला शिक्षणासाठी जावे लागते. या जंगलात वाघ, बिबट्या व अनेक हिंस्र प्राणी आहेत. वाघाच्या दहशतीतच त्यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.

खांडला, सरांडी ही दोन्ही गावे तालुक्याच्या टोकावर वसलेली आहेत. या गावांना चहूबाजूंनी जंगलाने वेढलेले असून, आदिवासीबहुल गावे आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ग्रामस्थांचा जंगलाशी संबंध येतोच. नवरगावपासून खांडला दहा किलोमीटर तर सरांडी हे गाव १३ किलोमीटरवर आहे. शिवाय किराणापासून ते आरोग्य, शिक्षणाच्या सोयी मिळविण्यासाठी नवरगावलाच यावे लागते.

खांडला, सरांडी या दोन्ही गावांमध्ये चौथीपर्यंतच शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी खांडला येथील १२ ते १३ व सरांडी येथील १९ ते २० विद्यार्थ्यांना यावर्षी नवरगावला यावे लागत आहेत. काहींचे पालक दुचाकीने आणून सोडतात तर बरेच विद्यार्थी जंगलाचा रस्ता तुडवत सायकलने ये -जा करत आहेत. हा प्रवास करताना या जंगलात वाघ, बिबटे, अस्वल अशा हिंस्र प्राण्यांचे दर्शनही विद्यार्थ्यांना होते. १९ सप्टेंबर २०२१ला खांडला परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले. ही घटना ताजी असतानाच २२ सप्टेंबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सरांडी - खांडला या रस्त्यावर रामू चोधरी यांच्या शेताजवळील रस्त्यावर पट्टेदार वाघाने काही ग्रामस्थांना दर्शन दिले. तर २४ सप्टेंबरला सरांडीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महादवाडी येथील उत्तम कोरांगे या शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले. याचदिवशी वांगे नाला परिसरातून विद्यार्थी रस्त्याने जात असताना वाघ रस्त्यावर होता. वाघ पुढे गेल्यानंतर विद्यार्थी गावाकडे गेले. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॉक्स

मिनी बस हाच पर्याय

या २६ किलोमीटरच्या रस्त्यावर दुचाकी सोडल्यास कोणतेही प्रवासी साधन चालत नाही. यापूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जनावरे राखणे व शेती करणेच पसंत केले आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत, यासाठी प्रयत्न करते तर दुसरीकडे जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचावे लागते. शासनाने या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी मिनी बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

कोट

मी नववीच्या वर्गात शिकत असून, दुपारची शाळा असते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने घरातून सकाळी ६ वाजता अंधारातूनच निघावे लागते. काही दिवसांपूर्वी माझे वडील अनिल पांडुरंग सोनुले यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन ठार केले. या घटनेमुळे भीती अधिकच वाढली आहे.

- अनिकेत अनिल सोनुले, विद्यार्थी, खांडला.

250921\gfff.jpg

अशा घनदाट जंगलातुन विद्यार्थी शाळेला जातात