शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

त्यांच्या शाळेचा रस्ता वाघाच्या घरातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST

दिलीप मेश्राम नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या खांडला, सरांडी येथील विद्यार्थ्यांना जंगलातून सायकलने २६ ...

दिलीप मेश्राम

नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर वसलेल्या खांडला, सरांडी येथील विद्यार्थ्यांना जंगलातून सायकलने २६ किलोमीटरचा प्रवास करून नवरगावला शिक्षणासाठी जावे लागते. या जंगलात वाघ, बिबट्या व अनेक हिंस्र प्राणी आहेत. वाघाच्या दहशतीतच त्यांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते.

खांडला, सरांडी ही दोन्ही गावे तालुक्याच्या टोकावर वसलेली आहेत. या गावांना चहूबाजूंनी जंगलाने वेढलेले असून, आदिवासीबहुल गावे आहेत. सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत ग्रामस्थांचा जंगलाशी संबंध येतोच. नवरगावपासून खांडला दहा किलोमीटर तर सरांडी हे गाव १३ किलोमीटरवर आहे. शिवाय किराणापासून ते आरोग्य, शिक्षणाच्या सोयी मिळविण्यासाठी नवरगावलाच यावे लागते.

खांडला, सरांडी या दोन्ही गावांमध्ये चौथीपर्यंतच शिक्षणाची सोय आहे. पुढील शिक्षणासाठी खांडला येथील १२ ते १३ व सरांडी येथील १९ ते २० विद्यार्थ्यांना यावर्षी नवरगावला यावे लागत आहेत. काहींचे पालक दुचाकीने आणून सोडतात तर बरेच विद्यार्थी जंगलाचा रस्ता तुडवत सायकलने ये -जा करत आहेत. हा प्रवास करताना या जंगलात वाघ, बिबटे, अस्वल अशा हिंस्र प्राण्यांचे दर्शनही विद्यार्थ्यांना होते. १९ सप्टेंबर २०२१ला खांडला परिसरात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या अनिल पांडुरंग सोनुले यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले. ही घटना ताजी असतानाच २२ सप्टेंबरला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सरांडी - खांडला या रस्त्यावर रामू चोधरी यांच्या शेताजवळील रस्त्यावर पट्टेदार वाघाने काही ग्रामस्थांना दर्शन दिले. तर २४ सप्टेंबरला सरांडीपासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या महादवाडी येथील उत्तम कोरांगे या शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून जखमी केले. याचदिवशी वांगे नाला परिसरातून विद्यार्थी रस्त्याने जात असताना वाघ रस्त्यावर होता. वाघ पुढे गेल्यानंतर विद्यार्थी गावाकडे गेले. यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बॉक्स

मिनी बस हाच पर्याय

या २६ किलोमीटरच्या रस्त्यावर दुचाकी सोडल्यास कोणतेही प्रवासी साधन चालत नाही. यापूर्वी बऱ्याच विद्यार्थ्यांनी शाळा सोडून जनावरे राखणे व शेती करणेच पसंत केले आहे. एकीकडे शासन शाळाबाह्य विद्यार्थी राहू नयेत, यासाठी प्रयत्न करते तर दुसरीकडे जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचावे लागते. शासनाने या मार्गावर विद्यार्थ्यांसाठी मिनी बस सुरू करावी, अशी मागणी होत आहे.

कोट

मी नववीच्या वर्गात शिकत असून, दुपारची शाळा असते. शनिवारी सकाळची शाळा असल्याने घरातून सकाळी ६ वाजता अंधारातूनच निघावे लागते. काही दिवसांपूर्वी माझे वडील अनिल पांडुरंग सोनुले यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करुन ठार केले. या घटनेमुळे भीती अधिकच वाढली आहे.

- अनिकेत अनिल सोनुले, विद्यार्थी, खांडला.

250921\gfff.jpg

अशा घनदाट जंगलातुन विद्यार्थी शाळेला जातात